शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

उद्धव ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी - चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 11:00 IST

'ते' आदेश काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्याच काळातले

नागपूर : कंत्राटी पदभरतीवरून राजकीय वातावरण तापले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. कंत्राटी भरतीचे आदेश आघाडी सरकार व महाविकास आघाडी शासनाच्या काळातलेच आहेत. मात्र, आता त्यांचे नेते तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर या नेत्यांनी माफी मागितली नाही, तर शनिवारी राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. यावेळी त्यांचा जास्त रोख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर होता व त्यांनी नाक घासून माफी मागावी, असे बावनकुळे म्हणाले.

शुक्रवारी नागपुरात ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांनी कंत्राटी भरतीचे आदेश काढून युवकांची दिशाभूल केली. त्यांनी जनतेची माफी मागावी; अन्यथा राज्यात उद्या, शनिवारी सकाळी १० वाजता भाजप तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. उद्धव ठाकरेंसारखा खोटारडा माणूस पहिला नाही. त्यांनी तर जनतेची नाक घासून माफी मागायला पाहिजे. त्यांनी स्वत: या निर्णयावर सही केली होती. आता त्यांना स्वत:च्या सहीचादेखील विसर पडला का? असा सवाल बावनकुळे यांनी केला.

आम्ही सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, असे आंदोलन करणार आहोत. मात्र, विरोधी पक्षांतील बोलघेवड्या नेत्यांना धडा शिकवू, असेही बावनकुळे म्हणाले.

भाजपनेच माफी मागावी - नाना पटोले

कंत्राटी पद्धतीवर भाजपचा आंदोलनाचा इशारा म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असाच हा प्रकार आहे. खरे तर यात भाजपनेच माफी मागावी. पूर्वीच्या कंत्राटी कामगारांना कायम करण्यात आले होते. परंतु आता तर सर्व काही आउटसोर्सिंग करण्यात आल्याचा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी नागपुरात केला.

पत्रकारांच्या प्रश्नांवर पटोले म्हणाले, भाजप तत्कालीन आघाडी नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी करत आहे. पण त्याच सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. अजित पवार अजूनही अर्थमंत्री आहेत. भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ले करत आहेत का, असा सवालही त्यांनी केला.

कंत्राट भरतीच्या नऊ कंपन्या कुणाच्या? - विजय वडेट्टीवार

आधी क आणि ड वर्गासह १४ पदे कंत्राटी स्वरुपात भरली जात होती. महायुती सरकारने कंत्राट भरतीचा सुधारित जीआर काढून त्यात तब्बल १३५ पदांचा समावेश केला. अधिकाऱ्यासह कार्यालयातील सर्वच महत्त्वाची पदे कंत्राटी भरली जाणार होती. त्यांच्या नियुक्तीसाठी ६ सप्टेंबर २०२३ रोजी नऊ कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे. या नऊ कंपन्या कुणाच्या? कुणाचे ‘लाड’ पुरविले जात आहेत, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शु्क्रवारी पत्रकार परिषदेत केला.

पोलिस कंत्राटी भरती रद्द व्हावी - अनिल देशमुख

पोलिस दलात कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोलेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारAnil Deshmukhअनिल देशमुख