शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

मोदींचा ११ वर्षाचा काळ हा सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा

By गणेश हुड | Updated: June 10, 2025 16:31 IST

दयाशंकर तिवारी : भाजपतर्फे नागपुरात विविध कार्यक्रमांचे नियोजन

गणेश हूड/ नागपूर  

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४ ते २०२५ या अकरा वर्षांत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या क्षेत्रात प्रगती केली आहे. या ‘विकसित भारताचा अमृत काल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालखंडाचा गौरव करण्यासाठी नागपूर शहर भाजपतर्फे विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष दयाशंकर निवारी यांनी मंगळवारी पक्षकार परिषदेत दिली. या ११ वर्षांत २६ कोटी नागरिक दारिद्र रेषेच्यावर आले, घरकुल, वीज, पाणी, शौचालय आणि अन्नसुरक्षा अशा मुलभूत गरजा पूर्ण झाल्या. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूरात कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

१२ जूनला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होणार आहे. २०० जनसंवाद सभा, २० संकल्पसभा, चित्रप्रदर्शने, संवाद मेळावे, चौपाळ संवाद, शिबिरे, आयटी स्पर्धा, सोशल मीडिया चर्चा आणि २१ जूनला सुरेश भट सभागृहात विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत "घर चलो" उपक्रमाद्वारे नागपूरकरांच्या घरोघरी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवली जाणार असल्याची माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली. यावेळी माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलींद माने, गिरीश व्यास, संदीप जाधव, बाल्या बोरकर आदी उपस्थित होते.

असे राबविणार उपक्रम

  • आयटी सेल स्पर्धा: केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या प्रगतीवर आधारित डिजिटल मिडिया स्पर्धा
  • चित्रप्रदर्शने: ६ विधानसभा क्षेत्रांत केंद्र सरकारच्या कामगिरीचे दृश्य प्रदर्शन.
  • कल्याणकारी योजनांसाठी शिबिरे: २० मंडळांमध्ये शासकीय योजना नागरीकांपर्यंत पोहोचविणार
  • सोशल मिडिया पॅनल चर्चा: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी शासनाच्या उपलब्ध्यांवर चर्चा.
  • चौपाळ संवाद: शहरातील उद्याने, चौक, मॉल्समध्ये केंद्र सरकारच्या कामगिरीवर संवाद.
  • विशेष संवाद सत्र: २१ जून रोजी सुरेश भट सभागृहात
  • "घर चलो" अभियान: केंद्र व राज्य सरकार तसेच मनपाच्या योजनांची माहिती देणार
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाnagpurनागपूर