शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

निर्मला सीतारामन यांचा व्यापारी, उद्योजकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 07:00 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड १९ चे पाचवे पॅकेज रविवारी जाहीर करून त्यात व्यापारी, उद्योजकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देशेवटी सर्व जबाबदारी केंद्राचीच

सोपान पांढरीपांडेनागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड १९ चे पाचवे पॅकेज रविवारी जाहीर करून त्यात व्यापारी, उद्योजकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.रविवारी ज्या सात क्षेत्रांसाठी सीतारामन यांनी सुधारणा, सवलती घोषित केल्या. त्यात मनरेगा, आरोग्य सेवा व शिक्षण, व्यापार, कंपनी कायद्याचे सुसुत्रीकरण, नादारी व दिवाळखोरी कायदा, सार्वजनिक उपक्रम व राज्य सरकारे यांचा समावेश होता. आजच्या सुधारणांचा मुख्य भर व्यापार, कंपनी कायदा, नादार व दिवाळखोरी कायदा यावरच होता. यातील मुख्य सवलती अशा आहेत. यापुर्वी एक लाख कर्जाचे हफ्ते विलंबाने भरले तर तो ‘डिफॉल्ट’ (कर्ज चुकवणे) मानल्या जात असे. आता ही मर्यादा एक कोटीपर्यंत वाढविली आहे. त्यानंतर नादारी व दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाई धनको बँका करु शकतील. याच बरोबर कोविड १९ साठी काढलेले कर्ज वेळेत भरले नाही तरीही ‘डिफॉल्ट’ मानला जाणार नाही. लहान व्यापाऱ्यांना या सवलतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. कंपनी कायद्यांतर्गत छोट्या त्रुटी कंपनी व अधिकारी मिळुन समजुन घेतील व तो कायदेभंग मानला जाणार नाही. याच बरोबर आता ५८ प्रकारचे उल्लंघन कारवाई योग्य मानले जाणार नाही. पुर्वी ही संख्या फक्त १८ होती. याच बरोबर कंपनी कायद्यात सुधारणा करुन तो अधिक उद्योजकप्रेमी केला जाईल. या सर्व सुधारणांचा मोठ्या कंपन्यांना व मध्यम उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोठ्या कंपन्यांना आता त्यांचे समभाग विदेशी बाजारात नोंदवता येतील. तर एखाद्या कंपनीने तिचे अपरिवर्तनीय कर्ज रोखे शेअर बाजारात नोंदवले तरी ती कंपनी सुचीबद्ध (लिस्टेड) समजली जाणार नाही याचा फायदाही मध्यम उद्योगांना होणार आहे. आजच्या सवलतींमध्ये मनरेगाचे अनुदान ६१ हजार कोटींवरून १०१००० कोटीपर्यंत वाढवले आहे. त्यातून घरी परतलेल्या प्रवासी मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार देण्याची योजना आहे. यामुळे शहरात कुशल मजुरांचा तुटवडा होण्याची दाट शक्यता आहे. सीतारामन यांनी आज पहिली ते बारावी प्रत्येक वर्गासाठी वेगळे आॅनलाईन चॅनल, प्रत्येक जिल्ह्यात कोविड १९ दवाखाना देण्याचीही घोषणा केली आहे. राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडुन कर्ज उभारण्याची मर्यादा त्यांच्या जीडीपीच्या ३ टक्केवरून ५ टक्के वाढविली आहे. पण त्यापैकी फक्त ३.५० टक्के सहज मिळणार आहेत व उरलेल्या १.५० टक्क्यांसाठी अनेक अटींची पुर्तता करावी लागणार आहे. काही राज्ये विरोधी पक्षांच्या ताब्यात आहेत. त्यांची अडवणुक करण्याचा हा प्रयत्न दिसतो. कोविड १९ हे अभुतपुर्व संकट आहे. अशा वेळी केंद्र सरकारने राजकारण करणे अयोग्य आहे. कारण भारत सार्वभौम राष्ट्र असल्याने शेवटी सर्व जबाबदारी केंद्राचीच राहणार आहे.२० लाख कोटींचे कोविड १९ पॅकेज (रु कोटी)१ कोविडपुर्वीच्या सवलती १,९२,८००२ सवलत पॅकेज १ ५, ९४, ५५०३ सवलत पॅकेज २ ३, १०, ०००४ सवलत पॅकेज ३ १, ५०, ०००५ सवलत पॅकेज ४ व ५ , ४८, १००६ रिझर्व्ह बँकेच्या तरलता योजना १२, ९५, ४५०८,०१, ६०३..............................................................२०, ९७,०५३ 

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन