शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी ट्रॅकवरच साजरी, ३४ तास अविरत परिश्रम

By नरेश डोंगरे | Updated: October 25, 2022 22:15 IST

नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग सुरळीत, ५० हजारांपेक्षा जास्त प्रवाशांच्या दिवाळीच्या उत्साहावर विरजण

- नरेश डोंगरेनागपूर : दिवाळीसारखा सण असताना कुटुंबापासून दूर अंधाऱ्या रात्री अविरत परिश्रम घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांनी अखेर नागपूर - मुंबई रेल्वे मार्ग सुरळीत केला. दरम्यान, मालगाडीच्या अपघातामुळे ५० हजार पेक्षा जास्त रेल्वे प्रवाशांच्या दिवाळीच्या आनंद आणि उत्साहावर पाणी फेरले गेले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वर्धा-बडनेरा मार्गावर रविवारी रात्री ११.२० वाजता मालगाडीला अपघात झाला. मालखेड टिमटाळा स्थानकादरम्यान कोळशाने भरलेले २० डबे रुळावरून घसरले. त्यामुळे नागपूर मुंबई आणि मुंबई नागपूर हे दोन्ही मार्ग (अप-डाऊन) प्रभावित झाले.

नागपूर ते मुंबई तसेच नागपूर ते पुणे, कोल्हापूर, अहमदाबाद, विशाखापट्टनम, चेन्नई, हावडा, पुरी, ओखा, जबलपूर सह विविध शहरात, प्रांतात जाणाऱ्या ६० रेल्वेगाड्यांना ईकडून तिकडे जाण्यास आणि तिकडून ईकडे येण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी यातील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. काही विविध मार्गाने वळविण्यात आल्या. तर काही आहे त्याच ठिकाणी थांबविण्यात आल्या. दरम्यान, या अपघातामुळे विविध प्रांत आणि शहरातील ५० हजार पेक्षा जास्त प्रवाशांच्या दिवाळीच्या आनंद आणि उत्साहावर पाणी फेरले गेले.

आपल्या नातेवाईकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची योजना या प्रवाशांनी आखली होती. त्यासाठी त्यांनी कित्येक दिवसांपूर्वीच रेल्वेचे आरक्षण (रिझर्वेशन) करून ठेवले होते. सरकारी, निमसरकारी आणि खासगी नोकरी करणाऱ्यांनी त्यासाठी सुट्या मंजूर करून घेतल्या होत्या. मात्र, आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी रेल्वेने निघालेल्या हजारो प्रवाशांना मालगाडीच्या अपघातामुळे मार्ग बंद झाल्याने मध्येच अडकून पडावे लागले. काहींना आपल्या गावाला पोहचण्यासाठी बराच विलंब झाला. अपघाताची माहिती कळताच नागपूर, वर्धा आणि भुसावळ अशा तीन ठिकाणांहून एआर ट्रेन (एक्सीडेंट रेल्वे ट्रेन) घटनास्थळी पोहचल्या. रेल्वेच्या नागपूर विभागाच्या महाव्यवस्थापक रिचा खरे जनसंपर्क अधिकारी विजय थुल अन्य वरिष्ठांसह पोहचले. त्यांनी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले.

दोन रात्री, दीड दिवस रेल्वे ट्रॅकवरच- विस्कळीत झालेला नागपूर -मुंबई रेल्वे मार्ग पुर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणांहून सुमारे अडीच ते तीन हजार रेल्वे कर्मचारी, अधिकारी बोलवून घेण्यात आले. ऐन दिवाळीचा दिवस असताना त्यांनी रविवार पूर्ण रात्र, सोमवारचा पूर्ण दिवस आणि रात्र तसेच मंगळवारचा अर्धा दिवस असे सलग ३४ तास अविरत परिश्रम घेतले आणि अखेर मंगळवारी दुपारी नागपूर मुंबई आणि मुंबई नागपूर हा रेल्वेमार्ग पूर्ववत करण्यात आला.

प्रवाशांना प्रचंड मनस्ताप, नागपूर-मुंबईसह आठ ठिकाणी मदत केंद्र- या अपघातामुळे लाखो प्रवाशांचे प्रवासाचे गणित गडबडले. रेंज नसल्यामुळे किंवा बॅटरी डाऊन झाल्यामुळे रेल्वेगाड्यातील प्रवासी तसेच त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप झाला. ईकडे रेल्वे प्रशासनाने नागपूर, सीएसएमटी मुंबई, वर्धा, एलटीटी, कल्याण, दादर, ठाणे आणि पनवेल अशा आठ ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी मदत (संपर्क) केंद्र सुरू करण्यात आले.

रेल्वेने घेतली बसची मदत- या अपघातामुळे बडनेरा, धामणगावजवळ अडकून पडलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २० बसेस भाड्याने घेतल्या. या बसमध्ये बसवून वर्धा, पुलगाव, चांदूर, धामणगाव आदी जवळपासच्या ठिकाणी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली. अपघातामुळे बडनेरा-अमरावती, वर्धा तसेच आजुबाजुच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. त्या ठिकाणी प्रवाशांना खाण्यापिण्याच्या चिजवस्तू तसेच पाण्याची कमतरता भासू नये किंवा जास्त पैसे घेऊन त्यांची लुट केली जाऊ नये, यासाठीही रेल्वे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरविले.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर