शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

शुल्क नाही, तर शाळाही नाही आणि ऑनलाईन वर्गही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 12:37 AM

शासनाने आर्थिक मदत द्यावी किंवा पालकांकडून शिक्षण शुल्क घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विना अनुदानित शाळा वेलफेअर असोसिएशन यांनी केली आहे. जर शिक्षण शुल्क मिळत नसेल तर शाळाही नाही आणि ऑनलाईन वर्गही होणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्देसीबीएसई शाळांचा इशारा : संस्थाचालक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात सर्वच संस्था आणि कंपन्या यांच्यावर कठीण समय आला आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य शासनाने उद्योजक आणि कंपन्यांना या परिस्थितीतून काढण्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. मात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी काम करणाऱ्या सीबीएसई शाळांना कुठलीही मदत शासनाने जाहीर केली नाही. दुसरीकडे काही संघटना आणि पालकांकडून या शाळांची बदनामी केली जात आहे. शासनाचे कुठलेही अनुदान न घेता चालणाऱ्या या संस्था अतिशय अडचणीत आहेत. अशावेळी एक तर शासनाने आर्थिक मदत द्यावी किंवा पालकांकडून शिक्षण शुल्क घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विना अनुदानित शाळा वेलफेअर असोसिएशन यांनी केली आहे. जर शिक्षण शुल्क मिळत नसेल तर शाळाही नाही आणि ऑनलाईन वर्गही होणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.राज्यात केंद्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत अनेक संस्था सुरू आहेत. या संस्था शासनाच्या कोणत्याही अनुदानाविना सुरू आहेत. या संस्था स्वयं अर्थसाहाय्यित आहे व शासनाची कुठलीही मदत संस्थांना मिळत नसून केवळ, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या भरवशावरच शाळा सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात ज्या प्रमाणे इतर उद्योग ठप्प पडले आहेत, त्याच प्रमाणे शैक्षणिक संस्थाही बंद पडल्या आहेत. मार्च महिन्यात लागलेल्या पहिल्या लॉकडाऊनपूर्वी अनेक पालकांनी शैक्षणिक शुल्क भरले होते. तरीही ५० ते ६० टक्के पालकांकडून शैक्षणिक शुल्क प्राप्त झाले नाही. शाळा बंद झाल्या आणि पालकांनीही शैक्षणिक शुल्क भरण्यास दिरंगाई केली.संस्थाचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांच्या वेतनासह शाळा कर्मचारी यांचे वेतन, शाळा व्यवस्थापन कसे करावे, हा प्रश्न उभा ठाकला आहे. काही संस्थाचालकांनी बँकेचे कर्ज घेऊन संस्था उभारल्या आहेत. त्यांचे हप्ते फेडण्याची अडचण सहन करावी लागत आहे. अशात आरटीईचा थकीत असलेला कोट्यवधीचा परतावा शासनाकडून मिळाला नाही. अशा अनेक अडचणींचा सामना संस्थाचालकांना करावा लागत आहे. असे असूनही काही समाजविघातक प्रवृत्तींकडून शाळा नाही तर शुल्क नाही, असे सांगून शाळांची बदनामी केली जात आहे. याला पालक बळी पडत आहेत. शिक्षण विभागातर्फे पालकांकडून फी वसुलीसाठी सक्ती करू नये असे निर्देश देण्यात येत आहे. आम्ही संस्थाचालक शासनाच्या सर्व नियमांचे पालन करतो, मात्र शासनानेही आमच्या संस्थांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. सीबीएसई शाळा आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि उत्तम शैक्षणिक वातावरण पुरवीत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नियुक्ती संस्थांनी केली आहे. शाळेकडून पालकांना बळजबरीने शुल्क भरण्याचे कुठलेही निर्देश संस्थांनी दिलेले नाहीत. थकीत शुल्क सुविधेनुसार भरण्यास सांगण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या परिपत्रकातही शुल्क घेऊ नये असे सांगण्यात आलेले नाही. तरीही सीबीएई संस्थेच्या शाळांविरोधात अफवा पसरविली जात आहे. शासनाने आमच्या अडचणी समजून घ्यावात.राजाभाऊ टांकसाळे, पदाधिकारी, विनाअनुदानित स्कूल वेलफेअर असोसिएशन

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर