शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध तत्त्वज्ञानात झालेली भेसळ पाली अभ्यासकांनी दूर करावी : भदंत विमलकित्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:18 IST

बुद्धाचा धम्म हा तर्कावर, कल्पनांवर अवलंबून नाही. कुठेतरी कर्ताकरविता ईश्वर आहे, हे मानले की गुणवत्ता नष्ट होते. बुद्ध त्यात कुठेही नाहीत. ते मनुष्य आहेत, पण असामान्य. विषय वासना व विकार या सुख प्राप्त करण्याच्या कल्पनांमध्ये मनुष्य आणि देवही गुरफटले आहेत. केवळ बुद्धच या भावनांपासून मुक्त झाले आहेत. बुद्धाच्या मार्गाने गेल्यास कुणीही सुखी होऊ शकतो. मात्र बुद्धानंतर धर्मांध शक्तींनी बुद्धाचे तत्त्वज्ञान कलुषित केले आहे. ही भेसळ दूर करण्यासाठी पाली अभ्यासकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भदंत विमलकित्ती गुणसरी यांनी केले.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाच्या पाली विभागातर्फे राष्ट्रीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुद्धाचा धम्म हा तर्कावर, कल्पनांवर अवलंबून नाही. कुठेतरी कर्ताकरविता ईश्वर आहे, हे मानले की गुणवत्ता नष्ट होते. बुद्ध त्यात कुठेही नाहीत. ते मनुष्य आहेत, पण असामान्य. विषय वासना व विकार या सुख प्राप्त करण्याच्या कल्पनांमध्ये मनुष्य आणि देवही गुरफटले आहेत. केवळ बुद्धच या भावनांपासून मुक्त झाले आहेत. बुद्धाच्या मार्गाने गेल्यास कुणीही सुखी होऊ शकतो. मात्र बुद्धानंतर धर्मांध शक्तींनी बुद्धाचे तत्त्वज्ञान कलुषित केले आहे. ही भेसळ दूर करण्यासाठी पाली अभ्यासकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भदंत विमलकित्ती गुणसरी यांनी केले.प्रथम धम्मचक्कपवत्तन दिन आणि धम्मजयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली-प्राकृत व बुद्धिस्ट स्टडीज विभाग आणि पाली प्रचारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पाली परिषदेचे आयोजन करण्यात आले. डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या सभागृहात आयोजित या एकदिवसीय परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विचारवंत प्रा. सुखदेव थोरात, डॉ. बालचंद्र खांडेकर, डॉ. कृष्णा कांबळे व पाली विभागाचे प्रमुख डॉ. नीरज बोधी प्रामुख्याने उपस्थित होते. भदंत गुणसरी म्हणाले, तथागत बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिले धम्मज्ञान याच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी दिले होते व तेव्हापासून गुरुपौर्णिमेला महत्त्व असून, या उत्सवाच्या उगमाची सुरुवात बुद्धापासूनच झाली आहे. त्याचा उल्लेख पाली साहित्यात आढळतो. बुद्धानंतरच या साऱ्या संकल्पना पुराणग्रंथांमध्ये आल्या आहेत. मात्र पुढच्या काळात अध्यात्म व तत्त्वज्ञानविषयक गोंधळ निर्माण करण्यात आला आहे. बुद्ध कुणाविरोधात बोलत नाहीत. त्यांनी जे सत्य जाणले तेच त्यांनी मांडले आहे. त्यामुळेच त्यांना भगवान म्हणून संबोधण्यात आले. पण पुढच्या काळात भगवानचा ईश्वरीय अपभ्रंश झाला. त्यामुळे अभ्यासकांनी पाली व संस्कृत भाषेचा अभ्यास करून ही भेसळ दूर सारावी व पुन्हा धम्मसंस्कृती रुजविण्यात पुढाकार घ्यावा, अशी भावना भदंत गुणसरी यांनी व्यक्त केली.पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संस्कृतएवढेच पाली भाषेचेही महत्त्व असल्याचे मत मांडले. आपण संस्कृत व पाली भाषेचाही अभ्यास केला असल्याचे सांगत बुद्ध तत्त्वज्ञानातील धम्मपदाचे विशेष महत्त्व त्यांनी यावेळी विशद केले. कारागृहाचे अधीक्षक असताना बंदिवानांवर केलेला मेडिटेशनचा प्रयोग आणि धम्माचाच भाग आहे.बुद्धाचा धम्म मनाशी संबंधित असून एकाच्या मनातून सुरू होऊन दुसऱ्याच्या मनावर संपत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रा. सुखदेव थोरात यांनी तथागतांचा उपदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी पाली भाषा जाणणे व संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. केवळ भाषा किंवा विषय म्हणून नाही तर तथागत बुद्धाने मांडलेला वेगवेगळा दृष्टिकोन समजण्यासाठी पाली भाषा अभ्यासणे आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.यावेळी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. ज्ञानदित्य शाक्य यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कुमुद मेश्राम यांनी केले तर प्रा. सरोज वानी यांनी आभार मानले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ