शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

नागपूर मेट्रो: धूळ, खड्डे अन् वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:07 AM

विकासाच्या नावावर पूर्व नागपूरचे नागरिक दु:ख सहन करण्यास तयार होते. पण समस्या मोठ्या झाल्यामुळे आता हे दु:ख सहन करण्यापलीकडे गेले आहे.

ठळक मुद्देपूर्व नागपूरचे नागरिक बेहालउड्डाण पूल व मेट्रोचे बांधकाम बनले डोकेदुखी

आॅनलाईन लोकमतनागपूर : विकासाच्या नावावर पूर्व नागपूरचे नागरिक दु:ख सहन करण्यास तयार होते. पण समस्या मोठ्या झाल्यामुळे आता हे दु:ख सहन करण्यापलीकडे गेले आहे. वाहतुकीची कोंडी, धूळ-मातीचे ढिगारे, खड्डे, बॅरिकेट्मुळे एकाच मार्गावरून नागरिकांना ये-जा करावी लागत असल्यामुळे त्यांना दररोज अनेक समस्या आणि अडचणींचा सामनागत आहे. असे विकास कार्य पुन्हा होऊ नये, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून पारडी उड्डाण पुलाचे बांधकाम कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, दुकानदार आधीच त्रस्त होते. आता याच परिसरात मेट्रो रेल्वेचे बांधकाम वेगात सुरू आहे. एचबी टाऊन चौक, पारडी ते वर्धमाननगरकडे जाणाºया रस्त्याचा एक भाग फ्लायओव्हरच्या कामामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दुसºया रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू आहे. या मार्गावर बॅरिकेट्स लावताना वाहतुकीची कोंडी होईल, याकडे कानाडोळा केला आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे उड्डाण पूल बांधण्यात येत आहे. पण प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. येथे पिलर उभारण्यात येत आहेत. त्यामुळे धूळ-माती हवेतून लगतच्या मार्गावर आणि दुकानात जात आहे. स्थानीय नागरिकांच्या तक्रारीकडे कुणीही लक्ष देत नाही. नागरिकांना कळमना, पारडी, वर्धमाननगर, मिनीमातानगर, भांडेवाडी या परिसरातून जीव धोक्यात टाकून जावे लागते. बांधकाम नियोजनबद्ध नसल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे.जड वाहनांचा धोकाकळमना बाजारपेठ पूर्व नागपुरात आहे. या बाजारात दररोज १५० ते २०० जड वाहने येतात. भंडारा रोड हा रिंग रोड असल्यामुळे नागपुरातून अन्य भागांना जोडणाऱ्या सेंट्रल एव्हेन्यूमुळे या मार्गावरून दररोज हजारो लहानमोठ्या वाहनांची ये-जा आहे. सकाळी आणि सायंकाळी नेहमीच वाहनांच्या लांब रांगा असतात. पण आता मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे ब्लॉक करण्यात आलेल्या रस्त्यामुळे समस्या आणखी वाढली आहे.

दुरुस्तीविना बंद केला मार्गएचबी टाऊन ते वर्धमाननगरकडे जाणाऱ्या मार्गाला फ्लायओव्हरच्या कामामुळे बंद करण्यात आले आहे. तर त्याच्या पहिल्या मार्गाच्या दुसऱ्या काही भागात (वर्धमाननगर ते एचबी टाऊनकडे) मेट्रो स्टेशनसाठी खोदकाम करण्यात आले आहे. खोदण्यात आलेल्या रस्त्याचे डांबरीकरण न करताच एचबी टाऊन, पारडी चौक मार्गाला बंद केल्यामुळे समस्या वाढली आहे.रात्री होतात अपघातउड्डाण पुलाच्या पिलरमुळे पारडी चौकाच्या चारही मार्गावर खोदकाम करण्यात आले आहे. या मार्गावरून विजेचे खांब हटविले आहेत. अंधारात मार्ग दिसावा म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बॅरिकेट्स आणि रिफ्लेक्टर केवळ नावासाठी लावले आहेत. त्याचा दुचाकी वाहनचालकांना त्रास होत आहे. या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. वर्धमाननगर ते प्रजापतीनगरदरम्यान उड्डाण पुलासाठी लावण्यात आलेले बॅरिकेट्स हटविले आहेत, पण पिलरचे बांधकाम अर्धवट आहे. माती रस्त्यावर पसरली आहे. या ठिकाणी रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्री वाहनचालक थेट बांधकामस्थळी गाडी नेत आहेत.मार्गावर खड्डेच खड्डेवर्धमाननगर, पारडी चौक, पारडी बाजार, कळमना रोड, प्रजापतीनगर ते स्वामी नारायण मंदिरसह डझनभर मार्गाची स्थिती गंभीर आहे. पिलरच्या बांधकामामुळे या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. खड्डे समतोल करण्यासाठी त्यात माती टाकण्यात येत आहे. मंगळवारी रात्री काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले. पण ते कामही अर्धवट आहे.लोकप्रतिनिधींच्या डोळ्यावर पट्टीया परिसरातील बहुतांश लोकप्रतिनिधी भाजपाचे आहेत. मनपा, राज्य व केंद्रात भाजपाची सत्ता आहे. उड्डाण पूल आणि मेट्रो रेल्वेच्या बांधकामाला विकास कामांसोबत जोडण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी समस्या आणि अडचणीसंदर्भात नागरिकांसोबत कधीही चर्चा केलेली नाही. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कार्यप्रणालीत सुधारणा करण्याचे साधे निर्देशही दिले नाहीत. जीव धोक्यात टाकून पारडी चौकातून जावे लागते, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. पारडी चौक अािण पारडी बाजारात रस्ते अपघातात अनेकांचा जीव गेला आहे.

टॅग्स :Metroमेट्रोroad safetyरस्ते सुरक्षा