शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तने केला फर्लो नियमांचा भंग

By admin | Updated: January 11, 2015 00:54 IST

सिने अभिनेता संजय दत्त १४ दिवसाच्या मंजूर रजेनंतर उशिरा कारागृहात हजर झाला. त्याच्याकडून फर्लो नियमांचा भंग झाला आहे. त्यामुळे महाराष्ट तुरुंग अधिनियमाच्या तरतुदीनुसार

गुन्हा दाखल होण्याची तरतूद : शिक्षेचा कालावधी वाढण्याची शक्यतानागपूर : सिने अभिनेता संजय दत्त १४ दिवसाच्या मंजूर रजेनंतर उशिरा कारागृहात हजर झाला. त्याच्याकडून फर्लो नियमांचा भंग झाला आहे. त्यामुळे महाराष्ट तुरुंग अधिनियमाच्या तरतुदीनुसार तो कारवाईस पात्र आहे, असे स्पष्ट मत मुंबई बॉम्बस्फोट खटला चालविणारे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी आज लोकमतशी बोलताना मांडले. एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने अ‍ॅड. निकम आज नागपुरात आले होते. त्याअनुषंगाने त्यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने चर्चा केली. अ‍ॅड. निकम यांनी यावेळी फर्लोचा नियम आणि महाराष्ट तुरुंग अधिनियमाच्या तरतुदीचा हवाला देत म्हटले की, कारागृहातील कैदी त्याच्या कुटुंबीयांपासून आणि समाजापासून दुरावू नये म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून कैद्यासाठी एक तरतूद करण्यात आली. यानुसार, शिक्षा झालेल्या कैद्याला वर्षातून एकदा १४ दिवसांची रजा मागण्याचा अधिकार असतो. (म्हणजे, त्याला शिक्षेतून सूट मिळत नाही.) या १४ दिवसांच्या रजेदरम्यान अपवादात्मक स्थितीत संबंधित कैद्याला पुन्हा १४ दिवसांची पॅरोल (सलगपणे) रजा मिळू शकते. मात्र, त्यासाठी ठोस कारण हवे. ही वाढीव रजा देण्याचा निर्णय कारागृहाचे डीआयजी घेऊ शकतात. वाढीव रजेच्या कारणांची चौकशी आणि पोलिसांचा अहवाल मागून या वाढीव रजेसंदर्भात डीआजी निर्णय घेतात. या अर्जावर निर्णय झाला नसेल तर, यापूर्वी मंजूर झालेल्या फर्लो रजेच्या १४ दिवसानंतर कैद्याने तातडीने कारागृहात परतणे बंधनकारक आहे. सदरच्या अर्जावर निर्णय झाला नाही किंवा त्याची माहिती मिळाली नाही, ही सबब पुढे करून कारागृहात परतणे संबंधित कैदी टाळू शकत नाही. असे कुणी कैदी करीत असेल तर तो तरतुदीचा गैरवापर करीत असल्याचे स्पष्ट होते. त्यात भारतीय दंड विधानाच्या कलम २२४ अन्वये दंडात्मक कारवाईस पात्र ठरतो. एवढेच नव्हे तर फर्लो तरतुदीचा भंग करणाऱ्या कैद्याविरुद्ध तुरुंगाधिकारी आयपीसीच्या कलम २२४ अन्वये पोलिसांकडे तक्रार करू शकतात आणि संबंधित कैद्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. संजय दत्तच्या प्रकरणात असाच प्रकार झाला. त्यामुळे तो कारवाईस पात्र असल्याचे अ‍ॅड. निकम म्हणाले. (प्रतिनिधी)‘माफी‘लाही कात्री प्रत्येक कैद्याला ज्याप्रमाणे वर्षभरात एकदा फर्लो तरतुदीनुसार १४ दिवसांची रजा उपभोगण्याचा अधिकार आहे. त्याच प्रमाणे त्याला त्याच्या शिक्षेतून प्रत्येक महिन्यात ७ दिवसांची सुट (माफी) ही मिळत असते. मात्र, फर्लोची १४ दिवसांची रजा उपभोगल्यानंतर तो लगेच कारागृहात परतला नसेल तर त्याने फर्लो तरतुदीचा भंग केल्याचे मानले जाते. अशा कैद्याला ‘त्या‘ १४ दिवसानंतर जेवढे दिवस तो कारागृहातून बाहेर असेल तेवढ्या दिवसाची प्रत्येक दिवसाला ५ या प्रमाणे त्याच्या माफीचे (सूट) दिवस रद्द होऊ शकतात, असेही अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.