शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

National Inter Religious Conference: "दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे, येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 1:02 PM

National Inter Religious Conference : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेला सुरुवात झाली आहे.

नागपूर : आम्ही आपल्या धर्माचे इमानदारीने पालन केले पाहिजे, पण दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे. येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो. धर्म एका लिफाफ्यात ठेवलेला फळासारखा मधूर रस आहे. साल म्हणजे त्याचे सुरक्षतेसाठी असलेला संप्रदाय आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी दिले.

लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेला सुरुवात झाली आहे. यावेळी अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक, इराण, सिरिया या ज्या विचाराची आज सर्वाधिक आवश्यकता आहे, त्या विचाराला प्रत्यक्षात नागपूरच्या धर्तीवर उतरवण्यासाठी धर्मगुरू एकत्र आले आहे.  आजचा दिवस किती सुंदर आयोजित करण्यात आला आहे आणि सर्व धर्माचार्य करवा चौथच्या दिवशी नागपूरमध्ये येऊन देशाच्या सौदार्ह, भाईचारासीठी एकत्र प्रार्थना करत आहेत. दुवा करत आहेत आणि आज या विचाराला संपूर्ण जगाला गरज आहे.

याचबरोबर, आम्ही भाग्यशाली आहोत. ज्या भारतात आम्ही जन्म घेतला, अनेकतामध्ये एकता त्या देशाची मौलिक विशेषता आहे. सर्वधर्म सद्भाभाव त्याच्या मूलमंत्रात आहे आणि माझे हे सुद्धा परम सौभाग्य आहे की, मला जैन परंपरामध्ये भगवान महावीर यांचा जो विचार मिळाला. ज्याला अनेकांत दर्शन, ज्याला स्याद्वाद दर्शन म्हणतात. या स्याद्वादचा अर्थ हाच आहे की, आम्ही आपल्या अस्तिवात्वासोबत दुसरे अस्तित्व स्वीकारले पाहिजे. आम्ही आपल्या विचारांसोबत दुसऱ्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. आम्ही आपल्या धर्माचे इमानदारीने पालन केले पाहिजे, पण दुसऱ्या धर्मांचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे. येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो, असे आचार्य डॉ. लोकेश मुनी म्हणाले.

धर्म आणि संप्रदाय एक नाही आहे. धर्म एका लिफाफ्यात ठेवलेला फळासारखा मधूर रस आहे. साल म्हणजे त्याचे सुरक्षतेसाठी असलेला संप्रदाय आहे. वास्तवात पाहिले तर हा देश धर्मनिरपेक्ष नाही, तर पंथनिरपेक्ष आहे. मजब निरपेक्ष आहे. धर्म तर आपला आत्मा आहे, त्याच्यापासून आपण वेगळे कसे होऊ शकतो. ज्यावेळी व्यक्ती माझाच धर्म श्रेष्ठ आहे, माझा विचार सुद्धा श्रेष्ठ आहे, असे म्हणतो, त्यावेळी अडचणी येतात. ज्याठिकाणी सत्य आणि चांगले आहे, आम्ही त्याच्यासोबत आहेत आणि ज्याठिकाणी सत्य आणि चांगले नाही आहे, तिथे कोणताही धर्म असो किंवा पक्ष असो आम्ही त्यासोबत नाही आहोत, असेही आचार्य डॉ. लोकेश मुनी म्हणाले.

आज सकारात्मक भावनेची गरज आहे. नकारात्मकता सोडली तर हे जग सुंदर आहे. येथे उपस्थित झालेला हा शांतीदूतांचा रथ पुढे जावा. या कुंभमेळ्यातून विचारांचे झालेले मंथन जगभर पसरावे. या शांतीदूतांनी विश्व बंधूत्त्वाची ज्योत जगभरात पेटवली आहे. कोरोना काळात भारतीय जैन जीवनशैलीने मनुष्य जीवनाला तारले आहे. आयुर्वेद, योग-प्राणायाम, संयम आधारित जीवनशैली पुन्हा प्राप्त करा. बोलणे सोपे आहे आणि कृती कठीण. पण, तो कृती सुकर व्हावी, असे प्रयत्न गरजेचे आहे आणि ते प्रयत्न या परिषदेतून होत असल्याचा आनंद आचार्य डॉ. लोकेशमुनी यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदnagpurनागपूरLokmatलोकमत