शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

डिजिटल युगाचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:28 IST

डिजिटल विश्वात दीडशे लेखक आणि सव्वा लाखाहून अधिक वाचकांनी चालविलेली अनोखी साहित्य चळवळ म्हणजे ‘नुक्कड’. मोबाईल किंवा इंटरनेटवर फेसबुकसारख्या समूह माध्यमात व्यक्त होणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन येत्या १६ व १७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होऊ घातले आहे. एमएलए होस्टेल येथे ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर व गणेश कनाटे यांच्या उपस्थितीत हे अनोखे साहित्य संमेलन रंगणार आहे.

ठळक मुद्देफेसबुक पेजवरून बहरलेली साहित्य चळवळ : १६ व १७ ला आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिजिटल विश्वात दीडशे लेखक आणि सव्वा लाखाहून अधिक वाचकांनी चालविलेली अनोखी साहित्य चळवळ म्हणजे ‘नुक्कड’. मोबाईल किंवा इंटरनेटवर फेसबुकसारख्या समूह माध्यमात व्यक्त होणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन येत्या १६ व १७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होऊ घातले आहे. एमएलए होस्टेल येथे ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर व गणेश कनाटे यांच्या उपस्थितीत हे अनोखे साहित्य संमेलन रंगणार आहे.व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारखे डिजिटल युगाचे समूह माध्यम आता केवळ संवादाचे नाही तर साहित्याचेही माध्यम ठरू पाहत आहे. दररोज असंख्य तरुण व नव्या दमाचे लेखक, कवी यावर व्यक्त होऊ लागले आहेत. अशा नवसाहित्यिकांना एक हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम काही लोकांनी केले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे साहित्यिक व नाटककार विक्रम भागवत होय. भागवत यांनी पाच वर्षापूर्वी ‘न लिहिलेले पत्र’ या नावाने एक फेसबुक पेज सुरू केले. आश्चर्य म्हणजे अल्पावधीत या पेजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मानसशास्त्र, मानवी नातेसंबंध, चित्रपट समीक्षा रसग्रहण, आयुर्वेदिक मते असे साहित्यिक, सामाजिक भान जपणारे व मानवी भावभावनांचे चित्रण करणारे विषय पत्रमालिकांच्या माध्यमातून असंख्य लोकांकडून पेजवर व्यक्त होऊ लागले. आजपर्यंत सात हजाराच्यावर पत्र या पेजवरून प्रकाशित झाले. या पेजला व्यापक रूप देत भागवत यांनी सुनील गोवर्धन व जयंत पोंक्षे यांच्या सहकार्याने बुक हंगामा डॉट कॉम हे वेब स्टोअर सुरू केले. या स्टोअरवर गेल्या तीन वर्षात एक हजाराहून अधिक डिजिटल व ई-बुक्स तसेच २०० हून अधिक ऑडिओ बुक्स प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांनी नुुक्कड हे लघुकथांचे व्यासपीठ सुरू केले. विशेष म्हणजे महाराष्ट्रच नाही तर जगभरातील मराठी लेखक व वाचकांनी हे व्यासपीठ समृद्ध केले. चारोळ्यापासून कथापर्यंत सर्वच यावर प्रकाशित होऊ लागले. एक हजाराहून लघुकथा यावर प्रकाशित झाल्या. नुक्कडवरील साहित्याला साहित्य संमेलनाचे रूप आयोजकांनी दिले असून त्याचे तिसरे संमेलन नागपुरात होत आहे.संमेलनात राज्यातून १५० लेखक सहभागी होणार असल्याची माहिती संयोजक स्वाती धर्माधिकारी यांनी दिली.पहिल्या दिवशी ९.३० ते १ वाजतादरम्यान विक्रम भागवत यांच्या कथा अभिवाचनानंतर संमेलनाचे उद््घाटन होईल. गणेश कनाटे व माधवी वैद्य हे बीजभाषण करतील. यासोबतच चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्यासह ‘एक पान कवितेचे एक पान चित्रांचे’चे सादरीकरण होईल. पहिल्या सत्रात सतीश तांबे यांच्या अध्यक्षतेत ‘कथा आता कुठे’ विषयावर चर्चासत्र व नंतर ‘जगेल?’ विषयावर परिसंवाद होईल. यानंतर विविध विभागातून निवडण्यात आलेल्या ५० लेखकांना नुक्कड पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सायंकाळी डॉ. प्राजक्ता हसबनीस व साथीदारांसह ‘बोलावा विठ्ठल’ हा कार्यक्रम सादर होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता नाट्यकर्मी सदानंद बोरकर यांच्यासह झाडीपट्टी रंगभूमीवर सादरीकरण होईल. यानंतर नुक्कड साथीदारांसह कवी संमेलन व दुसऱ्या सत्रात स्वाती धर्माधिकारी यांच्यासह नुक्कड कथा अभिवाचन होईल. दुपारी ३.३० वाजता संमेलनाचा समारोप होईल.

 

टॅग्स :digitalडिजिटलliteratureसाहित्य