शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

नागपूरचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:36 AM

देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकावर पोहचले आहे.

ठळक मुद्देधूलिकणांचे प्रमाण विक्रमी घटले : व्हीएनआयटीचा अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकावर पोहचले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) द्वारे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण केले जात आहे. व्हीएनआयटीने लॉकडाऊनच्या काळात एप्रिल महिन्यात शहरातील चार स्थानावरून प्रदूषणाचे परीक्षण केले आहे. यात प्रामुख्याने धूलिकण (पीएम-१०) तसेच सल्फर डायऑक्साईड (एसओ2), नायट्रोजन डायऑक्साईड (एनओ2) यांच्या प्रदूषणाचा अभ्यास केला आहे. अभ्यास केलेल्या चार ठिकाणांमध्ये एमपीसीबीचे सिव्हील लाईन्स येथील कार्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिआर्स उत्तर अंबाझरी मार्ग, एमआयडीसी हिंगणा रोड आणि शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सदर यांचा समावेश आहे.व्हीएनआयटीच्या २०१० पासूनच्या अभ्यासानुसार एसओ2 व एनओ2 चे प्रमाण कधीही प्रदूषण मर्यादेच्या बाहेर गेले नाही. शिवाय सिव्हील लाईन्समध्ये धुलिकणांचे प्रमाणही मर्यादेबाहेर गेले नाही. १०० मायक्रोग्रॅम ही सर्वोच्च मर्यादा आहे आणि ६० मायक्रोग्रॅम (म्युग्रॅ)हे आदर्श प्रमाण. मात्र तिन्ही ठिकाणी याचे प्रमाण २०१० पासून एप्रिल महिन्यात कायम मर्यादेच्या बाहेर गेले आहे. २०१५ मध्ये धुलिकणांचे प्रमाण सदर व सीताबर्डी येथे १४० म्युग्रॅ तर एमआयडीसी येथे १८० म्युग्रॅम पर्यंत वाढले होते. इतर वर्षी ते १०० च्या आसपास राहिले आहे. मात्र यावेळी हेच प्रमाण ६० ते ६५ म्युग्रॅम पर्यंत खाली घसरले आहे. ४० ते ६० वर राहणाऱ्या एसओ2 व १० ते २० दरम्यान राहणाऱ्या एनओ2 ने ८० म्युग्रॅमची मर्यादा कधी ओलांडली नाही.मोठ्या प्रमाणात चालणारे उद्योग, बांधकाम कार्य, कचरा जाळणे आणि काही प्रमाणात वाहनांमुळे धुलिकणांचे प्रदूषण अधिक असते. लॉकडाऊन काळात उद्योग व बांधकाम बंद आहेत व कचरा जाळणे दिसून येत नाही. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुढचे अनेक वर्षे याचा फायदा होणार आहे.- डॉ. दिलीप लटाये, सिव्हील इंजिनिरिंग विभाग, व्हीएनआयटी

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूर