स्थलांतरित श्रमिकांसाठी प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, पण त्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे आजही हजारो श्रमिक आपापल्या घरी जाण्याकरिता अन्नपाण्याविना शेकडो किलोमीटर पायी प्रवास करीत आहेत, असे परखड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपू ...
कोरोना विषाणूच्या संकटामुळे काही कालावधीसाठी थांबविण्यात आलेले उद्योग सुरू करण्यात यावे. नागपूर परिक्षेत्रातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर या औद्योगिक वसाहतींतील उद्योग पुन्हा सुरू करून उत्पादन निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत ...
कोरोना विषाणूसंदर्भात भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करता यावे यासाठी नागपूर महापालिकेने पाच हजार खाटांची क्षमता असलेले ‘कोविड केअर सेंटर’ कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यास परिसरात सुरू केले. सध्या ५०० बेडची व्यवस्था असलेल्या या क ...
इकडे प्रसुती होत नाही तर तिकडे तिचे नमुने पॉझिटिव्ह आले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून चिमुकलीला मातेपासून दूर ठेवले. सलग १५ दिवस ती चिमुकली मातेपासून दूर होती. त्या दोघीही एकमेकांसाठी आसुसल्या होत्या. आज मातेचे नमुने निगेटिव्ह आले, आणि पहिल्यांदाच मा ...
हप्ता वसुलीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कुख्यात रोशन शेख याने ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून लक्षावधीची माया जमविल्याची माहिती आहे. या पैशातून तो ऐषोआरामाचे आयुष्य जगायचा. त्याच्या बँकेतील खात्याची तपासणी केल्यावरच यातील सत्यता पुढे येऊ शकणार आहे. ...
पत्र पोहचविण्याव्यतिरिक्त अनेक सेवा चालविणारा डाक विभाग लॉकडाऊनच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मुंबई, पुण्याचे टपाल पोहचते करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यासह रेल्वेशी ‘टायअप’ करून औषध आणि शेतकऱ्यांचा माल विविध शहरात पोहचविण्याची व्यवस्था केली ...
सायबर गुन्हेगारांनी बँक खाते व्हेरिफिकेशनच्या नावावर एका ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून ७.५० लाख रुपये लंपास केले. ही घटना प्रतापनगर पोलीस ठाणे अंतर्गत पांडे ले-आऊट येथे उघडकीस आली. ...
मंगळवारी तीन गर्भवती महिलांची नोंद झाली असताना आज बुधवारी पुन्हा तीन गर्भवती महिलांचे निदान झाले. गर्भवती मातांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ३१५ वर पोहचली आहे. ...
कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. ...
या रस्त्यांवरून लोक कधीही सर्रासपणे ये-जा करायचे. कधीही अडचण आली नाही. परंतु २२ वर्षाच्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणि इतरही काही लोक पॉझिटिव्ह सापडल्यापासून पार्वतीनगर, जवाहरनगर आणि रामेश्वरी परिसर सील करण्यात ...