शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

शारीरिक, मानसिक, सामाजिक स्तरावर अ‍ॅक्टीव्ह रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:26 IST

वयोमान वाढले आहे. आज व्यक्ती ७० आणि त्याहून जास्त वर्षे जगत आहे. यामुळे शरीरातील महत्त्वाचा अवयव मेंदूच्या आरोग्याची जबाबदारी वाढली आहे.

ठळक मुद्देशैलेश पानगावकर यांचे आवाहन : जागतिक अल्झायमर दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयोमान वाढले आहे. आज व्यक्ती ७० आणि त्याहून जास्त वर्षे जगत आहे. यामुळे शरीरातील महत्त्वाचा अवयव मेंदूच्या आरोग्याची जबाबदारी वाढली आहे. ‘अल्झायमर’ला दूर ठेवायचे असेल तर शारीरिक, मानसिक व सामाजिक स्तरावर ‘अ‍ॅक्टीव्ह’ राहायला हवे. योग्य आहार व नियमित व्यायामाकडे लक्ष द्यायला हवे, असे आवाहन मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर यांनी येथे केले.सायकॅट्रीक सोसायटी नागपूरच्यावतीने रविवारी शंकरनगर येथील साई सभागृहात जागतिक अल्झायमर दिवस साजरा करण्यात आला. ‘वृद्धावस्थेतील समस्या’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पानगावकर म्हणाले, अल्झायमर डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात रुग्णाची स्मरणशक्ती, विचार क्षमता, वागण्याची पद्धत, आकलन, व्यक्तिमत्त्व आणि आजूबाजूच्या परिसरातील माहिती जाणून घेण्याची क्षमता लोप पावत जाते. त्यामुळे जेवण, गाडी चालवणे, कॉम्प्युटरवर काम करण्यासारख्या साध्या गोष्टीही जमत नाहीत. या सर्व कामासाठी आवश्यक असलेल्या मेंदूतील पेशी (न्यूरॉन्स) हळूहळू लोप पावतात. त्यामुळे मेंदू आकुंचन पावतो. या आजाराची लक्षणे दिसण्याआधी बºयाच वर्षांपासून या पेशी काम करेनाशा झालेल्या असतात. मात्र महत्त्वाच्या कामासाठीच्या भागातील पेशींमध्ये लक्षणीय कपात झाल्यावरच लक्षणे दिसू लागतात. या आजारावर कोणताही उपाय नाही. आजार पहिल्या टप्प्यात असताना औषधांनी आजाराचा वेग कमी करता येतो. औषधांशिवाय कुटुंबीयांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो, असेही ते म्हणाले.कार्यक्रमात डॉ. नेहा सालनकर, डॉ. दीपिका सिंग, अ‍ॅड. करण सचदेवा, डॉ. रेणुका मार्इंदे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पवन अडतिया, डॉ. सागर चिद्दरवार, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे यांनी परिश्रम घेतले.डॉ. पानगावकर म्हणाले, अयोग्य जीवनशैलीमुळे पन्नाशीत अल्झायमर वाढत आहे. हे वय धावपळीचे असल्याने स्वत:कडे दुर्लक्ष होते. विशेषत: ज्यांना मधुमेह व उच्चरक्तदाब आहे त्यांचे यावर नियंत्रण राहत नाही. औषध नियमित घेत नाही, व्यायाम करीत नाही, सतत तणावात राहत असल्याने मेंदूच्या पेशी नष्ट होतात. यामुळे योग्य जीवनशैली आत्मसात करणे अतिशय महत्त्वाचे आहे.रोखथाम महत्त्वाचीडॉ. पानगांवकर म्हणाले, अल्झायमरवर कोणताही प्रतिबंधात्मक उपाय सापडलेला नाही. मात्र निरोगी राहणे, नियमित व्यायाम, मेंदूला चालना देणारे प्रकार, योग्य आहार, यामुळे अल्झायमर आजार पुढे ढकलला जाऊ शकतो. अल्झायमरविषयी जनजागृती केल्यास या आजाराचे लवकर निदान होऊन रुग्णाला अधिक योग्य आयुष्य जगण्यासाठी मदत होऊ शकते.योग्य आहार घ्याभारतीय आहार उत्कृष्ट आहे. परंतु वयासोबत दात गळून पडत असल्याने चावून खाण्याचे पदार्थ या वयात कमी पडतात. यामुळे या वयात आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. विशेषत: उकडलेल्या भाज्या, व्हिटॅमिनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. योग्य आहारासोबतच कोवळं उन्ह अंगावर पडू द्या, असेही डॉ. पानगांवकर म्हणाले,