शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

गावावरून विमान गेले तर लोक घाबरून पळायचे

By admin | Updated: August 6, 2015 02:45 IST

द्वितीय महायुद्धात अमेरिकेने पहिल्यांदाच अणुुबॉम्बचा वापर केला. जपानच्या हिरोशिमा या शहरावर ६ आॅगस्ट १९४५ मध्ये अणुबॉम्ब टाकण्यात आला.

हिरोशिमादिन : भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी जागवल्या आठवणी आनंद डेकाटे  नागपूरद्वितीय महायुद्धात अमेरिकेने पहिल्यांदाच अणुुबॉम्बचा वापर केला. जपानच्या हिरोशिमा या शहरावर ६ आॅगस्ट १९४५ मध्ये अणुबॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी नागासाकी या शहरावर दुसरा अणुुबॉम्ब टाकण्यात आला. या दोन्ही हल्ल्यात हजारो सैनिक आणि लाखो निरपराध नागरिक मारल्या गेले. अनेक वर्षे या हल्ल्याचे परिणाम कायम होते. या हल्ल्यात बेचिराख झालेले जपान पुन्हा सावरले. केवळ सावरलेच नाही तर जगातील विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसले. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे मूळचे जपानचेच. इतिहासात पहिल्यांदा ज्या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला त्या हिरोशिमा शहराला लागून त्यांचे निमी (ओकायामा) हे गाव आहे. हिरोशिमा दिनाच्या निमित्ताने भदंत ससाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अणुबॉम्बच्या हल्ल्यावेळी आपल्या गावात अनुभवलेल्या आठवणींना उजाळा दिला.नागपूर : अमेरिकेने हिरोशिमा शहरावर अणुुबॉम्ब टाकला आणि त्यात लाखो लोक मारल्या गेल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. सर्व वरिष्ठ मंडळी एकत्र आली. एकच चर्चा सुरू होती. ही चर्चा संपण्यापूर्वीच तीन दिवसांनी पुन्हा नागासाकी शहरावर दुसरा अणुुबॉम्ब टाकण्यात आला. त्यामुळे जपानच नव्हे तर संपूर्ण जग हादरून गेले होते. आमचे गाव हिरोशिमा शहराजवळ होते. आमच्या गावाला अणुबॉम्बच्या हल्ल्याची फारशी झळ पोहोचली नाही. परंतु त्या घटनेनंतर सर्वत्र भीतीयुक्त दहशत मात्र पसरली होती. गावावरून एखादे विमानही गेले तरी लोक घाबरून घरात पळायचे, आम्ही तेव्हा खूप लहान होतो. फारसे कळत नव्हते. मात्र त्या अणुुबॉम्बच्या हल्ल्याची जी दहशत लोकांमध्ये होती, ती मात्र आजही स्मरणात आहे.भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी सांगितलेला हा अनुभव. भंते ससाई हे मूळचे जपानचे. इतिहासात पहिल्यांदा अमेरिकेने जपानमध्येच अणुुबॉम्ब टाकला. ६ आॅगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुुबॉम्ब टाकण्यात आला. त्यात २० हजार सैनिकांसह दीड लाखावर निरपराध नागरिक मारल्या गेले. त्यानंतर तीन दिवसाने पुन्हा नागासाकी या शहरावर दुसरा अणुुबॉम्ब अमेरिकेने टाकला. यातही ३९ हजार सैनिकांसह लाखो नागरिक मारल्या गेले. या दोन्ही हल्ल्याने केवळ जपानच नव्हे तर संपूर्ण जग हादरून गेले होते.अमेरिकेने पहिल्यांदा ज्या शहरावर अणुबॉम्ब टाकला त्या हिरोशिमा शहराला लागून असलेल्या ओकाहामा शहरातील निमी हे भदंत ससाई यांचे गाव होय. त्या वेळच्या आठवणींना उजाळा देतांना भदंत ससाई यांनी सांगितले की, द्वितीय महायुद्धाचा तो काळ होता. मी १४-१५ वर्षाचा होतो. युद्धाचा तो काळ होता, हे गावातील लोकांच्या चर्चेवरून लक्षात आले होते. हिरोशिमा आणि नागासकी शहरावरील अणुुबॉम्बच्या हल्ल्यात लाखो लोकं मारल्या गेले. माझे गाव हिरोशिमाला लागून होते. आम्हाला त्या हल्ल्याची थेट झळ पोहोचली नाही. मात्र त्या हल्ल्यात मृत्यूचा सडा पडल्याचे गावातील लोक ंसांगायचे.गावातील जी मंडळी शहरात जाऊन येत होती ती तिकडच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीयुक्त दहशत पसरली होती. गावावरून एखादे विमानही गेले तरी लोकं घाबरायचे, घरांमध्ये पाळायचे. पुढील अनेक वर्षे गावात ती दहशत कायम होती. (प्रतिनिधी)