शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रभक्तीच्या कवितांनी स्वामी विवेकानंदांना आदरांजली

By admin | Updated: November 13, 2014 00:52 IST

स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या धारदार वाणीने आणि तेजाने आपला प्रभाव सोडणारे व्यक्तिमत्त्व. ‘सिस्टर्स अ‍ॅण्ड ब्रदर्स आॅफ अमेरिका...’ या शब्दांनी शिकागोला आपल्या भाषणाचा प्रारंभ करून धर्मसंसदेत

सनातन योगा श्रीनचा उपक्रम : मान्यवर समाजसेवकांचा सत्कार नागपूर : स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या धारदार वाणीने आणि तेजाने आपला प्रभाव सोडणारे व्यक्तिमत्त्व. ‘सिस्टर्स अ‍ॅण्ड ब्रदर्स आॅफ अमेरिका...’ या शब्दांनी शिकागोला आपल्या भाषणाचा प्रारंभ करून धर्मसंसदेत स्वामी विवेकानंदांनी जगातील साऱ्या धर्मगुरूंना जिंकून घेतले. टाळ्यांचा कडकडाट त्यावेळी थांबत नव्हता. तो दिवस होता ११ सप्टेंबर १८९३. भारतीय संस्कृतीचे दर्शन स्वामींनी त्यांच्या भाषणातून जगाला करून दिले आणि तेव्हापासून हिंदू धर्माची महती जगाला कळली. त्यांच्या भाषणाला १२१ वर्षे यंदा पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त सनातन योगा श्रीन या पारंपरिक योग संस्थेतर्फे राष्ट्रभक्तीच्या कवितांचा ‘जननी जन्मभूमी’ कार्यक्रम आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन १५ नोव्हेंबर रोजी साई सभागृहात सायंकाळी ७ वाजता करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत योगाचार्य केदार जोशी यांनी दिली. या कार्यक्रमात राष्ट्रीय कवी डॉ. व्ही. पी. सिंंग कविता सादर करणार आहेत. सिंग मेडिसीनचे प्राध्यापक असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. आतापर्यंत त्यांचे अनेक कार्यक्रम झाले असून, विविध खाजगी दूरचित्रवाहिन्यांवरही त्यांचे कार्यक्रम गाजले आहेत. त्यांचा ‘रक्तांजली’ हा कारगीलची वेदना सांगणारा कवितासंग्रह गाजला आहे. लोकमतने त्यांच्या अनेक कविता प्रकाशित के ल्या आहेत. या कवितासंग्रहाचे प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले. सनातन योगा श्रीन ही संस्था हटयोग आणि राजयोगाचा प्रसार आध्यात्मिक उन्नतीसाठी करीत आहे. या कार्यक्रमातून मिळणारा निधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट, रोटरी क्लबच्या पालिएटिव्ह कॅन्सर केअर डोनेशन आणि स्नेहांचल या कॅन्सरग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांना मुख कर्करोग झाला होता; पण अखेरपर्यंत त्यांचे कार्य अखंडित सुरू राहिले. विवेकानंदांना आदरांजली वाहताना कॅन्सरग्रस्तांच्या आयुष्यात एक सुखद फुंकर टाकण्याचे कार्य यानिमित्ताने साधण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करून एका चांगल्या कार्यात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन डॉ. अर्चना पटेल, डॉ. लोकेंद्र सिंग, डॉ. सुधीर नेरळ, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विलास काळे, कर्नल सुनील देशपांडे, सविता संचेती यांनी केले आहे. या कार्यक्रमात ‘सत्य सनातन अवार्ड’ने समाजासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. यात पॅथालॉजिस्ट डॉ. शोभा ग्रोव्हर, सीम्सचे संचालक डॉ. जी. एम. टावरी, स्थापत्यशास्त्रज्ञ अवंतिका चिटणवीस, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे, स्वामिनी ब्रम्हप्रकाशानंद सरस्वती आणि राष्ट्रीय कवी डॉ. व्ही. पी. सिंग यांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमीटेडचे चेअरमन आणि खा. विजय दर्डा, खा. अजय संचेती, कविराज ट्रस्टच्या सविता संचेती, बैद्यनाथ लाईफ सायन्सेस, इंडियन आर्मी जीआरसी कामठी, जयका क्रॉसवर्ड आणि दोसा प्लाझा यांनी आर्थिक सहकार्य दिले आहे. या कार्यक्रमाचे प्रवेशपत्र सनातन योगा श्रीन, बैद्यनाथ लाईफ सायन्सेस, हिस्लॉप कॉलेज समोर, सिव्हिल लाईन्स येथे उपलब्ध आहेत, असे योगाचार्य केदार जोशी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. अर्चना पटेल, मिनू भंडारी, निधी काळे, शिवाली देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)