शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन समितीला शाळांचा ठेंगा

By admin | Updated: January 12, 2016 02:47 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस नियमावली तयार करण्यात आली आहे.

१० हजार शाळांमधून फक्त १३८ शाळेत परिवहन समिती : कशी होणार विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक?सुमेध वाघमारे  नागपूरविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस नियमावली तयार करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा या उद्देशातून सर्वच शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे शासनाचा आदेश आहे. परंतु नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास १० हजार शाळांमधून केवळ १३८ शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन झाली आहे. एकीकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलीस विभाग मोठा गाजावाजा करून रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करीत असताना दुसरीकडे या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविण्यात येतात. आयुर्मान संपलेल्या वाहनामार्फतही वाहतूक सुरू असते. यामुळे अशा वाहनांचे अपघात होऊन विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येतो. यापूर्वी अनेक घटनांमधून ही बाब पुढे आली आहे. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा बस धोरण तयार केले. यामध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली तयार करण्यात आली. तसेच जिल्हा तसेच शाळास्तरांवर शालेय परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश त्यावेळी देण्यात आले होते. परंतु गेल्या पाच वर्षांत याची कोणीच गंभीरतेने दखल घेतली नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी परिवहन समितीला शाळांचा ठेंगानागपूर : जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून सुमारे १० हजारांवर शाळा असताना केवळ १३८ शाळांमध्येच परिवहन समिती असल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) आहे. समितीची जबाबदारी परिवहन शुल्क निश्चित करणे, बसथांबे निश्चित करणे, वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, वाहनातील अग्निशामक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी आदीची पडताळणी करणे, वाहनांचे वेळापत्रक व मार्ग निश्चित करणे, ट्रॅफिक वॉर्डनच्या मदतीने वाहतूक नियंत्रण करणे व विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे चढ-उतार करणे, शाळेने बस वाहतूकदारांशी करार केला आहे किंवा नाही हे पाहणे व प्रत्येक शालेय बसमध्ये मदतनीस असल्याची खात्री करणे.शासकीय शाळाही उदासीननागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ३९२०, माध्यमिक शाळा १०३६ तर महानगरपालिकेच्या शाळा १११ असे एकूण ५०६७ शाळा आहेत. यातील २५३० प्राथमिक, ४३८ माध्यमिक आणि मनपाच्या १०१ शाळा असे मिळून ३०६९ शाळांमध्येच शालेय परिवहन समिती स्थापन झाल्याची नोंद आरटीओकडे आहे. मात्र, यातील बहुसंख्य शाळांनी समिती स्थापन झाल्याचे मिनिटस् आरटीओकडे पाठविलेच नाही. केवळ १३८ खासगी आणि शासकीय शाळांचे मिनिटस् आरटीओला प्राप्त झाले आहे. असे आहेत नियमविद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी, ते कोणत्या वाहनातून शाळा-महाविद्यालयात जातात-येतात याची नोंद शासन पातळीवर राहावी, या उद्देशाने २०११ मध्ये राज्य सरकारच्या परिवहन विभागाने प्रत्येक शाळा अथवा महाविद्यालयात शालेय परिवहन समिती तयार करणे अनिवार्य केले. यात ज्या शाळांमधील विद्यार्थी स्कूलबस किंवा रिक्षाने येत नाहीत त्या शाळांनाही समिती तयार करण्याचे आदेश आहेत.