शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सव्वा दोन लाख पात्रताधारकांना शिक्षक भरतीची प्रतीक्षाच

By निशांत वानखेडे | Updated: July 18, 2023 18:01 IST

यंदा परीक्षा झाली, निकाल लागले पण पुढे अडकले : कोर्टाचा स्टे हटल्याने आशा

नागपूर : तब्बल १२ वर्षे म्हणजे पूर्ण एक तप शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डि.एड. पात्रताधारकांच्या मागचे शुक्लकाष्ट संपताना दिसत नाही. यंदा भरतीची प्रक्रिया सुरू करून टीएआयटी (टेट) परीक्षा घेण्यात आली. त्यात २.१६ लक्ष उमेदवारांनी परीक्षा दिली. निकालही लागले पण पुढे भरतीचे घोडे अडकून पडले.

डि.एड. ची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी अनास्थेचा सामना करावा लागतो आहे. २०१२ पासून सरकारने शिक्षकांच्या भरत्या बंद केल्या होत्या. ते शुक्लकाष्ट यंदा संपण्याचे चित्र तयार झाले होते. यावर्षी राज्य सरकारने शिक्षकांच्या ३० हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. अतिशय वेगवान पाऊले उचलत २१ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत टेटची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत राज्यातील २ लाख १६ हजार उमेदवारांनी सहभाग घेतला होता. लगोलग २४ मार्चला निकालही लावण्यात आले. दरम्यान या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करीत काही विद्यार्थी न्यायालयात गेले आणि पुन्हा प्रतीक्षेतील उमेदवारांवर निराशेचे सावट पसरले.

दरम्यान उमेदवारांच्या मते न्यायालयाने कोणत्याही प्रकारचे निर्देश न देताही सरकारने भरती थांबविली, जी आजतागायेत थांबलीच आहे. साडे तीन महिने लोटूनही सरकारने यासाठी कुठलेही पाऊले उचलली नसल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. यादरम्याने नुकतेच औरंगाबाद खंडपीठाने भरतीवरील स्थगिती उठविल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आतातरी सरकार वेगाने हालचाली करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२०१७ चीही भरती अशीच रखडली

२०१७ मध्ये सरकारने १९६ संस्थामधील १२ हजार शिक्षकांच्या पदासाठी भरती काढली होती. ही प्रक्रिया २०१९ पर्यंत चालली व यातील ७ हजार जागा भरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कोरोनाच्या कारणाने ही भरतीही रखडली, जी अद्यापही पुढे सरकली नाही.

सेवानिवृत्तांच्या परिपत्रकानेही असंतोष

दरम्यान सरकारने जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले. त्यांना २० हजार मानधन देण्याची घाेषणा करण्यात आली. या आदेशामुळेही पात्रताधारक बेरोजगारांमध्ये असंतोष पसरला आहे.

किचकट प्रक्रियेतून जावे लागते

डि.एड. झालेल्या उमेदवारांना भरतीसाठी पात्र होण्यासाठी आधी टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा द्यावी लागते. यानंतर ते टेटसाठी पात्र ठरतात. या प्रक्रियेमुळेसुद्धा उमेदवारांची ससेहोलपट होत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकjobनोकरी