शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शेतकरी आमिषाचे बळी

By admin | Updated: April 28, 2016 03:05 IST

वर्धा जिल्ह्यातील विठ्ठल वानोडे हे शेतकरी ‘हायटेक’ फसवणुकीची फिर्याद घेऊन बुधवारी नागपूरच्या कृषी संचालक कार्यालयात पोहचले.

शेडनेट पॉलिहाऊस शेती : कर्जबाजारी शेतकऱ्यांची शासनाकडे फिर्यादनागपूर : वर्धा जिल्ह्यातील विठ्ठल वानोडे हे शेतकरी ‘हायटेक’ फसवणुकीची फिर्याद घेऊन बुधवारी नागपूरच्या कृषी संचालक कार्यालयात पोहचले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी बँकेतून ६५ लाख रुपये कर्ज काढून एका एकर शेतीमध्ये शेडनेट पॉलिहाऊस बसविले. सुरुवातीला जरबेरा फुलाचे पीक घेतले. त्यात फायदा झाला नाही. कृषी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पुन्हा गुलाबाची शेती केली. तापमानाचा अंदाज न लागल्याने त्यातही नुकसान झाले. एखादी कंपनी असल्यासारखे व्याजासहित ६८ लाखाचे कर्ज आता त्यांच्यावर बसले असून ते फेडावे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. वानोडे यांच्यासमवेत आलेल्या शेडनेट पॉलिहाऊस शेती करणाऱ्या इतरही शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. शेडनेट पॉलिहाऊस तंत्रज्ञानाने शेती करणारे विदर्भातील हजारो शेतकरी असून त्यापैकी बहुतेकांची स्थिती वानोडे यांच्यासारखीच आहे. आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीऐवजी शेडनेट पॉलिहाऊस या आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करून भरघोस उत्पादन आणि मोठ्या कमाईचे स्वप्न दाखविण्यात आले. युवा शेतकऱ्यांना आकर्षित करून राष्ट्रीय बँकामार्फत कर्जपुरवठा करण्यात आला. मात्र चारपाच वर्षातच या ‘हायटेक’ शेतीचे पितळ उघडे पडत असल्याचे दिसून येत आहे. शेडनेट पॉलिहाऊस शेती समस्याग्रस्त शेतकरी समितीचे अविनाश काकडे यांनी सांगितले, १० गुंठे शेतीत शेडनेट लावण्यासाठी जवळपास १५ लाख रुपये खर्च येतो. म्हणजे एका एकरमध्ये जवळपास ६० लाख रुपये खर्च. हायटेक शेतीसाठी आवश्यक असलेले कुठलेही निकष शेतकऱ्यांना सांगण्यात आले नाही किंवा वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही. शेडनेट पॉलिहाऊस शेती १८ ते २५ डिग्री तापमानात यशस्वी ठरणारे तंत्रज्ञान आहे. मात्र विदर्भात आठ महिने ३० ते ४० डिग्री तापमान राहते, जे शेडनेटसाठी योग्य नाही. आवश्यक बाजारपेठ नाही आणि बाजारात उत्पादनाला भाव मिळत नाही. फूल, फळ व ताज्या भाज्या टिकवून ठेवण्यासाठी वातानुकूलित व्यवस्था बाजारात नाही. अशा एक ना अनेक समस्यांची शेतकऱ्यांना आता जाणीव होत असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे या कर्जावर बँकानी १४ टक्के व्याजदर लावल्याने हायटेक शेतीला बळी पडलेल्या शेतकऱ्यांसमोर जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाल्याचे काकडे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना एकतर संपूर्ण कर्जमाफी द्यावी किंवा सामूहिक मृत्यूची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)