शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

विदर्भ राज्य होऊ न शकल्याचे वाजपेयींना होते शल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 8:03 PM

अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य त्यांच्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भावना खुद्द अटलबिहारी वाजपयी यांनी नागपुरातच एका तगड्या शिष्टमंडळापुढे बोलून दाखविली होती. 

ठळक मुद्देतगड्या शिष्टमंडळापुढे व्यक्त केली होती भावना : रा.सू. गवई, विजय दर्डा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने घेतली होती भेट

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य त्यांच्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भावना खुद्द अटलबिहारी वाजपयी यांनी नागपुरातच एका तगड्या शिष्टमंडळापुढे बोलून दाखविली होती. रविवार २७ आॅगस्ट २००० रोजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची नापूरला जहीर सभा होती. ते शनिवारी २६ तारखेलाच नागपूरला आले होते. राजभवनावर ते थांबले होते. तेव्हा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात काँग्रेस खासदरांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. रिपाइंचे ज्येष्ठ नेते व केरळचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई, माजी खासदार विजय दर्डा , माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वातील एका तगड्या शिष्टमंडळाने राजभवनावर त्यांची भेट घेतली व चर्चा केली. उद्याच्या नागपूरच्या जाहीरसभेत पंतप्रधनांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी, असे आवाहन शिष्टमंडळाने केले होते. तेव्हा पंतप्रधान असलेल्या वाजपेयी यांनी कुठलीही आडकाठी न ठेवता विदर्भवाद्यांचे म्हणणे सविस्तर ऐकूण घेतले होते. विलास मुत्तेमवार यांनी त्या चर्चेचे प्रास्ताविक केले. विजय दर्डा तेव्हा वाजपेयींना म्हणाले ‘आपण चांगल्या मूडमध्ये आहात. विदर्भ राज्य देण्याची तुमची इच्छा आहे, तुमच्या डोळ्यात ते दिसते आहे. विदर्भाच्या जनभावना समजून घ्या आणि विदर्भाचा भरभराटीचा मार्ग प्रशस्त करा. नागपुरात आपण तशी घोषणा करा, तुमचा हा आशिर्वाद विदर्भाचे लोक सदैव लक्षात ठेवतील.’त्यावर वाजपेयी म्हणाले की, एका राज्याच्या निर्मितीसाठी जे काही शक्य आहे, ते सर्व विदर्भात आहे. परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळात विदर्भाचा ठराव समत झालेला नाही. सर्वांची सहमती होवो म्हणून तीन नवीन राज्याची निर्मिती केली. महाराष्ट्रातही तसे झाले तर माझे काम सोपे होईल. विदर्भ राज्य झाले नाही, याचे शल्य मला बोचते.विदर्भवाद्यांच्या या तगड्या शिष्टमंडळात ज्येष्ठ विदर्भवादी नेते, टी.जी. देशमुख, शंकरराव गडाम, बनवारीलाल पुरोहित, बाळकृष्ण वासनिक, सदानंद फुलझेले, उमाकांत रामटेके, प्रा. हरीभाऊ केदार, नितीन राऊत, कीर्ती गांधी, वामनराव कासावार, देवसरकर, सुरेश देवतळे, सेवक वाघाये, गोविंदराव वंजारी, किशोर काशीकर, अशोक धवड, दमयंती देशभ्रतार, डॉ. मंशा-ऊर रहेमान, अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश गजभिये, हरगोविंद बजाज, बसंतलाल शॉ, शेख हुसैन, गोविंद रेणू, एन.के. सारडा, प्रकाश वाधवानी, आदर्श डागा, उमेश चौबे, रामराव वाघाळे, रमण पैगवार, रीना रॉय आदी उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीVidarbhaविदर्भ