शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

नागपूर ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:55 IST

६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते व १८० पूल नादुरुस्त झाले आहेत. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने ११५ कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे. यापूर्वीही २०१३-१४ व २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हाही १५८ व ४० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तेव्हाचाही दुरुस्तीचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीचा बॅकलॉग वाढतो आहे.

ठळक मुद्देरस्त्यांच्या दुरुस्तीचा बॅकलॉग : २०१३-१४ पासून दुरुस्तीच्या निधीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ५८७ किलोमीटर लांबीचे रस्ते व १८० पूल नादुरुस्त झाले आहेत. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने ११५ कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे. यापूर्वीही २०१३-१४ व २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हाही १५८ व ४० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तेव्हाचाही दुरुस्तीचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीचा बॅकलॉग वाढतो आहे.शहरात एकीकडे कोट्यवधीचे सिमेंट रोड बनत आहेत. महामार्गाचेही काम झपाट्याने सुरू आहे. पण ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यातच ६ जुलैला झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागातील रस्त्यांची धुळधाणच झाली आहे. याचा सर्वाधिक फटका हिंगणा तालुक्यातील रस्त्यांना बसला आहे. त्याचबरोबर जवळपास १८० कालवे, लहान पूलसुद्धा पावसामुळे नादुरुस्त झाले आहेत. बांधकाम विभागाने रस्त्यांचा सर्वे करून दुरुस्तीसाठी ११५ कोटी रुपयांचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविला आहे.यापूर्वी २०१३-१४ मध्येसुद्धा अतिवृष्टीने ८०३ रस्ते व ३०६ पुलांची दुरवस्था झाली होती. त्यावेळी दुरुस्तीसाठी १५८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यातून केवळ ३२ कोटी रुपये निधी जि.प.ला प्राप्त झाला होता. २०१४-१५ मध्येसुद्धा अतिवृष्टीने १८३ रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तेव्हा ४० कोटी ८० लाखाचा प्रस्ताव पाठविला होता. हा सुद्धा निधी मिळाला नाही. तालुकानिहाय रस्त्यांची दुरवस्थातालुका               रस्ते                 पूल                    दुरुस्तीचा प्रस्तावनागपूर                २८                   १२                    १० कोटी २० लाखहिंगणा                 ३०                  २१                     १४ कोटी ५० लाखकळमेश्वर            २८                  ७                       ११ कोटी ४ लाखकाटोल               २०                   ४                      ६ कोटी ९० लाखनरखेड               २१                   ०                       ९ कोटीसावनेर               १३                   ९                      ४ कोटी ३० लाखपारशिवनी          १७                  ६                      ४ कोटी ६५ लाखरामटेक              १६                 १६                     ४ कोटी ८ लाखमौदा                  २४                 १९                    ८ कोटी २६ लाखकामठी              १६                  ५                     ७ कोटी ६० लाखउमरेड               २४                १९                    ७ कोटी २३ लाखभिवापूर             ३७                ३५                    १४ कोटी ८२ लाखकुही                 ४३                 २७                     १२ कोटी ६७ लाखशासनाचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष२०१३ पासून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाचा जि.प. प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला. शासनाकडून केवळ ३२ कोटीचा तोकडा निधी प्राप्त झाला. तेव्हापासून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था आहे. ६ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे तर रस्त्याची दैनावस्था झाली आहे. ११५ कोटीचा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनावस्था लक्षात घेता शासनाने तातडीने निधी मंजूर करावा.शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक