शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

कॅनमधून थंड पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 8:46 PM

मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून केवळ थंड पाणी विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.

ठळक मुद्देअ.भा.ग्राहक पंचायतची : प्रशासनाकडून तक्रारीची दखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून केवळ थंड पाणी विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्नसमारंभ व कार्यक्रमांमध्ये गावागावांत आणि शहरांमध्ये पाण्याच्या कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली केवळ थंड पाण्याची विक्री करण्यात येत आहे. पाण्याची सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्याची मागणी पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे.पाणी खरोखरच शुद्ध आहे का? हा गंभीर मुद्दा आहे. नळ्याच्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता केवळ थंड पाणी आपल्या गळी उतरवले जाते, ही वस्तुस्थिती आहे. याकडे आरोग्य विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यूव्ही स्टरीलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन इत्यादी प्रक्रिया करूनच हे पाणी कॅनद्वारे उपलब्ध करायला हवे. २० लिटर एक कॅन (प्रत्यक्षात १७ लिटर) २० ते ४० रुपयांपर्यंत विकण्यात येते. हा खेळ प्रशासनाच्या लक्षात का येत नाही, असा सवालही ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे. अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कुठलीही चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्रार वारंवार अन्न व औषधी प्रशासन, वैधमापनशास्त्र विभागाकडे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आली आहे. परंतु याची प्रशासन गंभीर दखल घेत नाही, असा आरोपही पांडे यांनी केला आहे.कॅनमधून पाणी विक्री करणारे कारखाने शहरात गल्लीबोळात आहेत. त्यांच्यावर अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैधमापनशास्त्र विभागाचे कुठलेही नियंत्रण नाही. थंड पाण्याच्या कॅनची प्रत्यक्षात किंमत किती? विकले जाणारे पाणी आरोग्याला फायद्याचे आहे का? विक्रीचे परवाने आहेत का? कारखान्याला परवानगी कुणी दिली, यासंदर्भात विस्तृत माहिती प्रशासनाने ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गजानन पांडे यांच्यासह प्रांत सचिव संजय धर्माधिकारी, जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे, अशोक पात्रीकर, सहसंघटनमंत्री नरेंद्र कुळकर्णी, प्रांत महिला प्रमुख तृप्ती आकांत, अ‍ॅड. स्मिता देशपांडे, श्रीपाद भट्टलवार, विनोद देशमुख, श्रीपाद हरदास, उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, संध्या पुनियानी, विलास ठोसर आणि इतर पदाधिकारी यांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीagitationआंदोलन