शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

 नागपुरात अपघाताच्या प्रमाणात ९.५४ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:07 AM

नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले.

ठळक मुद्दे२०१६ मध्ये १३७३ तर २०१७ मध्ये १२४२ अपघात

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही रस्ता वापरणाऱ्या घटकांनी याबाबत गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले.वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमण व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे, शिवाय प्रदूषणामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये नागपूर शहरात १३७३ अपघात झाले होते. यात ३०७ मृत्यू तर १५१० नागरिक जखमी झाले. २०१५ च्या तुलनेत अपघाताचा हा आकडा ४.८१ टक्क्यांनी वाढला होता.आठ वर्षांत पहिल्यांदाच प्रमाण घटलेनागपूर शहरात २०१३ मध्ये १०२९, २०१४ मध्ये ११४८ अपघात झाले. अपघाताचे हे प्रमाण ११.५६ टक्क्यांनी वाढले होते. २०१५ मध्ये १३१० अपघात होऊन यात १४.११ टक्क्यांनी वाढ झाली. २०१६ मध्ये १३७३ अपघात होऊन प्रमाण ४.८१ टक्क्यांपर्यंत पोहचले. मात्र २०१७ मध्ये १२४२ अपघात होऊन अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी कमी झाले. गेल्या आठ वर्षात पहिल्यांदाच अपघाताची संख्या घटली.मृत्यूचे प्रमाण २४.७६रस्ते अपघातात २०१३ मध्ये २४८ तर २०१४ मध्ये २८६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. हे प्रमाण १५.३२ टक्के एवढे होते. २०१५ मध्ये रस्ता अपघातातील मृत्यूचे हे प्रमाण ८.३९ टक्क्यांनी कमी झाले. त्यावर्षी २६२ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये पुन्हा अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले. ३९७ मृत्यूची नोंद झाली. १७.१८ टक्क्यांनी हे प्रमाण वाढले होते. मात्र २०१७ मध्ये मृत्यूचे प्रमाण २४.७६ टक्क्यांनी घसरले. या वर्षात २३१ मृत्यू झाले.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर