शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक.. रेल्वे गाड्यांनी वर्षभरात २९४ जणांना चिरडले; जनावरांना चिरडण्याची आकडेवारी थरारक

By नरेश डोंगरे | Updated: January 10, 2026 20:06 IST

Nagpur : रेल्वेचा अपघात म्हटला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. गेल्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये देशभरात रेल्वेचे एकूण ११ अपघात झाले.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :रेल्वेचाअपघात म्हटला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. गेल्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये देशभरात रेल्वेचे एकूण ११ अपघात झाले. त्यातील चार मोठ्या अपघातात ३० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आणि ५० जण जबर जखमी झालेत. मात्र, याहीपेक्षा खतरनाक आकडेवारी आहे, दुसऱ्या रेल्वे अपघातांची. अर्थात रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्या नाही मात्र गेल्या वर्षभरात रेल्वेने विविध मार्गावर २९४ व्यक्तींना चिरडले. त्याचप्रमाणे रेल्वेची धडक बसल्याने ४८६ मुक्या जनावरांचेही बळी गेले. काळजाचे पाणी करणारी ही आकडेवारी एकट्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची आहे. या अपघाताने सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर रेल्वे अधिकाऱ्यांनाही धडकी भरली आहे.

२०२५ मधील प्रमुख रेल्वे अपघात

बिलासपूर रेल्वे अपघात (४ नोव्हेंबर २०२५): छत्तीसगडमधील बिलासपूरजवळ एक मेमू पॅसेंजर ट्रेन उभ्या असलेल्या मालगाडीला मागून धडकली. या भीषण अपघातात किमान डझनभर व्यक्तींचा मृत्यू झाला आणि अनेक प्रवासी जखमी झाले होते.

जळगाव रेल्वे दुर्घटना (२२ जानेवारी २०२५) : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आग लागल्याच्या अफवेवरून अनेकांनी ट्रेनमधून खाली उडी मारल्या होत्या. त्याचवेळी बाजुच्या ट्रॅकवरून वेगाने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिल्याने किमान १३ जणांचा मृत्यू झाला होता.

मुंबई लोकल अपघात (९ जून २०२५) : मुंबई लोकलमध्ये प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमधून पडून ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि १३ जण जखमी झाले होते.

बिहार मालगाडी रुळावरून घसरली (२७ डिसेंबर २०२५) : बिहारच्या जमुई जिल्ह्यातील लाहाबन आणि सिमुलतला स्थानकांदरम्यान मालगाडीचे ८ डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.

रेल्वेने धडक दिल्यामुळे मृत झालेल्यांची आकडेवारी

"निश्चिंतच थरारक आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा दलाकडून सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार, रेल्वे ट्रॅकच्या शेजारी राहणाऱ्या गावांगावांतील नागरिकांना खबरदारी घेण्यासाठी जनजागरण केले जाणार आहे. ट्रॅक शेजारी जनावरांना चरण्यासाठी नेऊ नये, असे आवाहनही त्यांना केले जाणार आहे."- दीपचंद्र आर्य, सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल (एसईसीआर), नागपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking: Trains Crushed 294 People, Many Animals in One Year

Web Summary : In a year, trains in Nagpur division crushed 294 people and 486 animals. Major accidents included collisions and falls from overcrowded locals, prompting safety measures and public awareness campaigns.
टॅग्स :Train Accidentरेल्वे अपघातrailwayरेल्वेAccidentअपघातnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र