शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

उड्डाणपूल आणि आरयूबीमुळे एक लाख लोकांना सुविधा : बृजेश दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:55 AM

मनीषनगर आणि लगतच्या वस्त्यांमधून वर्धा रोडवर येण्यासाठी लोकांना रेल्वे रुळ ओलांडावा लागत होता. फाटक बंद झाल्यानंतर लोकांना थांबावे लागायचे. या ठिकाणी उड्डाणपूल असावा, अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. आता मनीषनगर येथून थेट वर्धा रोड उड्डाणपुलावर आणि आरयूबी (रुळाखालून मार्ग) येथून वर्धा रोडवर जाता येणार आहे. त्यामुळे लोकांना रेल्वेचे फाटक बंद-सुरू होण्याची वाट पाहावी लागणार नाही.

ठळक मुद्देमनीषनगर उड्डाणपूल सहा महिन्यात सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनीषनगर आणि लगतच्या वस्त्यांमधून वर्धा रोडवर येण्यासाठी लोकांना रेल्वे रुळ ओलांडावा लागत होता. फाटक बंद झाल्यानंतर लोकांना थांबावे लागायचे. या ठिकाणी उड्डाणपूल असावा, अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. आता मनीषनगर येथून थेट वर्धा रोड उड्डाणपुलावर आणि आरयूबी (रुळाखालून मार्ग) येथून वर्धा रोडवर जाता येणार आहे. त्यामुळे लोकांना रेल्वेचे फाटक बंद-सुरू होण्याची वाट पाहावी लागणार नाही.दोन्ही पुलाच्या पाहणी दौऱ्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पत्रकारांना सांगितले की, या मार्गावर दररोज एक लाख वाहनांची ये-जा असते. दाट वस्त्यांच्या भागात उड्डाणपूल आणि आरयूबीचे बांधकाम अत्यंत कठीण काम होते. त्याकरिता अनेकदा डिझाईनमध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे पूल बांधताना तोडण्यात येणारी १४ घरे वाचली. पुलाचे बांधकाम करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहे. पण बांधकामाचे काम महामेट्रोकडे सोपविले. हे काम वेळेत पूर्ण होणार आहे. चार महिन्यात आरयूबी आणि सहा महिन्यात उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वाहन उड्डाणपुलावरून आणताना वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर डावीकडे वळवावे लागेल तर आरयूबी येथून आणताना वर्धा मार्गावर थेट नेता येणार आहे. त्यामुळे लोकांची वेळेची बचत होणार आहे.उड्डाणपूल रिलायन्स फ्रेशपासून वर्धा मार्गापर्यंत ९०० मीटर लांब तर दोन पदरी आरयूबी ५०० मीटर लांब आहे. पूर्वीच्या डिझाईननुसार जमिनीचे अधिग्रहण आणि घरांचा मोबदला देण्यासाठी २२० कोटींचा खर्च होता. १४ घरांचे मालक येथून जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे डिझाईनमुळे बदल करण्यात आला. त्यामुळे जमिनीच्या अधिग्रहणावर होणारा खर्च वाचला. आरयूबीमध्ये पाणी जमा होणार नाही, यावर लक्ष देण्यात आले आहे. पाण्याच्या निकासीसाठी तीन चेंबर तयार करण्यात आले आहेत. तसेच वर्धा मार्गावरून डावीकडे आरयूबीमधून जाताना प्रारंभी खुला भाग पॉलिकॉर्बोनेट शीटने कव्हर करण्यात येणार आहे; शिवाय आरयूबीमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाशासाठी सन पाईप टाकण्यात येणार आहे. याकरिता सहा पिण्याच्या पाण्याच्या लाईन, मलवाहिन्या आणि संबंधित विभागाची परवानगी घेऊन विजेच्या लाईनही बदलविल्या आहेत. आता १५ मीटर काम राहिले आहे. याशिवाय ८.५ मीटर रुंदीच्या उड्डाणपुलावर २५ मीटरचे २५ स्पॅन टाकण्यात आल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर