शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

सलग चार तास बसणे सिगारेट ओढण्याइतकेच धोक्याचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2022 19:43 IST

Nagpur News जर तुम्ही तासनतास सलग बसून काम करीत असाल तर हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अधिक वेळ बसण्याची सवय हृदयासंबंधित आजारांना आमंत्रण देते.

नागपूर : जर तुम्ही तासनतास सलग बसून काम करीत असाल तर हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अधिक वेळ बसण्याची सवय हृदयासंबंधित आजारांना आमंत्रण देते. जर तुम्हालाही घरात किंवा ऑफिसमध्ये सुमारे चार तास बसून काढत असाल, तर तुम्हालाही हृदयविकार होण्याचा अधिक धोका संभवतो. सलग चार तास बसणे सिगारेट ओढण्याइतकेच धोक्याचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या अभ्यासामधून हे समोर आले आहे. यात जे लोक दिवसभर बसून जास्त वेळ घालवतात, अशा लोकांमध्ये मृत्यूचे आणि हृदयविकाराचे प्रमाण जगातील सामान्य लोकांपेक्षा अधिक आढळून येते.

-हृदयविकाराचे वय झाले कमी

अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च ट्रायग्लिसराइड, धूम्रपान, कमी एचडीएल व पोटाचा लठ्ठपणा ही हृदयविकारामागील कारणे आहेत. पूर्वी हे आजार साठीनंतर दिसून यायचे. परंतु, आता ३५ वयोगटातही दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-सलग बसून काम करणे धोक्याचे

सलग बसून राहिल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. वाढत्या वयानुसार बसण्याचे वाईट परिणामही वाढतात. याचा अधिक त्रास स्त्रियांपेक्षा पुरुषांना होतो. यावर उपाय म्हणून ऑफिसमध्ये उभं राहून मीटिंग घेण्याचा प्रयत्न करावा. फोनवर बोलत असताना चालत राहायला हवे. त्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुरळीत होते. हृदय आणि मन दोन्ही निरोगी राहते.

-हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका

तासनतास एकाच ठिकाणी बसून राहिल्याने त्याचा परिणाम मेंदूपासून पायावर होतो. जेव्हा आपण बसतो, रक्त अधिक हळूहळू वाहते आणि स्नायू कमी चरबी जाळते. ‘अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नल’मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, ज्या स्त्रिया दररोज १० तासांपेक्षा जास्त वेळ बसतात, त्यांना पाच तासांपेक्षा जास्त वेळ न बसणाऱ्याच्या तुलनेत हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग होण्याचा धोका वाढतो.

-काय काळजी घ्या

स्वत:साठी एक नियम तयार करायला हवा. आपल्या कामाच्या जागेवरून दर अर्ध्या तासाला १ ते २ मिनिटांसाठी, तर दर दोन तासांनी १० ते १५ मिनिटांसाठी उठा आणि फक्त उठू नका, तर सक्रिया रहा, हालचाल करा, किमान चाला.

-हायरिस्क लोकांनी काळजी घ्यायला हवी

ज्यांना हृदयविकार, इतरही गंभीर आजार आहेत, वृद्ध आहेत, अशा लोकांनी एकाच ठिकाणी बसून राहू नये. यामुळे पायात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन त्या हृदयापर्यंत पोहोचून जिवाला धोका होण्याची शक्यता वाढते. विशेषत: ‘ट्रॅव्हल्स’ करताना याकडे लक्ष द्यायला हवे. हायरिस्क रुग्णांनी व इतरांनीही सक्रिय राहायला हवे.

-डॉ. निकुंज पवार, हृदयशल्यचिकित्सक

-पायातील गुठळी फुप्फुसामध्ये गेल्याने मृत्यू

एकाच ठिकणी तासनतास बसून राहिल्याने एका रुग्णाच्या पायात रक्ताची गुठळी तयार होऊन ती फुप्फुसात गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रकरण पाहण्यात आले. एकाच ठिकाणी बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढून इतर गंभीर आजार होण्याचाही धोका वाढतो.

-डॉ. प्रशांत जगताप, हृदयचिकित्सक

टॅग्स :Healthआरोग्य