शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘डिमांड’ असलेल्या रेल्वेगाड्या सुरू करण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST

नागपूर : कोरोनाच्या काळात नियमित रेल्वेगाड्या बंद आहेत. मोजक्याच रेल्वेगाड्या विशेष रेल्वे म्हणून चालविण्यात येत आहेत. परंतु ज्या गाड्यांना ...

नागपूर : कोरोनाच्या काळात नियमित रेल्वेगाड्या बंद आहेत. मोजक्याच रेल्वेगाड्या विशेष रेल्वे म्हणून चालविण्यात येत आहेत. परंतु ज्या गाड्यांना प्रवाशांची अधिक मागणी होती अशा गाड्या चालविण्याची तयारी रेल्वे बोर्डाने केली असून, याबाबत नुकतेच मुंबई झोनला पत्र पाठविण्यात आले आहे.

रेल्वे बोर्डाच्या पत्रामुळे लवकरच नागपूरवरून मुंबई आणि पुण्यासाठी धावणाऱ्या १२१३९/१२१४० सेवाग्राम एक्स्प्रेस आणि त्रि साप्ताहिक १२१३५/१२१३६ पुणे-नागपूर-पुणे एक्स्प्रेसला स्पेशल रेल्वेगाडी म्हणून चालविण्याची तयारी करण्यात येत आहे. तर साप्ताहिक रेल्वेगाडी २२१३७/२२१३८ नागपूर-अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्स्प्रेसला वीकली स्पेशल म्हणून चालविण्यात येणार असल्याची माहिती आहे. रेल्वे बोर्डाने मुंबई झोनला या रेल्वेगाड्यांसाठी रॅक तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सध्याच या रेल्वेगाड्या सुरू करण्याबाबत तारीख ठरविण्यात आलेली नाही. चीफ पॅसेंजर ट्रेडिंग मॅनेजर डी. वाय. नाईक यांनी प्रिंसिपल चीफ मेकॅनिकल इंजिनिअर यांना पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे की, झोनअंतर्गत १७ जोडी रेल्वेगाड्या स्पेशल म्हणून चालविण्याची तयारी आहे. अशास्थितीत २२ रॅकची गरज भासणार आहे. यातील १७ रॅक आयसीएफ आणि ७ एलएचबी कोचेसच्या राहणार आहेत. आदेशात म्हटले आहे की, सध्या १६९ रॅकपैकी ९९ रॅक मेल आणि एक्स्प्रेसमध्ये स्पेशल रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून उपयोगात आणल्या जात आहेत. उल्लेखनीय म्हणजे आदेशात उल्लेख केलेल्या १७ जोडी रेल्वेगाड्या रुळावर आणण्याची तयारी १ एप्रिल २०१९ पासून ३१ मार्च २०२० पर्यंत प्रवाशांच्या असलेल्या मागणीनुसार करण्यात आली आहे. नागपूरवरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यात या कालावधीत १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १३०.८५ टक्के, रेल्वेगाडी क्रमांक १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस १२९.५ टक्के, रेल्वेगाडी क्रमांक १२१३५ पुणे-नागपूर एक्स्प्रेसमध्ये ११८.९२ टक्के आणि १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये ११२.९२ टक्के तर रेल्वेगाडी क्रमांक २२१३७ नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसमध्ये १३२.३६ टक्के तिकिटांची मागणी राहात होती. त्यामुळे या गाड्या सुरू करण्याचा विचार रेल्वे बोर्डाने केला आहे.

.................