शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शारीरिक, मानसिक, सामाजिक स्तरावर अ‍ॅक्टीव्ह रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:26 IST

वयोमान वाढले आहे. आज व्यक्ती ७० आणि त्याहून जास्त वर्षे जगत आहे. यामुळे शरीरातील महत्त्वाचा अवयव मेंदूच्या आरोग्याची जबाबदारी वाढली आहे.

ठळक मुद्देशैलेश पानगावकर यांचे आवाहन : जागतिक अल्झायमर दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयोमान वाढले आहे. आज व्यक्ती ७० आणि त्याहून जास्त वर्षे जगत आहे. यामुळे शरीरातील महत्त्वाचा अवयव मेंदूच्या आरोग्याची जबाबदारी वाढली आहे. ‘अल्झायमर’ला दूर ठेवायचे असेल तर शारीरिक, मानसिक व सामाजिक स्तरावर ‘अ‍ॅक्टीव्ह’ राहायला हवे. योग्य आहार व नियमित व्यायामाकडे लक्ष द्यायला हवे, असे आवाहन मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर यांनी येथे केले.सायकॅट्रीक सोसायटी नागपूरच्यावतीने रविवारी शंकरनगर येथील साई सभागृहात जागतिक अल्झायमर दिवस साजरा करण्यात आला. ‘वृद्धावस्थेतील समस्या’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पानगावकर म्हणाले, अल्झायमर डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात रुग्णाची स्मरणशक्ती, विचार क्षमता, वागण्याची पद्धत, आकलन, व्यक्तिमत्त्व आणि आजूबाजूच्या परिसरातील माहिती जाणून घेण्याची क्षमता लोप पावत जाते. त्यामुळे जेवण, गाडी चालवणे, कॉम्प्युटरवर काम करण्यासारख्या साध्या गोष्टीही जमत नाहीत. या सर्व कामासाठी आवश्यक असलेल्या मेंदूतील पेशी (न्यूरॉन्स) हळूहळू लोप पावतात. त्यामुळे मेंदू आकुंचन पावतो. या आजाराची लक्षणे दिसण्याआधी बºयाच वर्षांपासून या पेशी काम करेनाशा झालेल्या असतात. मात्र महत्त्वाच्या कामासाठीच्या भागातील पेशींमध्ये लक्षणीय कपात झाल्यावरच लक्षणे दिसू लागतात. या आजारावर कोणताही उपाय नाही. आजार पहिल्या टप्प्यात असताना औषधांनी आजाराचा वेग कमी करता येतो. औषधांशिवाय कुटुंबीयांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो, असेही ते म्हणाले.कार्यक्रमात डॉ. नेहा सालनकर, डॉ. दीपिका सिंग, अ‍ॅड. करण सचदेवा, डॉ. रेणुका मार्इंदे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पवन अडतिया, डॉ. सागर चिद्दरवार, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे यांनी परिश्रम घेतले.डॉ. पानगावकर म्हणाले, अयोग्य जीवनशैलीमुळे पन्नाशीत अल्झायमर वाढत आहे. हे वय धावपळीचे असल्याने स्वत:कडे दुर्लक्ष होते. विशेषत: ज्यांना मधुमेह व उच्चरक्तदाब आहे त्यांचे यावर नियंत्रण राहत नाही. औषध नियमित घेत नाही, व्यायाम करीत नाही, सतत तणावात राहत असल्याने मेंदूच्या पेशी नष्ट होतात. यामुळे योग्य जीवनशैली आत्मसात करणे अतिशय महत्त्वाचे आहे.रोखथाम महत्त्वाचीडॉ. पानगांवकर म्हणाले, अल्झायमरवर कोणताही प्रतिबंधात्मक उपाय सापडलेला नाही. मात्र निरोगी राहणे, नियमित व्यायाम, मेंदूला चालना देणारे प्रकार, योग्य आहार, यामुळे अल्झायमर आजार पुढे ढकलला जाऊ शकतो. अल्झायमरविषयी जनजागृती केल्यास या आजाराचे लवकर निदान होऊन रुग्णाला अधिक योग्य आयुष्य जगण्यासाठी मदत होऊ शकते.योग्य आहार घ्याभारतीय आहार उत्कृष्ट आहे. परंतु वयासोबत दात गळून पडत असल्याने चावून खाण्याचे पदार्थ या वयात कमी पडतात. यामुळे या वयात आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. विशेषत: उकडलेल्या भाज्या, व्हिटॅमिनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. योग्य आहारासोबतच कोवळं उन्ह अंगावर पडू द्या, असेही डॉ. पानगांवकर म्हणाले,