शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी ट्रॅकवरच साजरी, ३४ तास अविरत परिश्रम

By नरेश डोंगरे | Updated: October 25, 2022 22:15 IST

नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग सुरळीत, ५० हजारांपेक्षा जास्त प्रवाशांच्या दिवाळीच्या उत्साहावर विरजण

- नरेश डोंगरेनागपूर : दिवाळीसारखा सण असताना कुटुंबापासून दूर अंधाऱ्या रात्री अविरत परिश्रम घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांनी अखेर नागपूर - मुंबई रेल्वे मार्ग सुरळीत केला. दरम्यान, मालगाडीच्या अपघातामुळे ५० हजार पेक्षा जास्त रेल्वे प्रवाशांच्या दिवाळीच्या आनंद आणि उत्साहावर पाणी फेरले गेले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वर्धा-बडनेरा मार्गावर रविवारी रात्री ११.२० वाजता मालगाडीला अपघात झाला. मालखेड टिमटाळा स्थानकादरम्यान कोळशाने भरलेले २० डबे रुळावरून घसरले. त्यामुळे नागपूर मुंबई आणि मुंबई नागपूर हे दोन्ही मार्ग (अप-डाऊन) प्रभावित झाले.

नागपूर ते मुंबई तसेच नागपूर ते पुणे, कोल्हापूर, अहमदाबाद, विशाखापट्टनम, चेन्नई, हावडा, पुरी, ओखा, जबलपूर सह विविध शहरात, प्रांतात जाणाऱ्या ६० रेल्वेगाड्यांना ईकडून तिकडे जाण्यास आणि तिकडून ईकडे येण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी यातील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. काही विविध मार्गाने वळविण्यात आल्या. तर काही आहे त्याच ठिकाणी थांबविण्यात आल्या. दरम्यान, या अपघातामुळे विविध प्रांत आणि शहरातील ५० हजार पेक्षा जास्त प्रवाशांच्या दिवाळीच्या आनंद आणि उत्साहावर पाणी फेरले गेले.

आपल्या नातेवाईकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची योजना या प्रवाशांनी आखली होती. त्यासाठी त्यांनी कित्येक दिवसांपूर्वीच रेल्वेचे आरक्षण (रिझर्वेशन) करून ठेवले होते. सरकारी, निमसरकारी आणि खासगी नोकरी करणाऱ्यांनी त्यासाठी सुट्या मंजूर करून घेतल्या होत्या. मात्र, आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी रेल्वेने निघालेल्या हजारो प्रवाशांना मालगाडीच्या अपघातामुळे मार्ग बंद झाल्याने मध्येच अडकून पडावे लागले. काहींना आपल्या गावाला पोहचण्यासाठी बराच विलंब झाला. अपघाताची माहिती कळताच नागपूर, वर्धा आणि भुसावळ अशा तीन ठिकाणांहून एआर ट्रेन (एक्सीडेंट रेल्वे ट्रेन) घटनास्थळी पोहचल्या. रेल्वेच्या नागपूर विभागाच्या महाव्यवस्थापक रिचा खरे जनसंपर्क अधिकारी विजय थुल अन्य वरिष्ठांसह पोहचले. त्यांनी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले.

दोन रात्री, दीड दिवस रेल्वे ट्रॅकवरच- विस्कळीत झालेला नागपूर -मुंबई रेल्वे मार्ग पुर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणांहून सुमारे अडीच ते तीन हजार रेल्वे कर्मचारी, अधिकारी बोलवून घेण्यात आले. ऐन दिवाळीचा दिवस असताना त्यांनी रविवार पूर्ण रात्र, सोमवारचा पूर्ण दिवस आणि रात्र तसेच मंगळवारचा अर्धा दिवस असे सलग ३४ तास अविरत परिश्रम घेतले आणि अखेर मंगळवारी दुपारी नागपूर मुंबई आणि मुंबई नागपूर हा रेल्वेमार्ग पूर्ववत करण्यात आला.

प्रवाशांना प्रचंड मनस्ताप, नागपूर-मुंबईसह आठ ठिकाणी मदत केंद्र- या अपघातामुळे लाखो प्रवाशांचे प्रवासाचे गणित गडबडले. रेंज नसल्यामुळे किंवा बॅटरी डाऊन झाल्यामुळे रेल्वेगाड्यातील प्रवासी तसेच त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप झाला. ईकडे रेल्वे प्रशासनाने नागपूर, सीएसएमटी मुंबई, वर्धा, एलटीटी, कल्याण, दादर, ठाणे आणि पनवेल अशा आठ ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी मदत (संपर्क) केंद्र सुरू करण्यात आले.

रेल्वेने घेतली बसची मदत- या अपघातामुळे बडनेरा, धामणगावजवळ अडकून पडलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २० बसेस भाड्याने घेतल्या. या बसमध्ये बसवून वर्धा, पुलगाव, चांदूर, धामणगाव आदी जवळपासच्या ठिकाणी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली. अपघातामुळे बडनेरा-अमरावती, वर्धा तसेच आजुबाजुच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. त्या ठिकाणी प्रवाशांना खाण्यापिण्याच्या चिजवस्तू तसेच पाण्याची कमतरता भासू नये किंवा जास्त पैसे घेऊन त्यांची लुट केली जाऊ नये, यासाठीही रेल्वे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरविले.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर