शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक ! पालकांनी मुले वाढवायची की वाचवायची?

By राजेश शेगोकार | Updated: November 24, 2025 13:26 IST

Nagpur : मानसिक तणावाला शब्द नसतात आणि जेव्हा तो सहनशक्तीच्या पलिकडे जातो, तेव्हा मुले कायमची गप्प होण्याचा निर्णय घेतात आणि इथेच आपण हरतो. या 'आपण'मध्ये पालक, शिक्षक व समाज याचाही समावेश होतो.

राजेश शेगोकारनागपूर : घटना क्रमांक १: नागपुरातील चणकापूर येथील आठतीत शिकणान्या १३ तर्षीय विद्यार्थिनीने मोबाइल दिला नाही म्हणून राग आल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिव्या सुरेश कोठारे, असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नात आहे.

घटना क्रमांक २: मूलच्या सांगलीच्या असलेल्या शौर्य पाटील या विद्यार्थ्यांने दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनवर आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने चिड्डीत लिहून ठेवले. 

घटना क्रमांक ३: चंद्रपूरच्या जनता करिअर लॉन्चरच्या वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या प्रथमेश गुलाब चुधरी रा. धानोरी पिपरी, या विद्यार्थ्याने तसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली.

या तिन्ही घटना सरत्या आठवडचात घडल्या आहेत, यामधील स्थळ, नावे, कारणे वेगवेगळी असली तरी 'विद्यार्थी' हा समान धागा आहे. खरंतर या प्रातिनिधिक घटना आहेत. अशा घटना देशभरात रोज कुठे ना कुठे घडत असतात, ज्या वयात नवी स्वप्न पाहायची, आईवडील, शिक्षकांच्या मदतीने ती फुलवायची, त्या वयात या विद्यार्थ्यांची दिशा का चुकावी, याची चिंता नाही तर गांभीर्याने चिंतन करण्याची वेळ आली आहे.

एकीकडे या घटना घढ़त असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचा अहवाल समोर आला आहे हा अहवाल धक्कादायकच नव्हे तर आपल्या संपूर्ण व्यवस्थेतर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. दहावी व बारातीच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक असणे म्हणजेच हा वयसमूह सर्वांत असुरक्षित ठरत आहे. शिक्षण, स्पर्धा आणि करिअरच्या नावाखाली आपण आपल्या मुलांना आनंदापासून दूर आणि दडपणाखाली ढकलतोय का? आजची मुले अधिक बुद्धिमान, तंत्रज्ञाननेही आणि स्पर्धात्मक आहेत. पण, भावनिक सहनशक्ती मात्र आजही नाजूकच आहे. अपेक्षांचे ओझे, सततचे मूल्यांकन, रैंक आणि मार्कांच्या मागे सुरू झालेली शर्यत मुलांना थकवते आहे. अपयश म्हणजे आयुष्य संपले, असा चुकीचा समज त्यांच्या मनात दृढ होत आहे.

पालक, शिक्षक किंवा समाजाने दिलेल्या "परिपूर्णतेच्या मापदंडांना पोहोचता न आल्यास त्यांना स्वताचे मूल्याच कमी वाटू लागते. काही मुले सोशल मीडियाच्या आहारी जातात, अभासी जगालाच आपले विश्व समजून कतटाळतात अखेर कपाळमोक्षाशिवाय हाती काहीच लागत नाही.

मानसिक तणावाला शब्द नसतात आणि जेव्हा तो सहनशक्तीच्या पलिकडे जातो, तेव्हा मुले कायमची गप्प होण्याचा निर्णय घेतात आणि इयेच आपण हरतो. या 'आपण'मध्ये पालक, शिक्षक व समाज याचाही समावेश होतो. दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनतर आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांने तर माझे अवयवदान करा, असे लिहून ठेवले, जाताना एवढे सामाजिक भान असणारा हा मुलगा आयुष्याची लढाई नेमका हरला कुठे?

समाजानेही बदलायला हवे. यशाचे मापदंड ठरवितांना जे मागे राहिले ते नालायकच आहेत असे शिक्के मारणे थांबवले पाहिजे त्यामुळेच विद्यार्थ्यांची आत्महत्या ही केवळ एक व्यक्तिगत शोकांतिका नाही; ती संपूर्ण व्यवस्थेचा अपयशाचा पुरावा आहे. अशा घटना घडल्या की चिंतन मनन सुरू हाेते. समाजासकट सर्व व्यवस्था श्रद्धांजलीला तयारच असते पण उपायांचे काय,  आजची वेळ ही दोषारोपाची नाही; ती आत्मपरीक्षणाची आहे. मुलांचे आयुष्य, भविष्य आणि मानसिक स्वास्थ्य सुरक्षित ठेवणे हीच आज शिक्षणक्षेत्र, कुटुंब आणि समाज पुढे असलेली सर्वात मोठी जबाबदारी आहे. आपण मुलांना भविष्यातील यंत्र तयार करतोय की संवेदनशील माणूस, मुलांचे मार्क वाढवायचे की त्यांना वाचवायचे निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra leads in student suicides: Raising children or saving them?

Web Summary : Maharashtra sees alarming student suicides. Pressure from studies, career expectations, and social media contribute. Experts urge parents, educators, and society to prioritize emotional well-being, fostering resilience over relentless competition to prevent tragic losses.
टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य