शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Riots: नागपूरातील 'या' भागातील कर्फ्यू उठविला; पोलिस आयुक्तांचा आदेश

By दयानंद पाईकराव | Updated: March 22, 2025 20:51 IST

इतर भागात कर्फ्यू लागू, कोतवाली, तहसिल, गणेशपेठमध्ये शिथिलता

दयानंद पाईकराव 

नागपूर : महाल येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर १७ मार्चला झालेल्या आंदोलनामुळे झालेल्या दंगलीत तणाव निर्माण होऊन दगडफेक करण्यात आली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने शहरातील ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. परंतु शाळकरी विद्यार्थी, व्यापारी यांना होत असलेल्या त्रासामुळे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ (१) (२) (३) नुसार त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करून शनिवारी सायंकाळी सक्करदरा, इमामवाडा, पाचपावली, शांतीनगर आणि लकडगंजमधील नागरिकांना दिलासा देत या भागातील कर्फ्यू उठविण्याचा आदेश काढला आहे. परंतू इतर भागातील कर्फ्यू सुरुच राहणार असून कोतवाली, तहसिल आणि गणेशपेठमध्ये कर्फ्यू काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे.

या भागातील कर्फ्यू उठविलापोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी शनिवारी २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेपासून झोन ३ मधील पाचपावली, शांतीनगर, लकडगंज ठाण्याच्या हद्दीतील आणि झोन ४ मधील सक्करदरा, इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कर्फ्यू उठविण्याचा आदेश काढला आहे.

येथे कर्फ्यू राहणार कायमपोलिस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार झोन ३ मधील कोतवाली, गणेशपेठ, तहसिल, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत व झोन ४ मधील सक्करदरा, इमामवाडा व झोन ५ मधील यशोधरानगर ठाण्याच्या परिसरात कर्फ्यू लागू राहणार आहे.

कोतवाली, तहसिल, गणेशपेठमध्ये शिथिलतापोलिस आयुक्तांनी झोन ३ मधील कोतवाली, तहसिल आणि गणेशपेठ येथील कर्फ्यूमध्ये शनिवारी २२ मार्च २०२५ च्या सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू रात्री १० वाजेनंतर या भागातील कर्फ्यू पुर्ववत अंमलात राहणार आहे.

यशोधरानगरमधील कर्फ्यू कायमझोन ५ मधील यशोधरानगरमधील कर्फ्यू पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

अत्यावश्यक सेवांना कर्फ्यूतून सुटझोन ३ आणि ५ मधील नमूद पोलिस ठाण्यांकडे येणारे मार्ग कायदा व सुव्यवस्था पाहून बंद करण्याचे अधिकार व आदेश अंमलबजावणी करण्याचे अधिकार नेमण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना राहणार आहेत. कर्फ्यूच्या आदेशाचा भंग करणाऱी व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ नुसार शिक्षेस पात्र राहणार आहे. परंतू कर्तव्यावर असलेल्या पोलीस आधिकारी/कर्मचारी, शासकीय, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, अत्यावश्यक सेवा व अग्नीशामक दल तसेच विविध विभागाच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थी व परीक्षेशी संबंधीत व्यक्तींना हा आदेश लागु राहणार नसल्याचे पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस