शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पॅटर्न नागपुरातही राबवावा

By admin | Updated: January 13, 2017 02:11 IST

उपराजधानीत आता ‘ई-चालान’ प्रणालीमुळे जास्तीत जास्त वाहनांवर कारवाई होत आहे.

हेल्मेट न वापरणाऱ्यांना निबंध लेखनाची शिक्षा : आतापर्यंत दोन लाख वाहनचालकांवर कारवाईनागपूर : उपराजधानीत आता ‘ई-चालान’ प्रणालीमुळे जास्तीत जास्त वाहनांवर कारवाई होत आहे. गेल्या ११ महिन्यात दोन लाख वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. परंतु दंडात्मक कारवाई करूनही ५० ते ६० टक्केच फरक पडल्याचे शहरातील रस्त्यांवरील चित्र आहे. यामुळे वाहतुकीचा नियम मोडणाऱ्याला याची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणून नाशिक पोलिसांचा अभिनव प्रयोग नागपुरातही व्हायला हवा, दोषी वाहनचालकांकडून हेल्मेटचे महत्त्व या विषयावर निबंध लिहून घ्यावे, अशी मागणी होत आहे.दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. उपराजधानीत याची सक्ती ८ फेब्रुवारी २०१६ पासून करण्यात आली. परंतु हेल्मेटविषयी जनजागृती न करता व हेल्मेट विकत घेण्यास मुदत न दिल्याने याला विरोध झाला. दरम्यानच्या काळात वाहतूक पोलीस विभागाने सक्तीची कारवाई शिथिल करीत जनजागृतीचे कार्य हाती घेतले. परंतु नंतर कारवाईचा वेग वाढविण्यात आला. मात्र यात विनाहेल्मेट वाहनचालकांना थांबविल्यानंतर अनेक वेळा वाद व्हायचा. चालान फाडून शुल्क आकारण्यापर्यंत वेळ जायचा. यावर उपाययोजना म्हणून ६ आॅक्टोबर २०१६पासून ‘ई-चालान’ घरपोच पाठविणे सुरू झाले. यामुळे जास्तीतजास्त वाहनांवर कारवाई करणे शक्य झाले. सोबतच चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याद्वारेही ‘ई-चालान’ पाठविले जात आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा वेग वाढला असलातरी आजही ४० टक्के वाहनचालक विना हेल्मेट दुचाकी दामटताना दिसत आहे. नाशिक पोलिसांनी यावर उपाय म्हणून अशा दुचाकीस्वारांची ‘शाळा’च भरविणे सुरू केले आहे. यात ‘हेल्मेटचे फायदे’ या विषयावर मुद्देसूद निबंध लेखन लिहिण्याची शिक्षा दिली जात आहे. याच पद्धतीचा अभिनव प्रयोग नागपुरातही सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दंडासोबतच निबंध लेखनाला सुरुवात झाल्यास ‘हेल्मेट कळेलही आणि वळेलही’ असे मत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)एका अपघातात एखाद्याचा जीव जात असेल. मात्र, त्याच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबीयांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते. कुणाला अपघात झाल्यानंतर डोक्याला मार लागून जीव जाऊ नये, यासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट घालून वाहन चालवावे, अशी पोलिसांची भूमिका आहे. पोलिसांच्या या भूमिकेत नागरिकांचेच हित आहे. दुचाकीचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वळण लागावे म्हणून पोलिसांकडून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाते. कारवाईसोबतच जनजागरण आणि समुपदेशनाचेही उपक्रम पोलीस राबवीत आहेत. वाहनचालकांनी पोलिसांची भावना समजून घ्यावी.स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, नागपूर.