शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या विकासासाठी वेगळ्या दृष्टीची गरज

By admin | Updated: January 12, 2015 00:59 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. या कालखंडात देशाचा विकास झाला नाही. भारताला स्वांतंत्र्य मिळाले त्यावेळेस जगातील काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बरी होती.

अरुणकुमार : अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख राष्ट्र साधना संमेलनयवतमाळ : देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. या कालखंडात देशाचा विकास झाला नाही. भारताला स्वांतंत्र्य मिळाले त्यावेळेस जगातील काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बरी होती. मात्र आज ते देश विकासाच्या बाबतीत पुढे निघून गेले. मात्र आपण विकासाची दृष्टी नसल्याने मागे राहलो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख अरूण कुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या राष्ट्र साधना संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.यवतमाळातीेल पोष्टल ग्राउंड मैदानावर रविवारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कृषी भूषण शेतकरी आणि निसर्ग चळवळीचे सुभाष शर्मा होते. यावेळी मंचावर बापूराव तायडे, दादाराव भडके, सुरेश गोफने, सुखदेव ढवळे, सुरेंद्र खोडवे, अण्णाजी कुरडे, प्रदीप वडनेरकर, विजय कोषटवार होते. अरूण कुमार पुढे बोलताना म्हणाले, भारताच्या विकासासाठी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणे पहिले लक्ष होते. देश गुलामगिरीतून मुक्त झाला, पण इंग्रजी आणि त्यांच्या संस्कृतीत अधिक गुरफटल्या गेला. परिणामी आपला संपूर्ण विकास खुंटला. आतापर्यंत तीनवेळा वैचारिक परिवर्तन पहायला मिळाले. सन १९४७, १९७७ आणि २०१५ मध्ये हे परिवर्तन प्रामुख्याने जाणवले. केवळ जागृकतेनेच हे घडले. मात्र विकासाला दिशा देण्यासाठी ठोस उपाययोजना झाल्या नाही. देशाला दिशा देण्याची गरज आहे. आज पर्यंत कुठलीही दिशा नसल्याने आपण पुढे गेलोच नाही. चीन, जपान, जर्मनी यासारखे देश एक दृष्टी समोर ठेवून पुढे गेले आहेत. आपल्यालाही अशीच दिशा समोर ठेवून काम करायचे आहे. यासाठी कुठलाही एक व्यक्ती परिवर्तन घडवू शकणार नाही. समाजाचे मोठे योगदान आवश्यक लागणार आहे. हे वैचारीक परिवर्तन घडविण्यासाठी स्वयंसेवकांवर मोठी जबाबदारी राहणार आहे. देशातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी सकारात्मक विचार वाढायला हवेत. आपल्या पतनासाठी आपन स्वत: कारणीभूत आहोत. कुठलाही देश याला जबाबदार नाही. पूर्वी श्रीमंत होण्यासाठी लोक भारतात येत होते. आता आपण विदेशात जातो. हे कशामुळे होत आहे. आपले मुलभूत चक्र नष्ट करण्याचे काम झाले. यामुळे आपण माघारलो असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार भावना गवळी, हंसराज अहिर, पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती आणि संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)