शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील एक लाखाहून अधिक झोपडपट्टीधारक दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:09 IST

पूर्व नागपुरातील आदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारक दहशतीत आहेत.

ठळक मुद्देआदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपड्या हटविण्यासाठी नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात ४२७ झोपडपट्ट्या आहेत. यातील जवळपास २९८ नोटिफाईड झालेल्या आहेत. विशेष म्हणगजे शहरातील नाल्याच्या काठावर ५० हून अधिक झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. यात एक लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. पूर्व नागपुरातील आदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारक दहशतीत आहेत.आदर्श नगर नाल्यांची काही दिवसापूर्वी संरक्षण भिंत पडली. या भिंती लगतच्या काही घरांना धोका निर्माण झाला. या नागरिकांनी स्वत:हून आपली घरे सोडण्याची तयारी दर्शवली. परंतु मनपाच्या अतिक्रमण विभागाने तीन झोपड्या पोलिसांच्या मदतीने हटविल्या, तसेच काठावरील अन्य झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण घेण्यासंदर्भात नोटीस बजावली. आदर्श नगर ही झोपडपट्टी नोटीफाईड आहे. येथील झोपडपट्टीधारकांना मनपा प्रशासनाने मालकी हक्क पट्टे वाटप केले आहे. असे असतानाही अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील झोपडपट्टीधारकांत दहशतीचे वातावरण आहे.पावसाळा आला की मनपा प्रशासनातर्फे नदी-नाले काठावरील झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात अतिक्रमण हटविणे योग्य नाही. याची जाणीव असूनही अशा स्वरूपाच्या नोटीस बजावल्या जातात.आधी पुनर्वसन नंतर कारवाई करादेशातील कोणताही नागरिक बेघर राहणार नाही, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. यातूनच पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले जात आहे. असे असतानाही झोपडपट्टीधारकांना अतिक्रमणाच्या नावाखाली नोटीस बजावणे योग्य नाही. आधी पुनर्वसन करा नंतर अतिक्रमण हटवा, अशी मागणी झोपडपट्टीधारकांनी केली आहे. तर प्रशासनाने ही कारवाई तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा अ‍ॅड. यशवंत मेश्राम यांनी दिला आहे.कारवाईपूर्वी पुनर्वसन कराआदर्श नगर झोपडपट्टी नोटीफाईड आहे. येथील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहे. नाल्याची भिंत जीर्ण झाल्याने धोका असलेल्या घरमालकांनी स्वत:हून घरे पाडण्याची तयारी दर्शविली.परंतु मनपाच्या अधिकाऱ्­यांनी धोका असलेली इमारत न पडता बाजूच्या झोपड्या पाडल्या. अन्य घरांनाही नोटीस बजावल्या. झोपडपट्टीधारकाचे पुनर्वसन न करता नोटीस बजावणे योग्य नाही. आधी पुनर्वसन करा नंतर कारवाई करा.दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेसमनपाची कारवाई अन्यायकारकआदर्श नगर स्लम नोटीफाईड आहे. येथील लोकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी केलेले बांधकाम अधिक्रमण ठरवून नोटीस बजावणे योग्य नाही मनपा प्रशासनाने आधी त्यांचे पुनर्वसन करावे नंतरच कारवाई करावी.अ‍ॅड. यशवंत मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक.कोरोना विस्थापित करणे अयोग्यकोरोनामुळे सर्वजण संकटात आहेत. त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत.अशा परिस्थितीत झोपडपट्टीधारकांना विस्थापित करणे योग्य नाही. आधी त्यांची पुनर्वसनाची व्यवस्था करावी नंतरच प्रशासनाने कारवाई करावी.अनिल वासनिक, संयोजक विकास मंचकारवाई नियमानुसारचबांधकाम नकाशा मंजूर केल्याशिवाय मालकीहक्क पट्टे वाटप करता येत नाही. झोपडपट्टीधारकांनी आधी बांधकाम मंजूर करून घेणे अपेक्षित होते. परंतु तसे केले नाही. ६०० फुटाऐवजी अनेकांनी २ हजार चौरस फूट जागेत दोन मजली घरे उभारली. आदर्श नगर नाल्याची भिंत कोसळली. बाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. उद्या एखादी दुर्घटना घडली तर यासाठी मनपालाच दोषी धरले जाईल. त्यामुळे कारवाई योग्यच आहे.महेश मोरोणे उपायुक्त मनपा

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका