शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:55 IST

६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते व १८० पूल नादुरुस्त झाले आहेत. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने ११५ कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे. यापूर्वीही २०१३-१४ व २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हाही १५८ व ४० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तेव्हाचाही दुरुस्तीचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीचा बॅकलॉग वाढतो आहे.

ठळक मुद्देरस्त्यांच्या दुरुस्तीचा बॅकलॉग : २०१३-१४ पासून दुरुस्तीच्या निधीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते व १८० पूल नादुरुस्त झाले आहेत. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने ११५ कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे. यापूर्वीही २०१३-१४ व २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हाही १५८ व ४० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तेव्हाचाही दुरुस्तीचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीचा बॅकलॉग वाढतो आहे.शहरात एकीकडे कोट्यवधीचे सिमेंट रोड बनत आहेत. महामार्गाचेही काम झपाट्याने सुरू आहे. पण ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यातच ६ जुलैला झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागातील रस्त्यांची धुळधाणच झाली आहे. याचा सर्वाधिक फटका हिंगणा तालुक्यातील रस्त्यांना बसला आहे. त्याचबरोबर जवळपास १८० कालवे, लहान पूलसुद्धा पावसामुळे नादुरुस्त झाले आहेत. बांधकाम विभागाने रस्त्यांचा सर्वे करून दुरुस्तीसाठी ११५ कोटी रुपयांचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे.यापूर्वी २०१३-१४ मध्येसुद्धा अतिवृष्टीने ८०३ रस्ते व ३०६ पुलांची दुरवस्था झाली होती. त्यावेळी दुरुस्तीसाठी १५८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यातून केवळ ३२ कोटी रुपये निधी जि.प.ला प्राप्त झाला होता. २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीने १८३ रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हा ४० कोटी ८० लाखाचा प्रस्ताव पाठविला होता. हा सुद्धा निधी मिळाला नाही. तालुकानिहाय रस्त्यांची दुरवस्थातालुका               रस्ते                 पूल                    दुरुस्तीचा प्रस्तावनागपूर                २८                   १२                    १० कोटी २० लाखहिंगणा                 ३०                  २१                     १४ कोटी ५० लाखकळमेश्वर            २८                  ७                       ११ कोटी ४ लाखकाटोल               २०                   ४                      ६ कोटी ९० लाखनरखेड               २१                   ०                       ९ कोटीसावनेर               १३                   ९                      ४ कोटी ३० लाखपारशिवनी          १७                  ६                      ४ कोटी ६५ लाखरामटेक              १६                 १६                     ४ कोटी ८ लाखमौदा                  २४                 १९                    ८ कोटी २६ लाखकामठी              १६                  ५                     ७ कोटी ६० लाखउमरेड               २४                १९                    ७ कोटी २३ लाखभिवापूर             ३७                ३५                    १४ कोटी ८२ लाखकुही                 ४३                 २७                     १२ कोटी ६७ लाखशासनाचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष२०१३ पासून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाचा जि.प. प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला. शासनाकडून केवळ ३२ कोटीचा तोकडा निधी प्राप्त झाला. तेव्हापासून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था आहे. ६ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे तर रस्त्याची दैनावस्था झाली आहे. ११५ कोटीचा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनावस्था लक्षात घेता शासनाने तातडीने निधी मंजूर करावा.शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक