शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

आता शहराचा ‘स्मार्ट’विकास

By admin | Updated: March 12, 2017 02:37 IST

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री

पदाधिकाऱ्यांची ग्वाही : स्थायी समिती अध्यक्षांचा पदग्रहण समारंभ
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे कशाचीही उणीव भासणार नाही. आता शहराचा विकास थांबणार नाही, तो ‘स्मार्ट’ दिशेने होईल, अशी ग्वाही शनिवारी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांच्या पदग्रहण समारंभात पदाधिकाऱ्यांनी दिली. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळाल्याने पदग्रहण समारंभात उत्साहाचे वातावरण होते.
जाधव यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर महापालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप जाधव, माजी अध्यक्ष बंडू राऊ त, माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, भाजपाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर आदी उपस्थित होते.
महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे आहे. आर्थिक अडचणीचे आव्हान स्वीकारून शहराचा विकास करू, अशी ग्वाही नंदा जिचकार यांनी दिली. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शहरातील आमदार पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे विकास कामांना कोणतीही बाधा येणार नाही. महापालिकेतील सर्व पक्षाच्या नगरसेवकांना न्याय देण्याची भूमिका राहील. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शहरातील ४० लाख नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू, असा विश्वास सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केला. नागपूर शहराला देशातील नंबर वन शहर बनविण्याचा देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी संकल्प केला आहे. त्यादृष्टीने महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांना काम करावयाचे आहे. आर्थिक आव्हान स्वीकारून पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन सुधाकर देशमुख यांनी केले.
जाधव यांच्याकडे महापालिकेच्या तिजोरीची चावी सोपविली आहे. त्यांच्यापुढे आव्हान असले तरी सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशी ग्वाही संदीप जोशी यांनी दिली. गेल्या वर्षभारत शहरात विविध विकास योजना राबविण्यात आल्याची माहिती बंडू राऊ त यांनी दिली. जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)