शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

सीएएवरून देशात अराजकता माजविण्याचा विरोधकांचा डाव :देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 22:29 IST

संपूर्ण देशात नागरिकता संशोधन विधेयक लागू करणार नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट करूनही विरोधकांकडून अल्पसंख्यकांची दिशाभूल सुरू आहे. हा कायदा नागरिकता देण्यासाठी आहे, हिसकावण्यासाठी नव्हे.

ठळक मुद्देमनोरमाबाई मुंडले व्याख्यानमालेतून केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण देशात नागरिकता संशोधन विधेयक लागू करणार नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट करूनही विरोधकांकडून अल्पसंख्यकांची दिशाभूल सुरू आहे. हा कायदा नागरिकता देण्यासाठी आहे, हिसकावण्यासाठी नव्हे. असे असतानाही देशात भय व त्यातून अराजकता माजविण्याचे काम विरोधक करीत आहेत. सीएए हा केवळ बहाणा आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.मनोरमाबाई मुंडले व्याख्यानमालेंतर्गत धरमपेठ शिक्षण संस्थेच्या वतीने धरमपेठ कन्या शाळेच्या पटांगणावर ‘नागरिकता संशोधन विधेयक’ या विषयावर फडणवीस यांचे व्याख्यान झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर होते. उपाध्यक्ष अ‍ॅड. संजीव देशपांडे, सचिव रत्नाकर केकतपुरे व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या पाऊण तासाच्या भाषणातून फडणवीस यांनी अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, नागरिकता कुणाला द्यावी, हा प्रत्येक देशाचा अधिकार आहे. मूलभूत अधिकार देशाच्या नागरिकालाच मिळतात, हे स्पष्टच आहे. आजचे कायद्यातील संशोधन अचानक ठरलेले नाही. देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली आहे. १९५० मध्ये भारत व पाकिस्तानादरम्यान लियाकत करार झाला. त्यानुसार दोन्ही देशांनी त्यांच्याकडे असलेल्या निर्वासित नागरिकांच्या विकासाची व सुरक्षेची हमी घेण्याचे ठरले. तेव्हा पाकिस्तानात २३.५० टक्के हिंदू होते, ते आज फक्त ३ टक्के उरले आहेत. उर्वारित २० टक्के हिंदू अर्थातच भारतातच आले असणार. याउलट भारतात तेव्हा असलेले मुस्लिम ३ टक्यांवरून आज १४ टक्यांवर पोहचले आहेत. भारताने करारानुसार काळजी घेतली, पण पाकिस्तानने घेतली नाही. पाकिस्तानने स्वत:ला इस्लामिक राष्ट्र घोषित केले आहे. त्यांची राज्यघटनाही ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ या नावाने आहे. तिथे फक्त मुस्लिमांनाच राष्ट्रीयत्वाचे अधिकार आहेत.संविधानात तरतुदी करण्याचा अधिकार प्रत्येक राष्ट्राला असतो. भारताने ‘संधीची समानता’ यादृष्टीने तरतुदी केल्या आहेत. सीएए ही त्यातीलच तरतूद आहे. मात्र असे असतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटारडेपणा सुरू आहे. देशात नवे संविधान लागू केले जाण्याची अफवा पसरविली जात आहे. एकीकडे भारताचे जगात स्थान उंचावर असताना देशातील अंतर्गत विघातक शक्ती भारताचे स्थान कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.मुख्य प्रवाहात असलेले देशातील पक्षही सीएएबद्दल खोटारडेपणा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या कायद्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही. कुणालाही देशाबाहेर काढले जाणार नाही. नागरिकत्वाची ओळख असणे हे देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एनआरसीमधून देशाच्या नागरिकतेची ओळख होणार आहे, असे ते म्हणाले. प्र्रारंभी संस्थेच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. आभार रत्नाकर केकतपुरे यांनी मानले. व्याख्यानाला मा.गो. वैद्य, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विश्राम जामदार, कुणाल एकबोटे आदी उपस्थित होते.तेव्हा समर्थन देणाऱ्यांचा आज विरोध का?२००३ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कायद्यात संशोधन केले. तेव्हा सर्वांनीच समर्थन दिले. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी दोनवेळा मुदतवाढ दिली. स्वत: मनमोहनसिंग, गोगोई यांनी संसदेत यावर भाषणे दिली होती. आज त्याचे कायद्यात रूपांतर होताना विरोध का? हा केवळ राजकीय अराजकतेसाठी बुद्धिभेद सुरू आहे.विरोधकांची ही कसली देशभक्ती?नागरिकत्वामध्ये सर्वांचा समावेश करा, असे विरोधक म्हणतात. भारतामध्ये दोन कोटी बांगलादेशी नागरिक आहेत. अनेक जण येथे रोजगारासाठी शिरले. देशाच्या संसाधनांवर, नोकऱ्यांवर त्यांच्यामुळे ताण आला आहे. असे असतानाही त्यांच्यासाठी नागरिकत्व मागणे हीच विरोधकांची देशभक्ती आहे का, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. देशातील आतंकवादी कारवायांची पाळेमुळे घुसखोरीत असल्याने त्यांना हाकलण्याची मागणी सर्वांकडूनच सुरू आहे; तरीही विरोधक भूमिका का बदलतात, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.मुख्य प्रवाहात असलेले देशातील पक्षही सीएएबद्दल खोटारडेपणा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या कायद्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही. कुणालाही देशाबाहेर काढले जाणार नाही. नागरिकत्वाची ओळख असणे हे देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एनआरसीमधून देशाच्या नागरिकतेची ओळख होणार आहे, असे ते म्हणाले. प्र्रारंभी संस्थेच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. आभार रत्नाकर केकतपुरे यांनी मानले. व्याख्यानाला मा.गो. वैद्य, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विश्राम जामदार, कुणाल एकबोटे आदी उपस्थित होते. 

तेव्हा समर्थन देणाऱ्यांचा आज विरोध का?२००३ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कायद्यात संशोधन केले. तेव्हा सर्वांनीच समर्थन दिले. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी दोनवेळा मुदतवाढ दिली. स्वत: मनमोहनसिंग, गोगोई यांनी संसदेत यावर भाषणे दिली होती. आज त्याचे कायद्यात रूपांतर होताना विरोध का? हा केवळ राजकीय अराजकतेसाठी बुद्धिभेद सुरू आहे.विरोधकांची ही कसली देशभक्ती?नागरिकत्वामध्ये सर्वांचा समावेश करा, असे विरोधक म्हणतात. भारतामध्ये दोन कोटी बांगलादेशी नागरिक आहेत. अनेक जण येथे रोजगारासाठी शिरले. देशाच्या संसाधनांवर, नोकऱ्यांवर त्यांच्यामुळे ताण आला आहे. असे असतानाही त्यांच्यासाठी नागरिकत्व मागणे हीच विरोधकांची देशभक्ती आहे का, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. देशातील आतंकवादी कारवायांची पाळेमुळे घुसखोरीत असल्याने त्यांना हाकलण्याची मागणी सर्वांकडूनच सुरू आहे; तरीही विरोधक भूमिका का बदलतात, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस