शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘तोंडी’ बंद झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांवर गुणांचा तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:20 IST

एरवी दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यासोबत संपूर्ण कुटुंबदेखील एका प्रकारे तणावातच असते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे.

ठळक मुद्देगुणांची कोंडीयंदा निकाल घटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यासोबत संपूर्ण कुटुंबदेखील एका प्रकारे तणावातच असते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल केला आहे. चार विषयांची तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देणे यंदापासून बंद करण्यात आले. शाळांकडून हे गुण सहजपणे देण्यात यायचे. परिणामी विद्यार्थ्यांसमोर या गुणांची भरपाई करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते यामुळे यंदा निकाल घटण्याची शक्यता आहे. गुणांच्या या बदलांमुळे विद्यार्थ्यांवरील तणाव वाढला असून घरोघरी याची प्रचिती येत आहे.शिक्षण मंडळातर्फे अभ्यासक्रम पुनर्रचनेच्या आधारे विषय रचनेत व गुणप्रणालीत बदल करण्यात आले. दहावीत विद्यार्थ्यांना तीन भाषा विषय अनिवार्य आहेत. मागील वर्षीपर्यंत या विषयाचे मूल्यमापन हे लेखी व तोंडी परीक्षांच्या आधारावर व्हायचे. ८० गुण लेखी परीक्षेचे व २० गुण तोंडी परीक्षेचे रहायचे. यातील तोंडी परीक्षांचे गुण शाळांच्या हाती असायचे व त्यात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळायचे. मात्र यंदा तोंडी परीक्षा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. भाषा विषयात २० गुणांचा हा फरक भरून काढणे ही कठीण बाब मानली जाते.दुसरीकडे सामाजिकशास्त्र विषयात १०० पैकी २० गुण प्रकल्पांवर असायचे. सहाजिकच विद्यार्थ्यांना यात चांगले गुण मिळत. मात्र यंदा सामाजिकशास्त्राचे मूल्यमापन पूर्णत: लेखी परीक्षेच्या आधारावर होणार आहे. भाषा व सामाजिकशास्त्रे हे विषय मिळून विद्यार्थ्यांच्या हक्काचे एकूण ८० गुण हातातून गेले आहेत. हे गुण विद्यार्थ्यांना लेखी परीक्षांच्या माध्यमातूनच मिळवावे लागणार आहे. सहाजिकच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल घटणार आहे. मागील वर्षी एखाद्या विद्यार्थ्याला ९५ टक्के असतील, तर त्याच गुणवत्तेच्या विद्यार्थ्याला यंदा ८३ ते ८५ टक्के मिळविताना नाकीनऊ येणार आहेत. हीच बाब सर्व विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे.विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेच पाहिजे, अशी पालकांना अपेक्षा असते. अनेकदा यासाठी दबावदेखील टाकण्यात येतो. मात्र यंदाची गुणप्रणाली बदलल्याने ९० टक्क्यांच्या वर जाणे ही मोठी बाब राहणार आहे. मात्र बऱ्याच पालकांनी ही बाबच समजून घेतली नसल्याने विद्यार्थ्यांवर गुण मिळविण्याचा मोठा तणाव निर्माण झाला आहे.

भाषेचा निकाल घटणारविद्यार्थ्यांना दहावीत भाषेचे तीन विषय अनिवार्य असतात. मागील वर्षीपर्यंत या एकूण ३०० गुणांच्या तीन विषयांसाठी विद्यार्थ्यांना ६० गुण तोंडी परीक्षेचे राखीव असायचे. यातील साधारणत: ४० ते ५० च्या वरच गुण विद्यार्थ्यांना मिळायचे. मात्र यंदा तोंडी परीक्षाच बंद झाल्याने हे गुण लेखी परीक्षेच्या माध्यमातून प्राप्त करावे लागणार आहे. त्यामुळे भाषेचा निकाल घटणार असल्याचेच दिसून येत आहे.पालकांचे समुपदेशन आवश्यकयासंदर्भात सोमलवार हायस्कूल, निकालस येथील मुख्याध्यापक विवेक जोशी यांना संपर्क केला असता त्यांनी यंदा निकालातील गुणवंतांचे गुण कमी होतील असे सांगितले. नवीन गुणप्रणालीमुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. पालकांना गुणप्रणालीची जाणीव असली तरी त्यांची विद्यार्थ्यांकडून ९० टक्क्यांहून अधिक गुणांची अपेक्षा कायम आहे. मात्र यामुळे निकालानंतर विद्यार्थी व पालकांना धक्का बसू शकतो. यासाठी विद्यार्थी व पालकांचे योग्य समुपदेशन होणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या शाळेत यादृष्टीने अगोदरच पुढाकार घेतला असून नवीन गुणप्रणाली नेमकी कशी आहे याची माहिती त्यांना देत आहोत. भाषांमधील ६० गुण पूर्णत: मिळणार नाही असे नाही. फक्त विद्यार्थ्यांना ते कमवायचे आहे. तोंडी परीक्षेत जास्त गुण मिळायचे, लेखीमध्ये ३५ किंवा ४० तर मिळतील. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा, असे ते म्हणाले.

पालकांची भूमिका महत्त्वाचीजुन्या गुणप्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे खरे मूल्यमापन होत नव्हते. मात्र आता क्षमतांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. अगोदर गुणांची सूज होती, आता ती उतरणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता परीक्षेतून समोर येणार आहेत. भविष्याच्या दृष्टीने हे जास्त चांगले आहे. पालक व विद्यार्थ्यांनी गुण डोळ््यासमोर ठेवून विचार करू नये. विशेषत: पालकांनी अवास्तव अपेक्षा विद्यार्थ्यांवर लादू नये. घरी विद्यार्थ्यांवर गुणांचा तणाव आणण्याऐवजी त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल, यावर भर द्यायला हवा, असे मत समुपदेशक व ‘सायकोलॉजिस्ट’ प्रा.राजा आकाश यांनी व्यक्त केले.

टॅग्स :examपरीक्षा