शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

संतोषला मुंबईच्या ‘भाई’ची रसद

By admin | Updated: March 4, 2016 03:00 IST

पोलिसांना तब्बल ३५ दिवस गुंगारा देत विविध दरबारात हजेरी लावणारा नागपुरी डॉन संतोष आंबेकर याला फरारीच्या कालावधीत मुंबईच्या ‘भाई’ने रसद पुरविल्याची चर्चा आहे.

खास माणसेही सोबत : ठिकठिकाणी देवदर्शन नरेश डोंगरे नागपूरपोलिसांना तब्बल ३५ दिवस गुंगारा देत विविध दरबारात हजेरी लावणारा नागपुरी डॉन संतोष आंबेकर याला फरारीच्या कालावधीत मुंबईच्या ‘भाई’ने रसद पुरविल्याची चर्चा आहे. काळजी घेण्यासाठी भाईची काही खास माणसेही संतोषच्या सोबत होती. दरम्यान, भाई वगळता नागपुरातील साऱ्याच मित्रांनी झिडकारल्याने संतोषला सारे देव आठवले. त्यामुळे तो देवदर्शन करीत फिरला. त्यानंतर याच भाईच्या सल्ल्याने संतोषने पोलिसांकडे शरणागती पत्करल्याची गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे. बिल्डरकडून तगडी सुपारी घेतल्यानंतर ‘पोस्टर गँग’ने मनीषनगरातील स्वप्नील बिडवईच्या निवासस्थानी तोडफोड करून त्याच्या घरावर कब्जा केला होता. सुपारीची तगडी रक्कम मिळाल्यानंतर पोस्टर गँगने शहरात होर्डिंगबाजी करून नागपूरकरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. त्याची जोरदार चर्चा सुरू होताच सोनेगाव पोलीस ठाण्यात बिल्डरसह पोस्टर गँगचा युवराज माथनकर, गौतम भटकर यांच्यासह ३० ते ४० आरोपींवर गुन्हा दाखल केला. त्याची चर्चा सुरू असतानाच नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा भाई संतोष आंबेकरने २६ जानेवारीला भव्य रॅली काढून ‘देशभक्ती’ची धून वाजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही रॅलीच अनेकांना खटकणारी ठरली. २७ तारखेला या रॅलीबाबत लकडगंज ठाण्यात संतोष पोलिसांकडे खुलासा करीत होता. तर त्याच वेळी बिडवईच्या प्रकरणात ‘सुपारी’ गिळल्याचे उघड झाल्यामुळे सोनेगाव ठाण्यात संतोषसह ‘पोस्टर गँग’मधील ११ जणांविरुद्ध मोक्का लावण्यात आला. ते कळताच संतोष नागपुरातून पसार झाला. २८ जानेवारीपासून पोलीस त्याचा इंदोर, मुंबई, ठाण्यासह ठिकठिकाणी शोध घेत होती. जागोजागी छापे घातले जात होते, मात्र तो काही हाती लागत नव्हता. त्याने पोलिसांना तब्बल ३५ दिवस गुंगारा दिला. दरबारात पूजा-अर्चना इतवारीच्या बंगल्यात दरबार भरवून अनेक प्रकरणांत मांडवली घडवून आणणारा संतोष फरारीच्या कालावधीत विविध ठिकाणच्या दरबारात जाऊन आला. प्रारंभी निजामुद्दीनला (दिल्ली) मथ्था टेकल्यानंतर तेथून वैष्णोदेवी मातेच्या दरबारात पोहोचला. तेथे माताराणीचे दर्शन घेऊन कटरा येथे परतल्यानंतर संतोषने अजमेरचा दर्गा गाठला. येथे नतमस्तक झाल्यानंतर जयपूर आणि परत तो शिर्डीला आला. साईबाबांच्या दरबारात पूजा-अर्चना केल्यानंतर आता काय करायचे, कुठे जायचे, असा त्याला प्रश्न पडला होता. कारण ‘भाई‘ वगळता संतोषला प्रत्येकांनीच झिडकारले होते. त्यामुळे त्याने भाईच्या सल्ल्यावरूनच शिर्डीहून थेट नागपूर गाठले आणि पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचला.