शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सेलू-सिंदीदरम्यान रेल्वे धावणार १२० च्या स्पीडने; गाड्या रेंगाळण्याचे प्रमाण होणार कमी

By नरेश डोंगरे | Updated: March 25, 2025 18:49 IST

गुरुवारी, शुक्रवारी होणार चाचणी : थर्ड आणि फोर्थ लाइनची क्षमता तपासणार

नरेश डोंगरे, नागपूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सेलू ते सिंदीदरम्यान १८ किलोमीटरच्या थर्ड आणि फोर्थ लाइनचे काम पूर्ण झाले आहे. त्याची क्षमता आणि सुरक्षा तपासणी २७ आणि २८ मार्चला पार पडणार आहे. यावेळी या मार्गावर ताशी १२० ते १३० किलोमीटर वेगाने रेल्वे चालवून या नव्या मार्गाची क्षमता तसेच सुरक्षेची तपासणी केली जाणार आहे.

नागपूर वर्धा रेल्वे मार्गावर असलेल्या सेलू-सिंदीदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेच्या तिसऱ्या आणि चाैथ्या लाइनच काम सुरू होते. ते आता पूर्ण झाले आहे. मात्र, या नवीन लाइनवरून रेल्वे वाहतूक सुरू करण्यापूर्वी ही लाइन वाहतुकीसाठी सक्षम आणि सुरक्षित आहे की नाही, त्याची खात्री करून घेतली जाणार आहे. त्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीआरएस) वेग चाचणी (स्पीड टेस्ट) घेण्यासाठी २७ आणि २८ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने स्पीड टेस्टची तयारी केली आहे. या दोन दिवसांत या मार्गावरून रेल्वे गाडी अतिवेगात (ताशी १२० ते १३० किलोमीटर) धावणार असल्याने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. या मार्गावर काम करणारे रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नमूद तारखेला कुणीही रेल्वे मार्ग ओलांडू नये तसेच या लाइनपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गाड्या रेंगाळण्याचे प्रमाण होणार कमीनागपूर-मुंबई आणि नागपूर-चंद्रपूरला जोडणारा हा रेल्वे मार्ग असल्यामुळे या मार्गावर गाड्यांची सारखी वर्दळ असते. त्यामुळे अनेकदा दुसरी गाडी पास करण्यासाठी पहिल्या गाडीचा वेग कमी केला जातो. अर्थात अशाच प्रकारे अनेक गाड्या दिवसभरात रेंगाळतात. नवीन लाइनमुळे नागपूर ते वर्धादरम्यान रेल्वेगाड्या रेंगाळण्याचा प्रकार थांबणार आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे