शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने उलटूनही नागपूर दंगलग्रस्तांना अद्याप भरपाई मिळाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:12 IST

Nagpur : फाइल क्लीअर करण्यासाठी महिनाभर एसडीएम कार्यालयात चकरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात मार्चमध्ये झालेल्या दंगलीत नुकसान झालेल्या वाहनांच्या मालकांना प्रशासनाकडून अद्याप भरपाई मिळालेली नाही. तीन महिने उलटूनही त्यांना सरकारी विभागांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोलिस आणि प्रशासनाने भरपाईची रक्कम निश्चित केल्यानंतरही ती देण्यास एवढा विलंब का होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

या पीडितांपैकी एक असलेले चिटणवीस पार्कजवळ राहणारे मधुसूदन सिंघानिया. त्यांनी 'लोकमत'शी बोलताना आपली व्यथा सांगितली. सिंघानिया म्हणाले, १७ मार्च रोजी महाल परिसरात अचानक दंगल उसळली. यादरम्यान, दुरुगकर चाळ परिसरात पार्क केलेली एक कार दंगलखोरांनी पेटवून दिली. बाइक क्रमांक सीजी १० बीके ३६२४ देखील या कारजवळ पार्क केलेली होती. दंगलखोरांनी या बाइकची तोडफोड केली आणि गाडीचा आरसा आणि हेल्मेटही सोबत घेऊन गेले. घटनेनंतर पोलिसांनी जबाब नोंदवून पंचनामा केला. पण, पंचनाम्याची प्रत मिळविण्यासाठी अनेक दिवस गणेशपेठ पोलिसांकडे जावे लागले. फाइल क्लीअर करण्यासाठी महिनाभर एसडीएम कार्यालयात चकरा मारल्या. काम न झाल्याने अखेर एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटून विनवणी केली. 

त्यानंतर फाइल क्लीअर करण्यात आली. मधुसूदन सिंघानिया यांना मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने हर्ष बुल्स प्रायव्हेट लिमिटेड, बिलासपूरच्या नावाने १० हजार रुपये भरपाई म्हणून मंजूर केले. त्यांच्याप्रमाणेच, विलास शंकर यांच्या घराच्या नुकसानीसाठी ३५ हजार रुपये, अक्षय श्रीवास यांच्या दुकानाच्या नुकसानीसाठी २० हजार आणि संकेत मंगरूळकर यांच्या गाडीच्या नुकसानीसाठी ४० हजार रुपये मंजूर करण्यात आले. परंतु, गेल्या एक महिन्यापासून सिंघानिया भरपाई मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर