शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाला ‘बजाज पॉवर’

By admin | Updated: July 8, 2014 01:26 IST

महात्मा गांधी म्हणजे सामाजिक समरसतेचे मूर्तिमंत प्रतीक. बापूंच्या संस्कारांचा नंदादीप आजही कोट्यवधी भारतीयांच्या मनात तेवत आहे. गांधीजींना सेवाग्राम येथे आश्रम उघडण्यासाठी आग्रह

१० कोटींची देणगी : व्यवस्थापन परिषदेने केले स्वागतनागपूर : महात्मा गांधी म्हणजे सामाजिक समरसतेचे मूर्तिमंत प्रतीक. बापूंच्या संस्कारांचा नंदादीप आजही कोट्यवधी भारतीयांच्या मनात तेवत आहे. गांधीजींना सेवाग्राम येथे आश्रम उघडण्यासाठी आग्रह करणारे व्यक्तिमत्त्व होते जमनालालजी बजाज. या दोघांची प्रेरणा समोर ठेवून प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी शिक्षणक्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा संकल्प घेतला आहे. निरनिराळ्या कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या प्रशासनाला नवीन ‘पॉवर’ देण्याचे काम त्यांनी केले असून, ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी)अंतर्गत विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी ते उपलब्ध करून देणार आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विशेष म्हणजे विद्यापीठाला ‘सीएसआर’अंतर्गत मिळालेले हे सर्वात मोठे योगदान आहे.सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत बजाज आॅटो लिमिटेडच्या माध्यमातून पाठविलेला या आशयाच्या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली व बजाज यांच्याकरिता अभिनंदन ठरावदेखील संमत केला.कंपनी कायदा २०१३ अनुसार एखाद्या कंपनीचे निव्वळ मूल्य ५०० कोटी रुपयांहून अधिक असेल किंवा कंपनीची उलाढाल एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास तसेच कंपनीला पाच कोटींहून अधिक निव्वळ नफा झाल्यास त्यांना २ टक्के रक्कम ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी’(सीएसआर)अंतर्गत सामाजिक उपक्रमांसाठी देणे बंधनकारक असते. ‘सीएसआर’साठी राहुल बजाज यांनी ज्या विद्यापीठात महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेले सेवाग्राम येथे व ज्या वर्धा, नागपुरच्या भूमीत जमनालाल बजाज यांनी वास्तव्य केले तेथील विद्यापीठाची निवड केली. त्यानुसार बजाज उद्योग समूहाचे कार्यपालन अधिकारी संजय भार्गव यांनी रातुम नागपूर विद्यापीठाला २८ मे रोजी ई-मेल पाठवून इमारत बांधकामासाठी १० कोटी रुपये देण्याची बजाज कंपनीची इच्छा असल्याचे कळवले होते. ‘सीएसआर’अंतर्गत हा निधी दिला जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले होते. (प्रतिनिधी)जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरबजाज कंपनीकडून ‘सीएसआर’अंतर्गत येऊ घातलेल्या या निधीच्या माध्यमातून नागपूर विद्यापीठ नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणार आहे. विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील ४४ एकर मोकळ्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत प्रस्तावित असून, इमारतीचे बांधकाम वर्षभरात पूर्ण होणार आहे. यासाठी एकूण २२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या इमारतीचा आराखडा तयार करण्याचे काम एका खासगी संस्थेकडे सोपवण्यात आले असून, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केल्याची माहिती अनुपकुमार यांनी दिली. या नवीन प्रशासकीय परिसराचे नाव जमनालाल बजाज प्रशासकीय परिसर असे करण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. जमनालाल बजाज यांचे वर्धा हे स्वग्राम होते. विद्यापीठाशी संलग्नित असलेली चार महाविद्यालये व बजाज फाऊंडेशन ही संस्थादेखील वर्धा येथीलच आहे. जमनालाल बजाज यांनी एप्रिल १९३० मध्ये दांडीयात्रेनंतर महात्मा गांधी यांना सेवाग्राम येथे आश्रम उभारण्यासाठी आग्रह केला व जागादेखील उपलब्ध करून दिली होती.