शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील प्रवास ठरला 'त्याच्या' जीवनातील अखेरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 21:47 IST

Nagpur News पोटाची खळगी भरण्यासाठी पत्नी अन् दोन मुलांसह तो बंगळूरला मजुरी करण्यासाठी गेला. सुखाचा संसार सुरू असताना काम करताना तो मानेच्या भारावर पडला. डॉक्टरांनी महागडे ऑपरेशन सांगितल्यामुळे तो गावाकडे निघाला होता. परंतु प्रवासातच त्याला मृत्यूने गाठले.

ठळक मुद्देवडिलांचा मृत्यू होताच मुलांनी फोडला टाहो

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पोटाची खळगी भरण्यासाठी पत्नी अन् दोन मुलांसह तो बंगळूरला मजुरी करण्यासाठी गेला. सुखाचा संसार सुरू असताना काम करताना तो मानेच्या भारावर पडला. डॉक्टरांनी महागडे ऑपरेशन सांगितल्यामुळे तो गावाकडे निघाला होता. परंतु प्रवासातच त्याला मृत्यूने गाठले अन् वडिलांचा मृतदेह पाहून दोन्ही मुलांनी टाहो फोडला. ही हृदयद्रावक घटना नागपूर स्थानकावर शनिवारी दुपारी १.२० वाजता घडली.

रवींद्र देवी राय (४१, रा. दुधारघाट, जिल्हा समस्तीपूर, बिहार) असे मृतकाचे नाव आहे. तो मजुरीच्या कामासाठी बंगळूरला गेला होता. तेथे काम सुरू असताना तो मानेच्या भारावर पडला. डॉक्टरांनी महागडे ऑपरेशन सांगितले. परंतु ऑपरेशनसाठी तेवढे पैसे नसल्यामुळे तो पत्नी आणि दोन मुलांना घेऊन आपल्या मूळगावी निघाला होता. रेल्वेगाडी क्रमांक ०२५७८ म्हैसूर-दरभंगा विशेष रेल्वेगाडीच्या कोच क्रमांक एस ८, बर्थ क्रमांक २१ वरून तो प्रवास करीत होता. परंतु नागपूर स्थानक येण्यापूर्वी त्याची प्रकृती बिघडली. गाडीतील टीटीईने याची सूचना रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांना दिली. परंतु नागपूर स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतला. नागपूरला प्लॅटफार्म क्रमांक १ वर गाडी येताच रेल्वेच्या डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. वडील गेल्याचे पाहून दोन्ही मुलांनी टाहो फोडला. ही घटना पाहून स्थानकावर उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला आहे. अधिक तपास पुरुषोत्तम लोखंडे करीत आहेत.

 

...............

टॅग्स :Deathमृत्यू