शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या विश्रामगृहात समस्यांचा मुक्काम

By admin | Updated: May 22, 2015 02:55 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन खेड्यापाड्यात जाणाऱ्या एसटीमुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे.

दयानंद पाईकराव नागपूर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन खेड्यापाड्यात जाणाऱ्या एसटीमुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. परंतु प्रवाशांची खऱ्या अर्थाने सेवा करणारे एसटीचे चालक-वाहकच समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या विश्रांतीगृहात सुविधांपेक्षा समस्याच अधिक असल्यामुळे थोडी विश्रांती तर सोडा या विश्रामगृहात बसण्याची इच्छा होणार नाही, अशी येथील स्थिती असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून स्पष्ट झाले.महाराष्ट्रातील प्रवाशांना सुविधा देण्यात एसटी महामंडळ अग्रेसर आहे. परंतु एसटीचा कणा असलेल्या चालक वाहकांनाच समस्यांना तोंड देण्याची पाळी आली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानकावर चालक-वाहकांना विश्रांती घेण्यासाठी विश्रांतीगृह आहे. नागपुरात विविध जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणावरून चालक-वाहक येतात. त्यांना विश्रांती घेण्यासाठी या विश्रांतीगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु या विश्रांतीगृहात सुविधा कमी आणि समस्याच अधिक आहेत. विश्रांतीगृहाची अवस्था जाणून घेतली असता तेथे उपस्थित चालक-वाहकांनी समस्यांचा पाढाच वाचला. विश्रांतीगृहात कर्मचाऱ्यांसाठी भोजनकक्ष आहे. परंतु या भोजनकक्षाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. भोजनकक्षात स्वच्छ वातावरणाऐवजी कचऱ्याचा ढीग साचल्याचे दृश्य दिसले. स्वच्छतागृहातही कमालीची दुर्गंधी येत होती. बाहेरगावावरून येणाऱ्या चालक-वाहकांना झोपण्यासाठी मोठा हॉल आहे. परंतु या हॉलमध्ये साध्या सतरंजीची सोय करण्यात आलेली नव्हती. हॉलमधील फरशीवर प्रचंड घाण साचलेली होती. याच स्थितीत कर्मचाऱ्यांना येथे विश्रांती करावी लागत आहे. दुपारी ३ वाजता या हॉलच्या बाजूला असलेल्या माठातून पिण्याचे पाणी घेण्यासाठी एक कर्मचारी आला असता माठात पाणीच नसल्यामुळे त्याला आल्यापावली परत जाण्याची पाळी आली. याशिवाय या पिण्याच्या माठाजवळ घाण पाणी साचल्याचे दिसले. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागपुरात कडक उन पडत असल्यामुळे या हॉलमध्ये एसटी महामंडळाने किमान एक कुलर लावण्याची गरज होती. परंतु कुलरची व्यवस्थाच येथे नसल्यामुळे उकाड्यात विश्रांती करण्याची पाळी कर्मचाऱ्यांवर आली आहे.