शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामाची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 10:07 AM

मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामाची गती इतकी संथ आहे की, ४६ योजनांचा आराखडा तयार झाल्यानंतरही २०१८-१९ या वर्षात केवळ २८ योजनांचे कार्यारंभ आदेश मिळू शकले.

ठळक मुद्दे४६ पैकी २८ योजनाच मार्गीएक वर्ष नुसते आढावा घेण्यात गेले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीव्र पाणीटंचाई भेडसावत असलेल्या गावांसाठी गेल्या दोन वर्षापासून मुख्यमंत्री पेयजल योजना अमलात आणली. परंतु या योजनेच्या कामाची गती इतकी संथ आहे की, ४६ योजनांचा आराखडा तयार झाल्यानंतरही २०१८-१९ या वर्षात केवळ २८ योजनांचे कार्यारंभ आदेश मिळू शकले.राष्ट्रीय पेयजल योजनेमधील प्रकल्प राबविताना केंद्राचा निधी उशिरा मिळत असल्याने कामांना ब्रेक लागायचा़ त्यामुळे राज्य शासनाने आपल्या हक्काच्या निधीचा वापर करीत मुख्यमंत्री पेयजल योजना अमलात आणली़ परंतु दोन वर्षांपासून ही योजना कागदावरून पुढे सरकायचे नाव घेत नाही़त्यामुळे या योजनेची कमालीची कासवगती असल्याचे पहायला मिळते आहे़ २०१५-१६ या वर्षात ही योजना लागू करण्यात आली़ सुरुवातीच्या वर्षात तीव्र टंचाईयुक्त गावांची यादी तयार करून ती शासनाच्या पाणीपुरवठा खात्याला सादर करण्यात आली़ अंदाजपत्रकीय मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झालेत़ परंतु काही ग्रामपंचायतने ही योजना राबविण्यासाठी नकार दिल्याने ग्रामपंचायत ठरावच पाणीपुरवठा विभागाला अप्राप्त होते़ त्यामुळे २०१६-१७ हे वर्ष नुसते या योजनांचा आढावा आणि कागदी दस्ताऐवजांचा पाठपुरावा करण्यात गेले़२०१७-१८ या वर्षात ४६ पैकी ४१ योजनांना तांत्रिक मंजुरी शासनाकडून मिळाली व २८ योजनांचे कार्यारंभ आदेश काढण्यात आले़ परंतु अद्यापही प्रत्यक्षात काम सुरू करावयास अडथळे आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाच्या मदतीने ही योजना राबविण्यात येत आहे़ टप्पा क्रमांक १ मध्ये २१ योजना, टप्पा २ मध्ये ६ तर टप्पा क्रमांक ३ मध्ये १ योजना मार्गी लागणार आहे़ परंतु प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त या उन्हाळ्यात तरी होईल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे़या योजना टप्पानिहाय सुरू आहे़ तांत्रिक मान्यता जसजशी मिळत आहे़ तशा या योजनेतील कामे मार्गी लागत आहे़ संपूर्ण कामे करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन असल्याचे जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी