शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

ऐकावे ते नवलच! विद्यार्थिनी एक अन् शिक्षक दोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:45 IST

काटोल तालुक्यातील आलागोंदी शाळेतील वास्तव : जि.पं च्या अनेक शाळेत शिक्षकांची बोंब

सौरभ ढोरे

काटोल (नागपूर) : ४२ जिल्हा परिषद शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. जिल्ह्यात ७२५ शिक्षकांची तातडीने गरज आहे. मात्र, काटोल तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या आलागोंदी जिल्हा परिषद शाळेत एका विद्यार्थिनीला शिकविण्यासाठी दोन शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आलागोंदी शाळेची स्थापना २००१ मध्ये झाली. या शाळेत २०१८ ला राजेंद्र टेकाडे या शिक्षकाची बदली करण्यात आली होती. तेव्हा शाळेची पटसंख्या ४ होती. दोन वर्षांत विविध शैक्षणिक उपक्रमामुळे आदर्श शाळा म्हणून या शाळेने लौकिक प्राप्त केला होता. २०२० मध्ये येथे विद्यार्थीसंख्या १२ होती. कोविड काळात ही शाळा बंद पडली. यानंतर शिक्षक टेकाडे यांना जिल्हा परिषदेच्या अभ्यास केंद्रात स्थानांतरित करण्यात आले. याच काळात काही विद्यार्थी चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून इतर माध्यमिक शाळेत पाचव्या वर्गाच्या शिक्षणाकरिता निघून गेले. यानंतर येथे पहिल्या वर्गात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही. आता या शाळेत इयत्ता तिसरीत वंशिका किशोर गजाम ही एकमेव विद्यार्थिनी आहे. तिला शिकविण्यासाठी गोपाल नेहारे व राजेंद्र टेकाडे दोन शिक्षक कार्यरत आहेत.

‘सीईओ’च्या आदेशाचे काय?

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौम्या शर्मा यांनी १९ जून रोजी आदेश काढत जिथे २० पेक्षा कमी पटसंख्या आहे व दोन शिक्षक कार्यरत आहेत तेथील एका कनिष्ठ शिक्षकाला २० पेक्षा अधिक पटसंख्या व एक शिक्षक कार्यरत असणाऱ्या शाळेत स्थानांतरित करण्यात यावे, असे निर्देश दिले होते. मात्र शिक्षण विभाग ‘सीईओ’च्या आदेशाकडे डोळेझाक का करतो आहे, हा प्रश्नच आहे.

हे आहे वास्तव

काटोल तालुक्यातील काही जि.प.शाळेत २० पेक्षा जास्त पटसंख्या आहे. याकरिता ६८ शिक्षकांची तातडीने गरज आहे. मात्र आलागोंदीप्रमाणे २० शाळेत २० पेक्षा कमी पटसंख्या असतानाही दोन शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे येथील शिक्षकांना इतरत्र स्थानांतरित करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकStudentविद्यार्थीnagpurनागपूरzp schoolजिल्हा परिषद शाळाSchoolशाळा