शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

नळाला नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा! नागपुरात २४ बाय ७ पाणीयोजना फक्त नावालाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 12:06 IST

नळाला पाणी नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांकडे पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांची सकाळपासूनच गर्दी असते.

ठळक मुद्देगेल्या चार वर्षांपासून वाठोडा परिसर तहानलेलाच : पाण्याचा थेंबही नाही

प्रवीण खापरे

नागपूर : शहरात महानगरपालिकेच्या वतीने ओसीडब्ल्यूच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या २४ बाय ७ पाणीयोजनेचे धिंडवडे जर कुठे बघायचे असतील तर ते वाठोडा परिसरात बघता येतील. वाठोडा हा महानगरपालिकेच्या अखत्यारित येत असलेला परिसर आहे आणि येथील वस्त्यांमध्ये नळाच्या जोडण्या सात-आठ वर्षांपूर्वीपासून पोहोचल्या आहेत. मात्र, या जोडण्या केवळ नावालाच असून दिवसाला एक तास सोडल्या जाणाऱ्या पाण्याची धार करंगळीपेक्षाही बारीक असते. उन्हाळ्यात तर नळाला थेंबभरही पाणी नसते आणि कधी पोहोचलेच तर धड १५ मिनिटेही नसते.

शहराचा आउटस्कर्ट भाग

शहराच्या आउटस्कर्ट भागातील हा परिसर असून, येथून जवळच भांडेवाडी डम्पिंग यार्ड आहे आणि या डम्पिंगच्या समांतर परिसरात सिम्बॉयसिस विद्यापीठही आहे. ही एक मोठी लोकवस्ती असून येथे श्रीकृष्णनगर, गोपाळकृष्णनगर, संकल्पनगर, विद्यानगर, वाठोडागाव, रिंगरोडच्या पलीकडे स्वामिनारायण मंदिरमागील लोकवस्ती जसे श्रावणनगर, वैष्णोदेवीनगर, नागोबा मंदिर परिसर, मैत्री चौक, अनमोलनगर आदी वस्त्या येतात. या भागात वर्षाचे बाराही महिने वॉटर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असतो. जवळपास प्रत्येकाच्या घरी नळकनेक्शन्स आहेत. मात्र, अनेकांच्या नळाला मीटर नाहीत. अनेकांना पाण्याचे बिलही येत नाही. याबाबत स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार केली जाते. मात्र, नगरसेवकही महापालिकेच्या नेहरूनगर झोनकडे बोट दाखवून गप्प बसतात. नेहरूनगर झोनमध्ये विचारणा केली असता, प्रत्येक वेळी सुधारणेचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते.

घरोघरी टँकर

नळाला पाणी नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांकडे पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांची सकाळपासूनच गर्दी असते. उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी प्रचंड असल्याने घरोघरी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गल्लीबोळात टँकर शिरण्यासही प्रचंड अडचणी असतात.

लो प्रेशरमुळे पाणी पोहोचत नाही!

वाठोडा परिसरात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा नंदनवन येथील पाण्याच्या टाकीवरून होतो. मात्र, नंदनवन ते वाठोडा हे अंतर फार लांब असल्याने आणि प्रेशर लो होत असल्याने नळाला पाणी येत नसल्याचे नेहरूनगर झोनमधील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पाणीपुरवठ्यासाठीची व्यवस्था खरबी येथे शिफ्ट करण्याचा प्रस्ताव असून, त्याअनुषंगाने दुरुस्तीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. काहीच दिवसांत ही समस्या सुटेल, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

गोपाळकृष्णनगर-विद्यानगरातील नागरिक त्रस्त

गोपाळकृष्णनगर व विद्यानगरात दोन नगरसेवकांचे वास्तव्य आहे. महानगरपालिकेत महत्त्वाच्या समितीवर सभापती असलेला एक माजी नगरसेवक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची बोंब येथील नागरिकांनी गेली. नळाला पाणीच येत नाही आणि टँकरही बरोबर येत नसल्याने पिण्याच्या पाण्याचीही समस्या असल्याचे धनश्री गोसावी, साहिल गोसावी, अनिल हाडके, रेखा डांगे, योगेश जगताप, कोकिळा खरवडे, सचिन कदम, कौतुक शेंदरे, शुभम जगताप आदी नागरिकांनी सांगितले.

* चार वर्षांपूर्वी नळाला पाणी यायचे. त्यानंतर येणे बंद झाले. नळाला मीटर लावलेलेे नाही. मीटरसाठी तक्रार केली. परंतु, अजूनही आलेला नाही. टँकरशिवाय पर्याय नाही.

- विनोद नागोसे, श्रावणनगर

* टँकर आला नाही तर पाणीच मिळत नाही. पाण्याची समस्या मोठी आहे. नळ असूनही पाणीच येत नसल्याचे काहीच फायदा नाही. हिवाळ्यात कसेतरी पाणी येते. यंदा तर फेब्रुवारीपासूनच नळातून पाणी गायब झाले आहे.

- रश्मी तिवारी, वैष्णोदेवीनगर

* पिण्यासाठीसुद्धा टँकरचेच पाणी वापरावे लागत आहे. नगरसेवकाकडे गेलो तर पाण्याच्या टाकीवर जाऊन सांगा म्हटले जाते. टाकीवर जाऊन सांगितले तर चार दिवसांनी टँकर येतो, तोपर्यंत विनापाणी राहावे लागते.

- पूजा कुंभरे, मैत्री चौक

नळाला मीटर लावलेले नाही तरीही बिल येते, ही प्रक्रीया सर्व बेकायदेशीर नळ जोडणीला कायदेशिर स्वरूप देता यावे म्हणून महानगरपालिका व ओसीडब्ल्यूने चालविलेली ड्राईव्ह होती. त्याअनुषंगाने, आता सर्वांच्या नळाला लवकरच मीटर लागेल. शिवाय, यंदा अपेक्षेपेक्षा लवकर उन्हाळ्याचा प्रकोप जाणवायला लागल्याने ऐनकेन मार्गे पाण्याचा वापर वाढला आहे आणि पाण्याचे इतर परंपरागत स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची विभागांनी होत असल्याने आणि घरोघरी टुल्लू पंपाने पाणी खेचले जात असल्याने पाण्याचा पुरवठा बाधित होत आहे. त्यातच वाठोडा हा महानगरपालिकेचा टेल एण्ड क्षेत्र असल्याने पाण्याच्या टाकीवरून निघणारे पाणी तेथेपर्यंत पोहोचण्यास उशीर होतो आणि दरम्यान टुल्लूपंपाद्वारे पाणी ओढले जात असल्याने पाणी पोहोचत नाही. लवकरच यावर तोडगा काढला जाईल आणि पाणी घरोघरी पोहोचेल. 

- सचिन द्रवेकर, जनसंपर्क अधिकारी, ओसीडब्ल्यू

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी