शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कोरोनाच्या काळात अनेकांची अडकली पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 20:50 IST

अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्त सेवकाला त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेन्शनचा आधार असतो. मात्र, काही निवृत्त सेवकांना ही पेन्शन मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. ईपीएफ ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत हा घोळ होत असल्याचे पुढे येत आहे.

ठळक मुद्देपीएफ ऑफिसमध्ये संसर्गाचा शिरकाव झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्त सेवकाला त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेन्शनचा आधार असतो. मात्र, काही निवृत्त सेवकांना ही पेन्शन मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. ईपीएफ ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत हा घोळ होत असल्याचे पुढे येत आहे.बऱ्याच शासकीय, निमशासकीय आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला त्याच्या निवृत्तीनंतर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑफिसमधून निवृत्तिवेतन मिळत असते. सेवेत असताना त्याच्या पगारातून होणाऱ्या कपातीतून संबंधिताच्या उत्तर काळासाठी ही योजना आहे. त्यासाठी प्रत्येक निवृत्तिवेतन (पेन्शन)धारकाला त्यासाठी हयात असल्याचे ‘जीवन प्रमाण’ प्रमाणपत्र भरून द्यावे लागते. नोव्हेंबर ते नोव्हेंबर असा या प्रमाणपत्राचा काळ असतो. पूर्वी जानेवारीपर्यंत हे प्रमाणपत्र भरून देण्याची मुभा होती. मात्र, त्यात सुधारणा करत आता हे प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये भरणे व अपडेट करावे लागत आहे. मात्र, वृद्धत्वामुळे अनेक जण प्रमाणपत्र अपडेट करणे विसरतात. त्याबाबत कार्यालयाकडून तशी सूचनाही वारंवार दिली जाते. ही सर्व यंत्रणा ऑटोमॅटिक आहे. परंतु, मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गाने ही सर्व यंत्रणा विस्कळीत पडल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम अनेकांचे प्रमाणपत्र अपडेट झालेले नाहीत. शिवाय, ईपीएफओमध्येही कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला आणि कोरोनामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांचा बळीही गेला आहे. याचा फटका निवृत्तिवेतनधारकांना बसतो आहे.चार-पाच महिन्यापासून पेन्शनच नाही - चतारेमी ऑल इंडिया रिपोर्टरमध्ये नोकरीला होतो. २०१७ मध्ये सेवेतून निवृत्त झालो. निवृत्तिवेतन बरोबर खात्यात जमा होत होते. मात्र, गेल्या चार-पाच महिन्यापासून पेन्शन बंद झाली आहे. माझे जीवन प्रमाणपत्र अपडेट असतानाही ही समस्या होत आहे. मी स्वत: आजारामुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होतो. अशा अडचणीच्या काळातही पेन्शन मिळत नसेल तर काय अर्थ आहे, अशी भावना ओमप्रकाश चतारे यांनी व्यक्त केली.कर्मचाऱ्यांची उणीवकोरोनामुळे ईपीएफओमध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांचे निधन झाले आणि काही कर्मचारी क्वारंटाईन आहेत. अशा स्थितीत या समस्या निर्माण होत आहेत. अनेकांनी ऑटोमॅटिक यंत्रणेद्वारेही आपले जीवन प्रमाणपत्र अपडेट केले नाही. मात्र, हे प्रमाणपत्र अपडेट झाले की पेन्शन सुरू होईल, अशी माहिती ईपीएफओमधील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीnagpurनागपूर