शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नागपूर ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:55 IST

६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते व १८० पूल नादुरुस्त झाले आहेत. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने ११५ कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे. यापूर्वीही २०१३-१४ व २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हाही १५८ व ४० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तेव्हाचाही दुरुस्तीचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीचा बॅकलॉग वाढतो आहे.

ठळक मुद्देरस्त्यांच्या दुरुस्तीचा बॅकलॉग : २०१३-१४ पासून दुरुस्तीच्या निधीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते व १८० पूल नादुरुस्त झाले आहेत. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने ११५ कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे. यापूर्वीही २०१३-१४ व २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हाही १५८ व ४० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तेव्हाचाही दुरुस्तीचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीचा बॅकलॉग वाढतो आहे.शहरात एकीकडे कोट्यवधीचे सिमेंट रोड बनत आहेत. महामार्गाचेही काम झपाट्याने सुरू आहे. पण ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यातच ६ जुलैला झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागातील रस्त्यांची धुळधाणच झाली आहे. याचा सर्वाधिक फटका हिंगणा तालुक्यातील रस्त्यांना बसला आहे. त्याचबरोबर जवळपास १८० कालवे, लहान पूलसुद्धा पावसामुळे नादुरुस्त झाले आहेत. बांधकाम विभागाने रस्त्यांचा सर्वे करून दुरुस्तीसाठी ११५ कोटी रुपयांचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे.यापूर्वी २०१३-१४ मध्येसुद्धा अतिवृष्टीने ८०३ रस्ते व ३०६ पुलांची दुरवस्था झाली होती. त्यावेळी दुरुस्तीसाठी १५८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यातून केवळ ३२ कोटी रुपये निधी जि.प.ला प्राप्त झाला होता. २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीने १८३ रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हा ४० कोटी ८० लाखाचा प्रस्ताव पाठविला होता. हा सुद्धा निधी मिळाला नाही. तालुकानिहाय रस्त्यांची दुरवस्थातालुका               रस्ते                 पूल                    दुरुस्तीचा प्रस्तावनागपूर                २८                   १२                    १० कोटी २० लाखहिंगणा                 ३०                  २१                     १४ कोटी ५० लाखकळमेश्वर            २८                  ७                       ११ कोटी ४ लाखकाटोल               २०                   ४                      ६ कोटी ९० लाखनरखेड               २१                   ०                       ९ कोटीसावनेर               १३                   ९                      ४ कोटी ३० लाखपारशिवनी          १७                  ६                      ४ कोटी ६५ लाखरामटेक              १६                 १६                     ४ कोटी ८ लाखमौदा                  २४                 १९                    ८ कोटी २६ लाखकामठी              १६                  ५                     ७ कोटी ६० लाखउमरेड               २४                १९                    ७ कोटी २३ लाखभिवापूर             ३७                ३५                    १४ कोटी ८२ लाखकुही                 ४३                 २७                     १२ कोटी ६७ लाखशासनाचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष२०१३ पासून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाचा जि.प. प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला. शासनाकडून केवळ ३२ कोटीचा तोकडा निधी प्राप्त झाला. तेव्हापासून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था आहे. ६ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे तर रस्त्याची दैनावस्था झाली आहे. ११५ कोटीचा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनावस्था लक्षात घेता शासनाने तातडीने निधी मंजूर करावा.शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक