शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

वीज कंपन्या ६.९ लाख कोटींच्या तोट्यात; इलेक्ट्रिसिटी ॲक्ट सुधारणा विधेयकाच्या मसुद्यात मोठा खुलासा; याला नेमके जबाबदार कोण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:18 IST

 मसुद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट २००३ च्या अंमलबजावणीमुळे वीज क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकास झाला आहे. परंतु, विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी आणखी पायाभूत बदल आवश्यक आहेत. 

कमल शर्मा

नागपूर : देशातील वीज कंपन्या सुमारे ६.९ लाख कोटी रुपयांच्या प्रचंड तोट्यात आहेत. हा धक्कादायक खुलासा केंद्र सरकारने मांडलेल्या इलेक्ट्रिसिटी ॲक्ट सुधारणा विधेयकाच्या मसुद्यातून समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर, इतक्या मोठ्या आर्थिक तोट्यासाठी जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.  वीज कंपन्या यासाठी कर्मचाऱ्यांनाच जबाबदार धरतात. परंतु आरोप असेही आहेत की भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप, आर्थिक गैरव्यवस्था आणि अवास्तव व्यवस्थापकीय खर्च हे खरे कारण आहे.

 मसुद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट २००३ च्या अंमलबजावणीमुळे वीज क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकास झाला आहे. परंतु, विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी आणखी पायाभूत बदल आवश्यक आहेत. 

...तर विजेच्या दरात हाेणाार लक्षणीय वाढमसुद्यात कृषक आणि सामान्य जनतेला स्वस्त वीज मिळण्यासाठी क्रॉस सबसिडी रद्द करण्याचा थेट उल्लेख नाही; पण यामुळे कंपन्यांवर होणाऱ्या आर्थिक ताणावर भाष्य करण्यात आले आहे.

मसुद्यात म्हटले आहे की, वीज कंपन्या ज्या दराने वीज पुरवतात, त्यातून त्याची खरी किंमतसुद्धा वसूल होत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा अंदाज आहे की, ही क्रॉस सबसिडी हळूहळू बंद करण्याचीच तयारी आहे. 

जर तसे झाले, तर शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी वीज दरात लक्षणीय वाढ होणार हे निश्चित आहे. आधीच लोकांना महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. 

क्रॉस सबसिडीचा परिणाम औद्योगिक स्पर्धेवरमसुद्यानुसार, क्रॉस सबसिडीमुळे उद्योगांसाठी वीज दर महाग पडतो, ज्यामुळे औद्योगिक स्पर्धा कमी होते व आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो. या विधेयकाद्वारे ऊर्जा क्षेत्रात आर्थिक स्थिरता आणण्याचा प्रयत्न होईल. 

हरित (ग्रीन) उर्जाला चालना देत औद्योगिक स्पर्धात्मकता वाढवली जाईल. तसेच, इज ऑफ डुइंग बिजनेस व इज ऑफ लिव्हिंग यांसारख्या संकल्पनांना बळ मिळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Power Companies Face Huge Losses; Electricity Act Amendment Reveals Truth

Web Summary : Indian power companies are in ₹6.9 lakh crore debt. The Electricity Act amendment draft reveals cross-subsidy burdens companies, potentially raising consumer electricity rates. Corruption and mismanagement are blamed.
टॅग्स :electricityवीज