शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून घ्यावे : भय्याजी जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:50 AM

आजच्या शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देहिंदू साम्राज्य दिनोत्सवानिमित्त ऑनलाईन उद्बोधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सुमारे ३०० किल्ले होते. त्यापैकी केवळ नातेवाईक म्हणून त्यांनी कुणाला किल्लेदार बनवले नाही. शासनव्यवस्थेत नात्यापेक्षा व्यक्तीच्या गुणांना जास्त महत्त्व दिले. आजच्या राजकारणातदेखील त्यांचे ते वर्तन दिशा दाखविणारे आहे. कुठल्याही राजाने सजग कसे राहायला हवे, याचा आदर्श त्यांनी मांडला. एक राजा म्हणून त्यांनी राज्यकारभाराची ब्ल्यू प्रिंटच जगासमोर ठेवली. नारे, भाषणातून नव्हे तर आदर्श व्यवहारातून आस्था जागृत होते. आजच्या शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनानिमित्त हिंदू साम्राज्य दिनोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी ऑनलाईन उद्बोधन केले.शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक संघर्षाचे प्रसंग आले. त्यांनी आपल्या शौर्याचा उपयोग देशहितासाठीच केला. कोणत्याही नेतृत्वाच्या यशस्वीतेचे काही टप्पे असतात. त्याचे सुरुवातीचे जीवन कसे राहिले, परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता, आस्था व श्रद्धेचे विषय या गोष्टी यात महत्त्वाचे असतात.शिवाजी महाराज धर्मासाठी लढले व देशासाठी जगले. शिवरायांच्या मनात कधीच व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. केवळ स्वराज्य सुरक्षित राहण्याची अपेक्षा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली, परंतु त्यांना स्वत: राजा बनायचे नव्हते. जनता व मार्गदर्शकांच्या आग्रहापोटी त्यांनी होकार दिला होता. आस्था वाढते तेव्हा विश्वास निर्माण होतो. असाच विश्वास महाराजांबाबत कोट्यवधी जनतेच्या मनात आहे. स्वराज्यात शिस्त होती व भेदभाव नव्हता. कोणतेही लक्ष्य प्राप्त करायचे असेल तर निर्भयपणे समोर मार्गक्रमण केले पाहिजे, हीच शिकवण शिवरायांनी नेहमी दिली, असे भय्याजी जोशी म्हणाले.शिवाजी महाराजांनी जनतेचा विश्वास प्राप्त केला होता. सामान्य जनतेमध्ये अविश्वास राहिला तर कोणताही राजा समाजाला पुढे नेऊ शकत नाही, याची त्यांना जाण होती. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजाने परत एकदा आत्मविश्वासाने उभे राहावे व आसुरी शक्तींचा हिमतीने सामना करावा, असे आवाहन भय्याजी जोशी यांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज