शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

ऐकावे ते नवलच! विद्यार्थिनी एक अन् शिक्षक दोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:45 IST

काटोल तालुक्यातील आलागोंदी शाळेतील वास्तव : जि.पं च्या अनेक शाळेत शिक्षकांची बोंब

सौरभ ढोरे

काटोल (नागपूर) : ४२ जिल्हा परिषद शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. जिल्ह्यात ७२५ शिक्षकांची तातडीने गरज आहे. मात्र, काटोल तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या आलागोंदी जिल्हा परिषद शाळेत एका विद्यार्थिनीला शिकविण्यासाठी दोन शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आलागोंदी शाळेची स्थापना २००१ मध्ये झाली. या शाळेत २०१८ ला राजेंद्र टेकाडे या शिक्षकाची बदली करण्यात आली होती. तेव्हा शाळेची पटसंख्या ४ होती. दोन वर्षांत विविध शैक्षणिक उपक्रमामुळे आदर्श शाळा म्हणून या शाळेने लौकिक प्राप्त केला होता. २०२० मध्ये येथे विद्यार्थीसंख्या १२ होती. कोविड काळात ही शाळा बंद पडली. यानंतर शिक्षक टेकाडे यांना जिल्हा परिषदेच्या अभ्यास केंद्रात स्थानांतरित करण्यात आले. याच काळात काही विद्यार्थी चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून इतर माध्यमिक शाळेत पाचव्या वर्गाच्या शिक्षणाकरिता निघून गेले. यानंतर येथे पहिल्या वर्गात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही. आता या शाळेत इयत्ता तिसरीत वंशिका किशोर गजाम ही एकमेव विद्यार्थिनी आहे. तिला शिकविण्यासाठी गोपाल नेहारे व राजेंद्र टेकाडे दोन शिक्षक कार्यरत आहेत.

‘सीईओ’च्या आदेशाचे काय?

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौम्या शर्मा यांनी १९ जून रोजी आदेश काढत जिथे २० पेक्षा कमी पटसंख्या आहे व दोन शिक्षक कार्यरत आहेत तेथील एका कनिष्ठ शिक्षकाला २० पेक्षा अधिक पटसंख्या व एक शिक्षक कार्यरत असणाऱ्या शाळेत स्थानांतरित करण्यात यावे, असे निर्देश दिले होते. मात्र शिक्षण विभाग ‘सीईओ’च्या आदेशाकडे डोळेझाक का करतो आहे, हा प्रश्नच आहे.

हे आहे वास्तव

काटोल तालुक्यातील काही जि.प.शाळेत २० पेक्षा जास्त पटसंख्या आहे. याकरिता ६८ शिक्षकांची तातडीने गरज आहे. मात्र आलागोंदीप्रमाणे २० शाळेत २० पेक्षा कमी पटसंख्या असतानाही दोन शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे येथील शिक्षकांना इतरत्र स्थानांतरित करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकStudentविद्यार्थीnagpurनागपूरzp schoolजिल्हा परिषद शाळाSchoolशाळा