शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

एसपीजीचे रिपोर्टिंग अन् पीएमओचा रेड सिग्नल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 10:47 IST

नागपुरात असलेल्या एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप)च्या अधिकाऱ्यांनी धोक्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पीएमओला नागपूर दौऱ्यातील अडथळे कळविले अन् पीएमओकडून शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी यांच्या शनिवारच्या नागपूर दौऱ्याला ‘रेड सिग्नल’ दाखवला.

ठळक मुद्दे ८० मिनिटांचा होता पंतप्रधानांचा नागपुरातील प्रवास ८ विशेष वाहनांसह ७५ वाहनांचा ताफा होता सज्ज विशेष सुरक्षा पथकांनी गाठले होते नागपूर ठिकठिकाणचे बीडीडीएसही दाखल

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो स्थानकाचे उद्घाटन आणि अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपुरातील रस्त्यांवर कारने ८० मिनिटांचा प्रवास करणार होते. त्यामुळे दिल्लीतील नेहमीच्या ताफ्यातील (कॅन्वॉय) आठ विशेष वाहने गुरुवारी रात्री नागपुरात पोहचली होती. दिल्ली-मुंबईसह ठिकठिकाणचे बीडीडीएस स्क्वॉडही आले होते. अतिरिक्त पाच बुलेट प्रूफ वाहने बोलावून ठेवण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणां ही सर्व जमवाजमव करीत असताना पाऊस मात्र मानायला तयार नव्हता. त्याने शुक्रवारी सकाळपासूनच नागपूरच्या रस्त्यांना नद्यांचे रूप दिल्याने सुरक्षा यंत्रणांवरचा ताण वाढला. नागपुरात असलेल्या एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप)च्या अधिकाऱ्यांनी धोक्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पीएमओला नागपूर दौऱ्यातील अडथळे कळविले अन् पीएमओकडून शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी यांच्या शनिवारच्या नागपूर दौऱ्याला ‘रेड सिग्नल’ दाखवला.नियोजित दौऱ्यानुसार, पंतप्रधान मोदी शनिवारी दुपारी ४.२० वाजता नागपूर विमानतळावर येणार होते. तेथून मेट्रो स्थानकावर, सीताबर्डी-लोकमान्यनगर मेट्रो स्थानकाचे उद्घाटन केल्यानंतर मानकापूर क्रीडा संकुलात आणि तेथील कार्यक्रम आटोपून ते विमानतळावर पोहचणार होते. पंतप्रधानांचा नागपूरच्या रस्त्यावरचा हा प्रवास साधारणत: ८० मिनिटांचा असेल, असा निष्कर्ष सुरक्षा यंत्रणांनी काढला होता. त्यामुळे कार्यक्रमस्थळांसह रस्त्यावरचा बंदोबस्त (रोड सिक्युरिटी) कशी असेल, त्याचा आराखडा सुरक्षा यंत्रणांनी तयार केला होता.सुरक्षा व्यवस्थेचे (बंदोबस्त)नियोजन करण्यासाठी दिल्लीहून एसपीजी आणि मुंबईहून विशेष सुरक्षा पथके गुरुवारीच नागपुरात आली होती. बाह्य सुरक्षेसाठी ११ पोलीस उपायुक्तांसह एकूण २४०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पंतप्रधानांसाठी दिल्लीहून आठ विशेष वाहने बोलावून घेण्यात आली होती. स्थानिक व रेंजमधील पाच बुलेट प्रूफ वाहनेही तयार ठेवण्यात आली होती. याशिवाय एकूण ७५ वाहनांचा ताफा सज्ज करण्यात आला होता. नागपुरात दिवसभर पावसाचा तडाखा सुरू असताना एसपीजींचे अधिकारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह शनिवारच्या सुरक्षा व्यवस्थेची तयारी करीत होते. बॉम्बशोधक आणि नाशक पथकांनी (बीडीडीएस) आपापला मोर्चा सांभाळला होता. शुक्रवारी सकाळपासून उपराजधानीत पावसाने थैमान घातले होते.मेट्रोच्या नवनिर्मित पुलातूनही पाणी गळत होते. ते पाहून पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी (एसपीजी) पीएमओला धोक्याचा इशारा कळविला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास दिल्लीहून पंतप्रधान मोदी यांचा शनिवारचा दौरा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. ते कळल्याने प्रचंड दडपणात असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.भरपावसात रंगीत तालिमची तयारीपंतप्रधानांचा नागपूरचा नियोजित दौरा रद्द करण्यासंबंधाने एसपीजींनी पीएमओला कळविले होते. मात्र, तिकडून या संबंधाने निर्णय येण्यास विलंब होत असल्याने एसपीजी आणि स्थानिक वरिष्ठांनी भरपावसातच रंगीत तालिम करून घेण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी ६.३० वाजता ७५ वाहनांचा काफिला नियोजित दौऱ्याच्या मार्गावरून धावण्याच्या तयारीत असतानाच पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याचा मेसेज स्थानिक वरिष्ठांना मिळाला अन् साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी