शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

मोदींचा ११ वर्षाचा काळ हा सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा

By गणेश हुड | Updated: June 10, 2025 16:31 IST

दयाशंकर तिवारी : भाजपतर्फे नागपुरात विविध कार्यक्रमांचे नियोजन

गणेश हूड/ नागपूर  

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४ ते २०२५ या अकरा वर्षांत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या क्षेत्रात प्रगती केली आहे. या ‘विकसित भारताचा अमृत काल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालखंडाचा गौरव करण्यासाठी नागपूर शहर भाजपतर्फे विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष दयाशंकर निवारी यांनी मंगळवारी पक्षकार परिषदेत दिली. या ११ वर्षांत २६ कोटी नागरिक दारिद्र रेषेच्यावर आले, घरकुल, वीज, पाणी, शौचालय आणि अन्नसुरक्षा अशा मुलभूत गरजा पूर्ण झाल्या. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूरात कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

१२ जूनला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होणार आहे. २०० जनसंवाद सभा, २० संकल्पसभा, चित्रप्रदर्शने, संवाद मेळावे, चौपाळ संवाद, शिबिरे, आयटी स्पर्धा, सोशल मीडिया चर्चा आणि २१ जूनला सुरेश भट सभागृहात विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत "घर चलो" उपक्रमाद्वारे नागपूरकरांच्या घरोघरी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवली जाणार असल्याची माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली. यावेळी माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलींद माने, गिरीश व्यास, संदीप जाधव, बाल्या बोरकर आदी उपस्थित होते.

असे राबविणार उपक्रम

  • आयटी सेल स्पर्धा: केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या प्रगतीवर आधारित डिजिटल मिडिया स्पर्धा
  • चित्रप्रदर्शने: ६ विधानसभा क्षेत्रांत केंद्र सरकारच्या कामगिरीचे दृश्य प्रदर्शन.
  • कल्याणकारी योजनांसाठी शिबिरे: २० मंडळांमध्ये शासकीय योजना नागरीकांपर्यंत पोहोचविणार
  • सोशल मिडिया पॅनल चर्चा: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी शासनाच्या उपलब्ध्यांवर चर्चा.
  • चौपाळ संवाद: शहरातील उद्याने, चौक, मॉल्समध्ये केंद्र सरकारच्या कामगिरीवर संवाद.
  • विशेष संवाद सत्र: २१ जून रोजी सुरेश भट सभागृहात
  • "घर चलो" अभियान: केंद्र व राज्य सरकार तसेच मनपाच्या योजनांची माहिती देणार
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाnagpurनागपूर