शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वाहनेच सीटबेल्टविना

By admin | Updated: April 5, 2016 05:07 IST

वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली

सुमेध वाघमारे ल्ल नागपूरवाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच सीटबेल्टची उपयुक्तता समजूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणूनच गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी ३६ हजार १०८ चालकांवर कारवाई केली. धक्कादायक म्हणजे, कायद्याच्या पालनासाठी कारवाई करणाऱ्या पोलीस खात्यात विनासीटबेल्टची ३५ टक्के वाहने आहेत. २०००सालातील ही वाहने अद्यापही कंडम करण्यात आलेली नाहीत.सीटबेल्ट (सेफ्टीबेल्ट) १२५ केंद्रीय मोटार वाहन कायदा १९९३ ए १ नुसार पुढील आसनाला सीटबेल्ट बसवणं वाहन उत्पादकाला कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वाहनात समोर बसलेल्या व्यक्तींसाठीच नव्हे तर गाडीत मागे बसलेल्या व्यक्तींनीही सीट बेल्ट बांधणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, अपघात झालाच तरसीटबेल्ट वापरणारी व्यक्ती तो न वापरणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत वाचण्याची शक्यता ७० टक्के जास्त असते. याचे गांभीर्य आता ओळखून वाहतूक पोलीस विभागाने सीटबेल्ट कारवाईची मोहीम हाती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यात ३६ हजार १०८ चालकांवर सीटबेल्ट नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई करणारे बहुतांश पोलीसच सीटबेल्ट लावत नसल्याचे वास्तव आहे. प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश अग्रवाल यांच्या लक्षात ही बाब आली असता त्यांनी १०० या क्रमांकावर दूरध्वनी करून पोलीस वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करीत नसल्याची तक्रार केली. यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने अनेक जुन्या वाहनांना सीटबेल्टच नसल्याची माहिती दिली. या संदर्भात ‘लोकमत’ने अधिक माहिती जाणून घेतली असता, पोलीस खात्यात २००० सालातील २०५ वाहने आहेत. ही वाहने निकामी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यातील ३५ टक्के वाहने अद्यापही रस्त्यावर धावत आहेत. परंतु या वाहनांमध्ये सीटबेल्टच नाही. परिणामी, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पोलिसांना विनासीटबेल्टमुळे आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.सीटबेल्टची गरज काय?४ कारची स्थिर वस्तूला अथवा दुसऱ्या वाहनाला धडक बसल्यानंतर अंदाजे एक दशांश सेकंदात कारची गती अचानक थांबते. ज्यांनी सीटबेल्ट लावलेला नाही ते प्रवासी जडत्वाच्या नियमानुसार कारच्या वेगाने जाऊन एखाद्या मानवी क्षेपणास्राप्रमाणे पुढील काच किंवा डॅशबोर्डवर आपटतात. गंभीर जखमी अथवा मृत्युमुखी पडतात.