शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मराठीत स्थिरावली, आता बोलीभाषेतही गजल व्हाव्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:13 IST

आता मराठीच्या भगिनी असलेल्या बोलीभाषांमध्येही गजल व्हाव्या तरच, मराठीने पूर्णत: गजल व्यापली असे म्हणता येईल. अशी भावना गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे गजलनवाज भीमराव पांचाळे यांची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उर्दू ही मराठी गजलेची जननी आहे आणि हळूहळूच का होईना मराठीने गजलेमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आता मराठीच्या भगिनी असलेल्या बोलीभाषांमध्येही गजल व्हाव्या तरच, मराठीने पूर्णत: गजल व्यापली असे म्हणता येईल. अशी भावना गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. ते एका खाजगी कार्यक्रमानिमित्त नागपूरला आले असता पत्रकारांशी बोलत होते.मराठीत गजल आता स्थिरावली असे म्हणता येईल. मात्र, व्यापक अर्थाने गजल मराठीत रुजायची असेल तर बोलीभाषांनीही गजल स्वीकारायला हवी. खान्देशातील काही मंडळींनी मराठीज गजल लिहून पाठविल्या होत्या. तेव्हा त्यांना तुमच्या बोलीभाषेत अहिराणीमध्ये गजल लिहा, असा आग्रह धरला. तेव्हापासून अहिराणी, गोंडी, कोंकणी, वºहाडी बोलीभाषेत मोठ्या प्रमाणात गजल लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. झाडीबोलीमध्ये अजून तरी गजल लिहिण्यास सुरुवात झाली नाही. मात्र, पुढेमागे त्याही बोलीभाषेत गजल येतील, असा आशावाद पांचाळे यांनी व्यक्त केला. मराठीमध्ये गजल स्थिरावली असली तरी त्याचा वेग कमी आहे. जे अभिजात असते, त्याचा वेग कमी आणि प्रवास अवघडच असतो. तो हळूहळू रुचतो, रुजतो आणि त्याचा आनंद जसजसा घेता येतो, तसतसा अभिजात कला हृदयात उतरत असल्याचेही ते म्हणाले. १९७२ साली मी पहिली मैफिल केली होती. तेव्हापासून गेल्या ४८ वर्षाचा आनंद मी घेतला आहे. आज मला मराठी गजल कार्यक्रमांसाठी १७-१८ देशांतून सातत्याने आमंत्रणे येतात. सुरेश भटांच्या काळात ७०-८० गजल लिहिणारे होते. आज ५०० च्या वर मराठी गजलकार आहेत. नऊ मराठी गजल संमेलने झाली आणि १०८ मराठी गजलेच्या कार्यशाळा झाल्या आहेत. त्यामुळे, हळूहळू मराठी गजल नवी पिढीही स्वीकारत असल्याचे भीमराव पांचाळे म्हणाले.

टॅग्स :marathiमराठीmusicसंगीत