शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

केंद्राच्या कामांचे सामाजिक-आर्थिक ‘ऑडिट’ करा : नितीन गडकरींचे विरोधकांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:06 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी महाआघाडी तयार करणाऱ्या विरोधी पक्षांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या कार्यांचे सामाजिक व आर्थिक ‘ऑडिट’ करावे, असे थेट आव्हानच दिले आहे. भाजपाला देशभक्तांची टोळी संबोधत त्यांनी कॉंग्रेसच्या ६० वर्षांच्या कार्यकाळापेक्षा या सरकारने जास्त काम करून दाखविले आहे, असे प्रतिपादन केले. सोबतच नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहनदेखील केले. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देभाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी महाआघाडी तयार करणाऱ्या विरोधी पक्षांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या कार्यांचे सामाजिक व आर्थिक ‘ऑडिट’ करावे, असे थेट आव्हानच दिले आहे. भाजपाला देशभक्तांची टोळी संबोधत त्यांनी कॉंग्रेसच्या ६० वर्षांच्या कार्यकाळापेक्षा या सरकारने जास्त काम करून दाखविले आहे, असे प्रतिपादन केले. सोबतच नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहनदेखील केले. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, कृषी राज्यमंत्री कृष्णा राज, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप कांबळे, भाजपाचे सरचिटणीस राम माधव, खा.भूपेंद्र यादव, व्ही.सतीश, माजी मंत्री सत्यनारायण जटिया, मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर, दुष्यंत गौतम, नारायण केसरी, संजय पासराव प्रामुख्याने उपस्थित होते.भाजपच्या सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पाच जागांना पंचतीर्थ म्हणून विकसित केले आहे. काँग्रेसने यासाठी काहीच केले नव्हते. नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी भाजपा शासनाने निधी दिला. लंडनमध्ये बाबासाहेबांचे घर विकत घेऊन त्याला राष्ट्रीय स्मारक बनविले. त्यांच्या जन्मस्थळाला आंबेडकरनगर असे नाव दिले. इंदू मिल येथे स्मारक बनविले जात आहे. दिल्लीत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र बनविण्यात आले. यशवंत स्टेडियमच्या जागेवरदेखील स्मारक तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. दुसरीकडे काँग्रेसने भंडाऱ्यात बाबासाहेबांना पराभूत करून लोकसभेत पोहोचू दिले नव्हते. भाजपा दलितविरोधी व उच्चवर्णीय पक्ष आहे, असा कॉंग्रेसकडून दुष्प्रचार होतो. मात्र प्रत्यक्षात भाजपा समता व समरसतेच्या मार्गावर चालत आहे, असे गडकरी म्हणाले.गडकरींनी जातीबंधन तोडण्याचे आवाहन केले. भाजपा कुठलीही व्यक्ती नव्हे तर विचारधारेसाठी काम करणारा पक्ष आहे. भाजपा सत्तेत असेल तरी ‘डीएनए’ हा विरोधकांचा आहे. पक्ष विकासाला प्राथमिकता देत आहे. देशाला भ्रष्टाचारमुक्त करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनी दहशतवादाशी लढताना मोठे बलिदान केले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.अनुसूचित जातींसाठी केलेले कार्य मांडलेयावेळी थावरचंद गहलोत व विनोद सोनकर यांनी केंद्र सरकारकडून अनुसूचित जातींच्या हितासाठी केलेल्या कार्यांचा आलेखच मांडला. केंद्राने ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याला मजबुती प्रदान करण्यासाठी संविधान संशोधन केले. दुसरीकडे काँग्रेसने दलितांसाठी काहीच केले नाही, असा आरोप त्यांनी लावला. सुभाष पारधी यांनी स्वागतपर भाषण केले.केंद्राच्या कार्यामुळे धसका घेतल्याने महाआघाडीयावेळी गडकरी यांनी महाआघाडीवरदेखील प्रहार केला. केंद्राच्या कार्यांमुळे विविध विरोधी पक्ष एकत्रित आले. मात्र आम्ही ‘मर्द’ आहोत, सर्व एकत्र झाले तरी आम्ही त्यांना धूळ चारू व नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान करू, असे गडकरी म्हणाले. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात पाच हजार कोटींची योजना आली होती. आम्ही निधी कुठे गेला, ते विचारत नाही, मात्र काम झाले नाही, हे वास्तव आहे. मोदी सरकारने हे काम हाती घेतले असून, मार्चपर्यंत ३० टक्के गंगा स्वच्छ होईल तर पुढील वर्षी १०० टक्के स्वच्छता येईल, असा दावा गडकरी यांनी केला.

 

टॅग्स :BJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरी